शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

कर्जमाफी नोंदणीसाठी तहसीलमध्ये मदत कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:29 PM

महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत भंडारा जिल्हयातील सर्वच तालुक्यातील पात्र शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यासाठी ......

ठळक मुद्देअर्ज भरण्यासाठी १७५ केंद्र कार्यान्वित : नि:शुल्क अर्ज भरण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत भंडारा जिल्हयातील सर्वच तालुक्यातील पात्र शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असून या कालावधीत शेतकºयांना सर्व्हर तसेच इतर तांत्रिक अडचणी आल्यास त्यासाठी सर्व उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयात उद्यापासून मदत कक्ष उघडण्यात येणार आहेत. आॅनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड नसले तरी नोंदणी होणार असून शेतकºयांनी १५ सप्टेंबर पर्यंत आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे. अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यामध्ये भंडारा जिल्हयाचे काम आतापर्यंत ९५ टक्के झाले आहे.आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.बी. तरकसे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., शिल्पा सोनाले, अर्चना मोरे, अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर, जिल्हा बँक महाव्यवस्थापक संजय बरडे व सर्व तहसिलदार उपस्थित होते.आॅनलाईन अर्ज नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस उरले असून या दोन दिवसात पात्र प्रत्येक शेतकºयाची नोंदणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आज झालेल्या बैठकीत यंत्रणेला दिले. यासाठी तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात येत असून ज्या शेतक?्यांना नोंदणीसाठी अडचणी निर्माण होतात. त्यांनी मदत कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांना आॅनलाईन नोंदणीमध्ये अडचणी निर्माण होतील अशा शेतक?्यांनी आपली माहिती मदत कक्षात नोंदवावी. आधार कार्ड नसले तरी नोंदणी करता येणार असून नोंदणी झाल्यावर आधारकार्ड काढून आधार नंबर देण्याची सुविधा शासनाने दिली आहे. सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार आणि सहाय्यक निबंधक यांनी एकही शेतकरी नोंदणीतून सुटता कामा नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.देशातील सर्वात मोठा असा ३४ कोटीचा कर्जमाफीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून कुठलीही अट न ठेवता सरसकट अशी कर्ज माफीची योजना असून त्यामध्ये शेतकºयांची दिड लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील ३६ लाखांपेक्षा अधिक शेतकºयांचा सातबारा कोरा होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा भंडारा जिल्हयातील अंदाजे ९५ हजार शेतकºयांना लाभ मिळणार आहे.सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँक मिळून जिल्हयातील एक लाख १७ हजार ९९४ खातेदारांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे. त्यापैकी कर्ज घेणारे सभासद आणि नियमित कर्ज भरणारे सभासद मिळून अंदाजे ९५ हजार शेतकºयांना कृषी सन्मान कर्ज माफी योजनेचा लाभ मिळणार आहे. यात ७१ हजार ६०७ शेतकरी नियमित कर्ज भरणा करणारे आहेत. जिल्हयात एक लाख १७ हजार ९९४ शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समाविष्ट होतील. यापैकी काही शेतकरी अपात्र ठरु शकतात. त्यामुळे सरासरी 95 हजार शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतीने आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यासाठी जिल्हयात १७५ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये आपले सरकार महाआॅनलाईन व सी.एस.सी. केंद्रांचा समावेश आहे. भंडारा-३१, तुमसर-२७, मोहाडी-२१, पवनी-२५, लाखनी-२३, साकोली-२७ व लाखांदूर-२१ केंद्राचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर शेतकºयांकडून कुठलेही मुल्य न आकारता अर्ज भरुन देण्याची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त काही खाजगी केंद्रांकडून शेतकरी आपला अर्ज आॅनलाईन अपलोड करु शकतात.प्रशासनाच्या वतीने सर्व राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँक, तहसिल, पंचायत समिती व शासकीय कार्यालयात अजार्चे नमुने उपलब्ध करुन दिले आहेत. अर्ज आॅनलाईन भरण्याच्या केंद्रावर अर्ज भरुन देण्याची सुविधा असली तरी शेतकºयांची वैयक्तिक माहिती त्यांनी स्वत: भरावयाची आहे. यासाठी गटसचिव त्यांना सहकार्य करणार आहेत. या सोबतच ३६८ कृषि सहकारी सोसायटयामध्ये केंद्र निश्चित केले आहे. या ठिकाणी सुध्दा अर्ज भरण्यात येणार आहे.