शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाणीटंचाईचा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळा

By admin | Updated: April 23, 2016 00:36 IST

पाणी टंचाईबाबत खंड विकास अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर घेतलेल्या बैठकीचे कार्यवृत्त तात्काळ सादर करावे.

आढावा बैठक : दीपक सावंत यांचे प्रतिपादनभंडारा : पाणी टंचाईबाबत खंड विकास अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर घेतलेल्या बैठकीचे कार्यवृत्त तात्काळ सादर करावे. जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न प्रशासनाने संवेदनशिलपणे हाताळावा आणि पाणी टंचाई असणाऱ्या गावात तात्काळ उपाय योजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. दिपक सावत यांनी दिलेत. जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, खासदार नाना पटोले, आमदार सर्वश्री अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पोलीस अधिक्षक विनीता साहू, कृषि सभापती नरेश डहारे उपस्थित होते.यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे पाणी टंचाईबाबतचे नियोजन आधिच करावे, अशा सूचना बैठकीत दिल्या नंतरही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, अशी खंत खासदार पटोले यांनी व्यक्त केली. पाणी टंचाईची बैठक खंड विकास अधिकारी घेत नाहीत, असा आरोप आमदारांनी केला. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मैदमवार यांनी खंड विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात बैठका घेतल्याचे सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी बैठकीचे कार्यवृत्त तात्काळ सादर करण्याच्या सूचना केल्यात. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे ज्या गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे तिथे तात्काळ विंधन विहिरी व हातपंप दुरुस्त करावेत. पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत कोरडे पडत असल्यामुळे बावणथडी आणि पेंचप्रकल्पामधून पाणी सोडण्याची मागणी आमदार चरण वाघमारे यांनी केली. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी समिती समोर ठेवली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लगेच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. वैनगंगेचे पाणी दुषित झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशपूर सारख्या गावात लोक पाणी विकत घेत आहेत. अशा गावांमध्ये जल शुध्दीकरणयंत्र उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. याबाबत भंडारा व पवनी या तालुक्यामध्ये जल शुध्दीकरण यंत्र लावण्यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्यात. (नगर प्रतिनिधी)