शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

आगीतून बचावली बिबट्याची पिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:49 IST

दहा दिवसांपूर्वी नवेगाव येथील उसाच्या वाडीत एका मादी बिबट्याने दोन पिलांना जन्म दिला होता. ऊस कापणीला आल्याने शेतकऱ्यांनी उसाची कापणी सुरू केली असता त्यांना शेतात ही पिल्ले आढळून आली.

ठळक मुद्देनवेगाव येथील घटना : वनविभागाचा गलथानपणा ठरला कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहा दिवसांपूर्वी नवेगाव येथील उसाच्या वाडीत एका मादी बिबट्याने दोन पिलांना जन्म दिला होता. ऊस कापणीला आल्याने शेतकऱ्यांनी उसाची कापणी सुरू केली असता त्यांना शेतात ही पिल्ले आढळून आली. ही माहिती भंडारा वन विभागाला दिली. तेव्हापासून या पिल्लांच्या संरक्षणासाठी वनमजूर व कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. परंतु, शेतात वन्यजीव असतानासुद्धा उर्वरित शेतात उसाची कापणी सुरूच होती. त्यामुळे मानवी हस्तक्षेप निर्माण झाल्याने त्या बिबट्याने आपल्या पिल्लांची जागा दोन-तिनदा बदलली होती. वन विभागाने ती जागा शोधली व त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले होते.बुधवारी दुपारी, भंडाराचे मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब यांनी शेताला भेट दिली असता उसाच्या चार-पाच दांड्यांच्या मंडपात ती पिल्ले होती. उसाचे पीक कापले होते. सर्वत्र वाळलेला कचरा पडून होता. ज्याठिकाणी ही पिल्ले होती त्याच्या दोन शेत आड उसाची कापणी सुरू होती. तेवढ्यात त्यातील एका शेतकºयाने आपल्या शेतातील कचºयाला आग लावली. प्रखर उन आणि वारा यामुळे ही आग हळहळू वाढू लागली. आग अधिक वाढू नये म्हणून वनमजूर काळजी घेत होते. परंतु, कुठुनतरी एक ठिणगी उडाल्याने दुसरीकडचे शेत जळू लागले. क्षणात ही आग वणव्यात रुपांतरीत झाली. आता मात्र ही आग आटोक्यात आणणे शक्य नव्हते. क्षणात ही आग पिल्लांपर्यंत पोहचेल आणि त्यांचा कोळसा होईल, तोच राजकमल जोब, वनक्षेत्रपाल वसीम खान, वनरक्षक डोंगरे व वनमजुरांनी त्या पिल्लांना उचलून सुरक्षित स्थळी हलविले. पाहता पाहता ज्याठिकाणी ही पिले आधी होती तो परिसर पूर्णत: जळून खाक झाला होता. त्यानंतर सदर पिल्लांना मादी बिबट सहज शोधू शकेल अशा परिसरात सुरक्षित ठेवण्यात आले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी काही वनमजुर लावण्यात आले तसेच बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आले. असे असताना वन विभाग व गावकरी यांनी सामंजस्य भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. वनाधिकाºयांच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार घडला असून यापुढे वन विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. 

टॅग्स :Tigerवाघ