शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर आंदोलन करण्यास येणार बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:28 IST

जिल्ह्यात कोणतेही आंदोलन असले की सर्व प्रथम राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविल्या जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग केला जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : पोलीस अधीक्षक, आरटीओ आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मागविला अभिप्राय

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोणतेही आंदोलन असले की सर्व प्रथम राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविल्या जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग केला जात आहे. मात्र यामुळे या मार्गावरून जाणाºया सर्व सामान्य प्रवाशांसह रुग्ण आणि विद्यार्थ्यांना या काळात प्रचंड हाल सोसावे लागतात. हा प्रकार टाळण्यासाठी आणि कायमचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर होणाºया आंदोलनास बंदी घालण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुख्याधिकारी आणि नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अभिप्राय मागविला आहे. लवकरच जिल्हा प्रशासन महामार्गावर आंदोलनासाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्याच्या तयारीत आहे.भंडारा शहरातून कोलकाता-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. शहराला बायपास नसल्याने संपूर्ण वाहतूक याच माहामार्गावरून होते. रायपूर ते नागपूर हा अतिशय व्यस्त असा महामार्ग आहे. अहोरात्र वाहतूक सुरू असते. त्यात अवजड वाहनांसह स्कूल बसेस, रुग्ण वाहिका आदी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. परंतु आंदोलनात या राष्ट्रीय महामार्गालाच लक्ष केले जाते. मागणी कोणतीही असली तरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्याकडेच आंदोलकांचा कल असतो. गत काही वर्षात चक्का जाम, रस्ता रोको, ठिय्या आंदोलन असे विविध आंदोलने राष्ट्रीय महामार्गावर झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील विविध गावात आंदोलने केली जात आहे. गत महिनाभरापासून तर धान पिकाच्या पाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे या मार्गावरून जाणाºया वाहन धारकांना मोठा त्रास होतो. चक्का जाम सुरू झाला की, अवघ्या काही वेळातच वाहनांची दुतर्फा मोठी रांग लागते. विशेष म्हणजे भंडारा शहरात आंदोलन असेल तर त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही होतो. शहरातच अवजड वाहने उभे राहत असल्याने शहरवासीयांना रस्ता पार करणे कठीण जाते. वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना पोलिसांची मोठी दमछाक होते. अनेकदा रस्ता रोको आंदोलनाचा फटका रुग्णांना बसतो. वाहनांची कोंडी झाल्यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता काढत रुग्णालयापर्यंत पोहचणे कठीन जाते. भंडारा शहरालगत अनेक शाळा राष्ट्रीय महामार्गावर आहे. तेथे जाणाºया स्कूल बसही अडकून पडतात. बाहेरगावावरील वाहनधारक ताटकळत असतात. शहराच्या ठिकाणी आंदोलन झाले तर खाण्याची सोय होवू शकते. परंतु ग्रामीण भागात आंदोलन झाल्यास उपाशी रहावे लागते. वाहनांमधील महिला प्रवाशांना प्रसाधनाची मोठी समस्या येते. हा सर्व प्रकार वर्षातून अनेकदा अनुभवावा लागतो.आता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. भंडारा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनास मज्जाव करणारा कायमस्वरूपी मनाई वटहूकुम निर्गमित करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने भंडाराच्या जिल्हा पोलीस अधिक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अभिप्राय मागविला आहे. ५ आॅक्टोबर रोजी निर्गमित या पत्रात तातडीने अभिप्राय जिल्हा प्रशासनाला पाठवावे, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विजय भाकरे यांनी म्हटले आहे.सर्व सामान्य प्रवाशांना त्रास होवू नये याकरिता राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनास प्रतिबंध घालण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. लवकरच हा मनाई आदेश निर्गमित होण्याची शक्यता आहे.-विजय भाकरे, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी भंडारा.