शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

ग्रामपंचायत प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी प्रशासकांची नियुक्ती केली होती. मात्र सर्व आर्थिक व्यवहाराचे अधिकार संबंधित प्रशासकांना देण्यात आले होते. या आदेशात त्यांनी आर्थिक अधिकाराचा कुठेही उल्लेख केला नव्हता. उलट विद्यमान सीईओंनी आता एक आदेश काढून सर्व आर्थिक अधिकार जिल्हा परिषदेकडे अर्थात स्वत:कडे घेतले आहे. यामुळे ग्रामपंचायतींना कोणताही खर्च करावयाचा झाल्यास थेट जिल्हा परिषदेत जावून परवानगी घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देसीईओंचे आदेश : विकास निधीसह कार्यालयीन खर्चासही घ्यावी लागेल जिल्हा परिषदेची परवानगी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर नियुक्त प्रशासकांच्या आर्थिक अधिकारावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एका आदेशाने टाच आणली आहे. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी जिल्हा परिषदेची पूर्व संमती घ्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे ३ ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन सीईओंनी काढलेल्या आदेशात प्रशासकांना पूर्ण अधिकार दिले होते. मात्र विद्यमान सीईओंनी ८ जून रोजी आदेश काढून प्रशासकांच्या आर्थिक नळ्या आवळल्या आहे. कोरोना संसर्गामुळे येथे निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑगस्ट २०२१ पूर्वी मुदत संपणाऱ्या १६ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे या १६ ग्रामपंचायती भंडारा तालुक्यातील आहेत. याठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकांना सर्व अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अंतर्गत देण्यात आले आहे. मात्र आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी ८ जुलै राेजी एक आदेश निर्गमित केला. त्यात प्रशासन सुरळीतपणे पार पाडावे, मात्र आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी जिल्हा परिषदेची पूर्व संमती घ्यावे, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका तहकूब झाल्या होत्या. त्याठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी प्रशासकांची नियुक्ती केली होती. मात्र सर्व आर्थिक व्यवहाराचे अधिकार संबंधित प्रशासकांना देण्यात आले होते. या आदेशात त्यांनी आर्थिक अधिकाराचा कुठेही उल्लेख केला नव्हता. उलट विद्यमान सीईओंनी आता एक आदेश काढून सर्व आर्थिक अधिकार जिल्हा परिषदेकडे अर्थात स्वत:कडे घेतले आहे. यामुळे ग्रामपंचायतींना कोणताही खर्च करावयाचा झाल्यास थेट जिल्हा परिषदेत जावून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासक अशा परवागी घेण्याच्या भानगडीत पडण्या ऐवजी विकास कामांना ब्रेक लावण्याची शक्यात आधिक असल्याचे बोलले जात आहे.

प्रशासकांना झिजवावे लागेल उंबरठे- जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींवर आरोग्य पर्यवेक्षक, शाखा अभियंता, कृषी विस्तार, शिक्षण विस्तार, पंचायत विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाचाच ते एक घटक आहे. मात्र ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून गेल्यानंतर त्यांना आर्थिक परवानगीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे उंबरठे झिटवावे लागेल. विकास कामांचा खोळंबा- आता प्रशासकाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने हाती घेतले आहे. त्यामुळे दिवाबत्ती, कार्यालय खर्च, १५वा वित्त आयोग, तांडा वस्ती सुधार योजना, नवबोद्ध वाड्या, वस्त्यांचा विकास यासह सामान्य निधी, ग्रामपंचायत कर्मचारी वेतन, सफाई कामगारांची मंजुरी यासह विविध कामांसाठी लागणारा पैसा वेळेवर मिळणार नाही त्यातून विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषद