शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

ग्रामपंचायत प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी प्रशासकांची नियुक्ती केली होती. मात्र सर्व आर्थिक व्यवहाराचे अधिकार संबंधित प्रशासकांना देण्यात आले होते. या आदेशात त्यांनी आर्थिक अधिकाराचा कुठेही उल्लेख केला नव्हता. उलट विद्यमान सीईओंनी आता एक आदेश काढून सर्व आर्थिक अधिकार जिल्हा परिषदेकडे अर्थात स्वत:कडे घेतले आहे. यामुळे ग्रामपंचायतींना कोणताही खर्च करावयाचा झाल्यास थेट जिल्हा परिषदेत जावून परवानगी घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देसीईओंचे आदेश : विकास निधीसह कार्यालयीन खर्चासही घ्यावी लागेल जिल्हा परिषदेची परवानगी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर नियुक्त प्रशासकांच्या आर्थिक अधिकारावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एका आदेशाने टाच आणली आहे. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी जिल्हा परिषदेची पूर्व संमती घ्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे ३ ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन सीईओंनी काढलेल्या आदेशात प्रशासकांना पूर्ण अधिकार दिले होते. मात्र विद्यमान सीईओंनी ८ जून रोजी आदेश काढून प्रशासकांच्या आर्थिक नळ्या आवळल्या आहे. कोरोना संसर्गामुळे येथे निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑगस्ट २०२१ पूर्वी मुदत संपणाऱ्या १६ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे या १६ ग्रामपंचायती भंडारा तालुक्यातील आहेत. याठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकांना सर्व अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अंतर्गत देण्यात आले आहे. मात्र आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी ८ जुलै राेजी एक आदेश निर्गमित केला. त्यात प्रशासन सुरळीतपणे पार पाडावे, मात्र आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी जिल्हा परिषदेची पूर्व संमती घ्यावे, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका तहकूब झाल्या होत्या. त्याठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी प्रशासकांची नियुक्ती केली होती. मात्र सर्व आर्थिक व्यवहाराचे अधिकार संबंधित प्रशासकांना देण्यात आले होते. या आदेशात त्यांनी आर्थिक अधिकाराचा कुठेही उल्लेख केला नव्हता. उलट विद्यमान सीईओंनी आता एक आदेश काढून सर्व आर्थिक अधिकार जिल्हा परिषदेकडे अर्थात स्वत:कडे घेतले आहे. यामुळे ग्रामपंचायतींना कोणताही खर्च करावयाचा झाल्यास थेट जिल्हा परिषदेत जावून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासक अशा परवागी घेण्याच्या भानगडीत पडण्या ऐवजी विकास कामांना ब्रेक लावण्याची शक्यात आधिक असल्याचे बोलले जात आहे.

प्रशासकांना झिजवावे लागेल उंबरठे- जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींवर आरोग्य पर्यवेक्षक, शाखा अभियंता, कृषी विस्तार, शिक्षण विस्तार, पंचायत विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाचाच ते एक घटक आहे. मात्र ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून गेल्यानंतर त्यांना आर्थिक परवानगीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे उंबरठे झिटवावे लागेल. विकास कामांचा खोळंबा- आता प्रशासकाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने हाती घेतले आहे. त्यामुळे दिवाबत्ती, कार्यालय खर्च, १५वा वित्त आयोग, तांडा वस्ती सुधार योजना, नवबोद्ध वाड्या, वस्त्यांचा विकास यासह सामान्य निधी, ग्रामपंचायत कर्मचारी वेतन, सफाई कामगारांची मंजुरी यासह विविध कामांसाठी लागणारा पैसा वेळेवर मिळणार नाही त्यातून विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषद