शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

महामार्गावर आंदोलन करण्यास येणार बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:28 IST

जिल्ह्यात कोणतेही आंदोलन असले की सर्व प्रथम राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविल्या जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग केला जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : पोलीस अधीक्षक, आरटीओ आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मागविला अभिप्राय

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोणतेही आंदोलन असले की सर्व प्रथम राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविल्या जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग केला जात आहे. मात्र यामुळे या मार्गावरून जाणाºया सर्व सामान्य प्रवाशांसह रुग्ण आणि विद्यार्थ्यांना या काळात प्रचंड हाल सोसावे लागतात. हा प्रकार टाळण्यासाठी आणि कायमचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर होणाºया आंदोलनास बंदी घालण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुख्याधिकारी आणि नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अभिप्राय मागविला आहे. लवकरच जिल्हा प्रशासन महामार्गावर आंदोलनासाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्याच्या तयारीत आहे.भंडारा शहरातून कोलकाता-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. शहराला बायपास नसल्याने संपूर्ण वाहतूक याच माहामार्गावरून होते. रायपूर ते नागपूर हा अतिशय व्यस्त असा महामार्ग आहे. अहोरात्र वाहतूक सुरू असते. त्यात अवजड वाहनांसह स्कूल बसेस, रुग्ण वाहिका आदी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. परंतु आंदोलनात या राष्ट्रीय महामार्गालाच लक्ष केले जाते. मागणी कोणतीही असली तरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्याकडेच आंदोलकांचा कल असतो. गत काही वर्षात चक्का जाम, रस्ता रोको, ठिय्या आंदोलन असे विविध आंदोलने राष्ट्रीय महामार्गावर झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील विविध गावात आंदोलने केली जात आहे. गत महिनाभरापासून तर धान पिकाच्या पाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे या मार्गावरून जाणाºया वाहन धारकांना मोठा त्रास होतो. चक्का जाम सुरू झाला की, अवघ्या काही वेळातच वाहनांची दुतर्फा मोठी रांग लागते. विशेष म्हणजे भंडारा शहरात आंदोलन असेल तर त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही होतो. शहरातच अवजड वाहने उभे राहत असल्याने शहरवासीयांना रस्ता पार करणे कठीण जाते. वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना पोलिसांची मोठी दमछाक होते. अनेकदा रस्ता रोको आंदोलनाचा फटका रुग्णांना बसतो. वाहनांची कोंडी झाल्यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता काढत रुग्णालयापर्यंत पोहचणे कठीन जाते. भंडारा शहरालगत अनेक शाळा राष्ट्रीय महामार्गावर आहे. तेथे जाणाºया स्कूल बसही अडकून पडतात. बाहेरगावावरील वाहनधारक ताटकळत असतात. शहराच्या ठिकाणी आंदोलन झाले तर खाण्याची सोय होवू शकते. परंतु ग्रामीण भागात आंदोलन झाल्यास उपाशी रहावे लागते. वाहनांमधील महिला प्रवाशांना प्रसाधनाची मोठी समस्या येते. हा सर्व प्रकार वर्षातून अनेकदा अनुभवावा लागतो.आता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. भंडारा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनास मज्जाव करणारा कायमस्वरूपी मनाई वटहूकुम निर्गमित करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने भंडाराच्या जिल्हा पोलीस अधिक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अभिप्राय मागविला आहे. ५ आॅक्टोबर रोजी निर्गमित या पत्रात तातडीने अभिप्राय जिल्हा प्रशासनाला पाठवावे, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विजय भाकरे यांनी म्हटले आहे.सर्व सामान्य प्रवाशांना त्रास होवू नये याकरिता राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनास प्रतिबंध घालण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. लवकरच हा मनाई आदेश निर्गमित होण्याची शक्यता आहे.-विजय भाकरे, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी भंडारा.