शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळा

By admin | Updated: April 23, 2016 00:36 IST

पाणी टंचाईबाबत खंड विकास अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर घेतलेल्या बैठकीचे कार्यवृत्त तात्काळ सादर करावे.

आढावा बैठक : दीपक सावंत यांचे प्रतिपादनभंडारा : पाणी टंचाईबाबत खंड विकास अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर घेतलेल्या बैठकीचे कार्यवृत्त तात्काळ सादर करावे. जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न प्रशासनाने संवेदनशिलपणे हाताळावा आणि पाणी टंचाई असणाऱ्या गावात तात्काळ उपाय योजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. दिपक सावत यांनी दिलेत. जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, खासदार नाना पटोले, आमदार सर्वश्री अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पोलीस अधिक्षक विनीता साहू, कृषि सभापती नरेश डहारे उपस्थित होते.यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे पाणी टंचाईबाबतचे नियोजन आधिच करावे, अशा सूचना बैठकीत दिल्या नंतरही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, अशी खंत खासदार पटोले यांनी व्यक्त केली. पाणी टंचाईची बैठक खंड विकास अधिकारी घेत नाहीत, असा आरोप आमदारांनी केला. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मैदमवार यांनी खंड विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात बैठका घेतल्याचे सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी बैठकीचे कार्यवृत्त तात्काळ सादर करण्याच्या सूचना केल्यात. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे ज्या गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे तिथे तात्काळ विंधन विहिरी व हातपंप दुरुस्त करावेत. पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत कोरडे पडत असल्यामुळे बावणथडी आणि पेंचप्रकल्पामधून पाणी सोडण्याची मागणी आमदार चरण वाघमारे यांनी केली. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी समिती समोर ठेवली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लगेच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. वैनगंगेचे पाणी दुषित झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशपूर सारख्या गावात लोक पाणी विकत घेत आहेत. अशा गावांमध्ये जल शुध्दीकरणयंत्र उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. याबाबत भंडारा व पवनी या तालुक्यामध्ये जल शुध्दीकरण यंत्र लावण्यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्यात. (नगर प्रतिनिधी)