शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘तो’ पाणी वितरणासाठी फिरतो वणवण

By admin | Updated: May 20, 2017 00:57 IST

निवडणुकीत अनेक आश्वासने लोकांना दिली जातात. मात्र ती प्रत्यक्षात उतरणार की नाही हे निवडणूक निकालानंतर अवलंबून असते.

पराभवानंतरही आश्वासनाची पूृर्ती : साकोलीत मोफत पाण्याचा पुरवठा शिवशंकर बावनकुळे । लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : निवडणुकीत अनेक आश्वासने लोकांना दिली जातात. मात्र ती प्रत्यक्षात उतरणार की नाही हे निवडणूक निकालानंतर अवलंबून असते. पराभव झाला तर अशा आश्वासनांचा विसरच पडल्याचे आजपर्यंत आपण अनुभवले आहे. मात्र साकोलीच्या प्रभाग क्रमांक एक मधून पराभूत झालेले झनकलाल लांजेवार यांनी आपले वेगळेपण कायम ठेवले आहे. निवडणुकीत पराभव झाले असले तरी लोकांच्या समस्याप्रती तळमळ असल्याने त्यांनी स्व:खर्चाने टँकर लावून वॉर्ड क्रमांक एक मधील लोकांना पाणी पुरविण्याचे काम सुरू केले आहे. मुळात सामाजिक कार्याची आवड असलेल्यांना राजकारणातील जय, पराजय काम करण्यापासून थांबवू शकत नाही हेच झनकलाल यांच्या निमित्ताने स्पष्ट होते. नगर परिषद, निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भाजपचे उमेदवार असलेले झनकलाल यांचा पराभव झाला. मात्र पराभवाचे खापर मतदारावर न फोडता त्यांनी सर्वसामान्यांशी आपली नाळ न तोडता उलट निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांच्या पुर्तीच्या दृष्टीने त्यांनी पाऊल टाकले. प्रभाग क्रमांक १ मध्ये असलेली पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. बोलल्याप्रमाणे त्यांनी स्व:खर्चाने प्रभागात मोफत पाणी पुरवठा करण्याचा सपाटा लावला आहे. एकीकडे प्रशासन लोकांची गरज पूर्ण करण्यात असमर्थ ठरत असताना झनकलाल यांनी मात्र आपले कर्तव्य पार पाडण्यात सुरूवात केली आहे. दिवसभरातून सहा ते सात वेळा वॉर्डात फिरून लोकांना पाणी पुरवितो. पराभवरानंतरही समाजसेवेत खंड न पडू देणारा पराभव असला तरी नक्कीच तो नगरसेवक आहे.