शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

विजांच्या कडकडाटात पावसाची जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:25 IST

शुक्रवारी रात्रीपासून रिमझीम सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळी ८ वाजतापासून धो-धो बरसला. दुपारच्या सुमारास चांगले ऊन्ह तापले आणि सायंकाळी ६ वाजतापासून विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले होते.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व पाऊस : कापणी केलेल्या उन्हाळी धानपिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शुक्रवारी रात्रीपासून रिमझीम सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळी ८ वाजतापासून धो-धो बरसला. दुपारच्या सुमारास चांगले ऊन्ह तापले आणि सायंकाळी ६ वाजतापासून विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. आज २८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.भंडारा जिल्ह्यातील तुमसर, पवनी, लाखनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी, वरठी, अड्याळ या परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने १ जूनपासून आतापर्यंत ५२.१ मिमी पावसाची नोंद केली आहे. शुक्रवारला रात्री ९ वाजता पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर रात्री रिमझीम पाऊस आणि पहाटे बंद झाला. परंतु सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावून वातावरणात गारवा निर्माण केला.या अचानक बरसलेल्या पावसामुळे उन्हाळी धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकºयांनी धानाची कापणी करून धान शेतात ठेवले होते. ते धान पावसामध्ये भिजल्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे नुकसान लाखांदूर तालुक्यात अधिक प्रमाणात झाले आहे. दरम्यान, पहिल्याच पावसाने पालिकेची पोल खोलली आहे. नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या. त्यातील कचरा रस्त्यावर आल्यामुळे दुर्गंधी सुटली होती. याचा फटका वाहनचालकांना झाला. मान्सुनपूर्व नाल्यांची सफाई न केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.लाखांदुरात धान पीक पाण्याखालीलाखांदूर : उन्हाळी धानाची रोवणीनंतर मे, जून महिन्यात कोरड्या पडणाºया विहिरींना यावर्षी बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे धान पीक चांगले आले. परंतु कापणी करून ठेवलेले बहुतांश शेतकºयांचे धान रात्रीपासून बरसत असलेल्या पावसामुळे पाण्याखाली आले आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ज्या शेतकऱ्यांनी कापणीनंतर धानाची मळणी केली त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळणार आहे. उन्हाळी धानाची रोवणी केल्यानंतर धानपिकाला कीडीने ग्रासले होते. अशातच शेतकऱ्यांनी उसनवार आणि व्याजाने औषधे घेऊन फवारणी केली. सततची नापिकी आणि नैसर्गिक प्रकोपाने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी चांगले धानपीक हाती येईल, अशी आशा होती. धान पिकले तर कर्जाचा भार कमी होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु लाखांदूर तालुक्यातील काही भागात जलस्तर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत. विविध उपाययोजना करून उत्पादन घेतले. मात्र अचानक बरसलेल्या पावसामुळे कापणीसाठी आलेल्या धानाला फटका बसला आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकºयांच्या शेतात कापणीसाठी असलेले उभे धानपिक पाण्याखाली सापडले आहे. त्यामुळे हातात आलेले पीक जाण्याच्या मार्गावर आहेत.पालांदूर परिसरात पावसाची रिपरिपपालांदूर : जिल्ह्यात काही भागात दोन तीन दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी पालांदूर परिसरात मात्र अजूनही चांगला पाऊस बरसला नाही. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला आहे. कृषी केंद्रात शेतकऱ्यांना अपेक्षित बियाणांची टंचाई जाणवत आहे. संकरीत वाणाला मागणी वाढत आहे. ढगाळ वातावणामुळे तापमान कमी झाले आहे. घर दुरूस्तीच्या कामाला गती आली आहे. पावसाच्या जोरदार हजेरीनंतर पेरणीला गती मिळण्याची चिन्हे आहेत. अनुदानावरील बियाणाने शेतकºयाला आधार मिळाला असला तरी बियाणे अपुरे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.खरिपाच्या मशागतीला प्रारंभपवनी : यावर्षी खरीपाच्या मशागतीला लवकरच प्रारंभ झाला आहे. मागील काही वर्षांपासून पावसाने दगा दिल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. कधी अवर्षन तर कधी दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकरी होरपळत आहे. दरम्यान यावर्षी तरी पावसाने समाधानकारक हजेरी लावली तर पीक हाती येईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना पावसाने हजेरी लावली आहे. पवनी आणि लाखांदूर या चौरास भागात उन्हाळी धानपिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी हे धानपिक बºयापैकी आले असताना आता पावसाने हजेरी लावल्याने कापनी केलेले धान ओलेचिंब झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊस