शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:01 IST

लाखनी तालुक्यातही दमदार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून बळीराजा रोवणीच्या कामाला गुंतला आहे. पालांदूर परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने धान पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पालांदूर व परिसरात झड सदृष्य स्थिती अनुभवायला मिळत आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत ५२ गाव शिवारातील रोवणी अंतीम टप्याकडे आहे.

ठळक मुद्देरोवणी अंतिम टप्यात : साकोलीत अतिवृष्टी, चांदोरी पुलावर चढले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चातकासारखी वाट पाहत असलेला बळीराजा दोन दिवसाचा संततधार पावसाने सुखावला आहे. शनिवार रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून रविवारीही दिवसभर पाऊस बरसला. विशेष म्हणजे साकोली तालुक्यात अतिवृष्टी झाली असून साकोली - तुमसर राज्य मार्गावर असलेल्या चांदोरी पुलावर पाणी आल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.पंधरवाड्यापासून पाऊस केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यात रखडलेल्या रोवणीच्या कामाला अंतीम रुप मिळाले आहे. पावसाअभावी काही ठिकाणी पºहे वाळत होती. मात्र या पावसामुळे पºह्यांना जीवनदान मिळाले आहे.तुमसर तालुक्यात झारली येथे संततधार पावसामुळे घराची भिंत कोसळली. सुदैवाने यात पती-पत्नी थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. त्यांच्या निवासाची सोय अंगणवाडी केंद्रात करण्यात आली आहे. घटनास्थळी सरंपच नमिता रहांगडाले, देवचंद ठाकरे, भवानी रहांगडाले, देवीलाल पटले आदींनी भेट दिली. तहसीलदारांना घटनेची माहिती देण्यात आली. तुमसर तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली.साकोली शहरासह तालुक्यात शनिवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहे. गत २४ तासात तालुक्यात ७७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. उड्डाणपूलाचे काम सुरु असून महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांची स्वच्छता न केल्यामुळे महामार्गावर पाणी साचले. नागझीरा मार्गावरही दोन फुट पाणी आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.लाखनी तालुक्यातही दमदार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून बळीराजा रोवणीच्या कामाला गुंतला आहे. पालांदूर परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने धान पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पालांदूर व परिसरात झड सदृष्य स्थिती अनुभवायला मिळत आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत ५२ गाव शिवारातील रोवणी अंतीम टप्याकडे आहे. खताची मात्रा देण्याकरिता पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. मात्र या पावसाने उणीव भरुन काढली आहे.याशिवाय लाखांदूर, पवनी, मोहाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली असून शेतीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. रविवार सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासात सरासरी ९.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मात्र त्यानंतर जिल्ह्यात दमदार पाऊस बरसल्याची माहिती आहे.गोसेखुर्द धरणाचे ११ दरवाजे उघडले.जिल्ह्याच्या सीमावर्ती भागासह मध्यप्रदेशात पाऊस बरसल्याने वैनगंगा धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. परिणामी गोसेखुर्द धरणाच्या ३३ वक्रद्वारांपैकी ११ वक्रद्वार अर्ध्या मीटरने उघडण्यात आली आहेत. गत दोन दिवस पावसाचा अंदाजही वेधशाळेने वर्तविला आहे.

टॅग्स :RainपाऊसGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प