शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

मंगळवारपासून जिल्ह्यात वातावरणात बदल हाेवून ढगाळ वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागांत तर बुधवारी सकाळी भंडारा शहरासह तालुक्यात पाऊस बरसला. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह भंडारा शहरात तब्बल अर्धा तास जाेरदार पाऊस बरसला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट हाेवून वेगाने वाहणाऱ्या वाहनासाेबत पाऊस बरसला.

ठळक मुद्देरबी पिकांचे नुकसान : आसगाव परिसराला वादळाचा तडाखा, तुरीच्या आकाराच्या गारा

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल हाेवून अवकाळी पाऊस बरसत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला तर भंडारा, साकाेली, लाखनी आणि माेहाडी तालुक्यांतील काही भागात गारांचा वर्षाव झाला. भंडारा शहरात तीन ते चार मिनीट तुरीच्या आकाराएवढ्या गारांसह अर्धा तास पाऊस बरसला. पवनी तालुक्यातील आसगाव परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला. मंगळवारपासून जिल्ह्यात वातावरणात बदल हाेवून ढगाळ वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागांत तर बुधवारी सकाळी भंडारा शहरासह तालुक्यात पाऊस बरसला. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह भंडारा शहरात तब्बल अर्धा तास जाेरदार पाऊस बरसला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट हाेवून वेगाने वाहणाऱ्या वाहनासाेबत पाऊस बरसला. यावेळी भंडारा शहराच्या काही भागात तुरीच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. यासाेबतच साकाेली, लाखनी आणि माेहाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. गारांचाही वर्षाव झाला. पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात गुरुवारी दुपारी २ वाजता वादळासह पावसाला सुरुवात झाली. यात रबी पीकांचे माेठे नुकसान झाले. शेतात उभी असलेली पिके जमिनीवर आडवी झाली तर कापणी झालेला चना, वटाणा, गहू, तूर, लाख, लाखाेरी आदी रबी पिकांसह कडपा ओल्या झाल्या. साधारणत: एक तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची झाेप उडाली. रबी पिकांचे चुरणे थांबले. गुरांचा चारा ओला झाला. त्यामुळे ताे काळा पडणार आहे. काही शेतकऱ्यांनी धानाचे पाेते रचून ठेवले हाेते. तेही ओले झाले. भंडारा तालुक्यातील पहेला परिसरात वादळीवाऱ्यासह दुपारी २ वाजेच्या सुमारास जाेरदार हजेरी लावली.लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसराला अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे बागायती शेतीसह कडधान्य पिकांचे नुकसान झाले. धान खरेदी केंद्रात सध्या उघड्यावर खरेदी सुरु आहे. हजाराें क्विंटल धान पावसात ओले झाले. गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आद्रता व गारव्यामुळे धान पिकाला खाेडकिडींचा त्रास हाेत आहे.लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. परिसरात अवकाळी पावसाने गुरुवारी दुपारी हजेरी लावली. रबी पिकांचा कडपा आणि जमा केलेल्या ढिगांमध्ये पाणी शिरुन माेठे नुकसान झाले. मुंग वाटाणा, उडीद, लाख, लाखाेरी आदी पीक काढणीचा हंगाम सुरु आहे. शेतात कडपा पसरलेला आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले. यासाेबतच जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. दिवसभर वातावरणात प्रचंड गारवा जाणवत हाेता.

शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट गत खरीप हंगामापासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. सुरुवातीला अतिवृष्टीनंतर महापूर आणि धान काढणीच्यावेळेस किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना रबी हंगामाकडून माेठी आशा आहे. उन्हाळी धानासह गहू, हरभरा, लाखाेरीतूर आदी पिकांची पेणी करण्यात आली. मात्र गत तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसत आहे. कापणी झालेले पीक ओले हाेत असून आधारभूत खरेदी केंद्राबाहेरील धानही ओले हाेत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती