शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यात जाेरदार पाऊस, गाेसेचे सर्व 33 दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी ११ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले हाेते. त्यात २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हाेते. ५१२३.११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात हाेता. मात्र सकाळी पडलेल्या पावसाने पाणीपातळी वाढल्याने सायंकाळी ५ वाजता सर्व ३३ गेट एक मीटरने उघडण्यात आले. ७२९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा / माेहाडी : जिल्ह्यात मंगळवारी पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली. गाेसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ झाल्याने सर्व ३३ दरवाजे एक मीटर उघडण्यात आले. वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. माेहाडी तालुक्यात अतिवृष्टीची नाेंद झाली असून, अवघ्या तीन तासांत ६५ मिमी पाऊस काेसळला. अनेक घरांत पाणी शिरले असून धान शेतीही जलमय झाल्याचे चित्र आहे.गत दाेन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस काेसळत आहे. साेमवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस काेसळला. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात २९.८ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यात पवनी तालुक्यात ६०.८ मिमी आणि भंडारा तालुक्यात ५२.१ मिमी पावसाचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. माेहाडी तालुक्यात जाेरदार पाऊस बरसला. माेहाडी तालुक्यातील सीतेपार तलाव ओव्हरफ्लाे हाेऊन या तलावाचे पाणी धानाच्या शेतीत शिरले. तसेच अनेक गावांतील सकल भागातील घरात पाणी शिरले.गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी ११ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले हाेते. त्यात २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हाेते. ५१२३.११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात हाेता. मात्र सकाळी पडलेल्या पावसाने पाणीपातळी वाढल्याने सायंकाळी ५ वाजता सर्व ३३ गेट एक मीटरने उघडण्यात आले. ७२९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. भंडारा शहरानजीक वाहणाऱ्या वैनगंगा नदीची पाणी पातळी स्थिर असून, सध्या कारधा येथे २४४.६७ मीटर पाणी असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला.

मोहाडीत घरांची पडझड- मोहाडी तालुक्यासह शहरात मंगळवारी सकाळी दोन तास मुसळधार बरसल्याने अनेक घरात पाणी शिरले तर काही घरांची पडझड झाली. दोन तासांत ६५ मिमीच्यावर पाऊस पडला. सखल भागात असलेल्या कुशारी फाटा चौकात जवळपास दोन फूट पाणी रस्त्यावर साचले होते. वाहनांना जागेवरच उभे रहावे लागले. तहसील कार्यालयातही पाणी शिरले. तहसीलदारांनी तलाठ्यांची तातडीची बैठक बोलावून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. सीतेपार तलावाचे पाणी गावात शिरले तर हरदोली येथील तलावाच्या पारीला खिंडार पडले. मोहाडी, कान्हळगाव, हरदोली या गावांना पावसाचा मोठा फटका बसला. 

 

टॅग्स :RainपाऊसGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प