शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

मंगळवारपासून जिल्ह्यात वातावरणात बदल हाेवून ढगाळ वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागांत तर बुधवारी सकाळी भंडारा शहरासह तालुक्यात पाऊस बरसला. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह भंडारा शहरात तब्बल अर्धा तास जाेरदार पाऊस बरसला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट हाेवून वेगाने वाहणाऱ्या वाहनासाेबत पाऊस बरसला.

ठळक मुद्देरबी पिकांचे नुकसान : आसगाव परिसराला वादळाचा तडाखा, तुरीच्या आकाराच्या गारा

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल हाेवून अवकाळी पाऊस बरसत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला तर भंडारा, साकाेली, लाखनी आणि माेहाडी तालुक्यांतील काही भागात गारांचा वर्षाव झाला. भंडारा शहरात तीन ते चार मिनीट तुरीच्या आकाराएवढ्या गारांसह अर्धा तास पाऊस बरसला. पवनी तालुक्यातील आसगाव परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला. मंगळवारपासून जिल्ह्यात वातावरणात बदल हाेवून ढगाळ वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागांत तर बुधवारी सकाळी भंडारा शहरासह तालुक्यात पाऊस बरसला. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह भंडारा शहरात तब्बल अर्धा तास जाेरदार पाऊस बरसला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट हाेवून वेगाने वाहणाऱ्या वाहनासाेबत पाऊस बरसला. यावेळी भंडारा शहराच्या काही भागात तुरीच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. यासाेबतच साकाेली, लाखनी आणि माेहाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. गारांचाही वर्षाव झाला. पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात गुरुवारी दुपारी २ वाजता वादळासह पावसाला सुरुवात झाली. यात रबी पीकांचे माेठे नुकसान झाले. शेतात उभी असलेली पिके जमिनीवर आडवी झाली तर कापणी झालेला चना, वटाणा, गहू, तूर, लाख, लाखाेरी आदी रबी पिकांसह कडपा ओल्या झाल्या. साधारणत: एक तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची झाेप उडाली. रबी पिकांचे चुरणे थांबले. गुरांचा चारा ओला झाला. त्यामुळे ताे काळा पडणार आहे. काही शेतकऱ्यांनी धानाचे पाेते रचून ठेवले हाेते. तेही ओले झाले. भंडारा तालुक्यातील पहेला परिसरात वादळीवाऱ्यासह दुपारी २ वाजेच्या सुमारास जाेरदार हजेरी लावली.लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसराला अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे बागायती शेतीसह कडधान्य पिकांचे नुकसान झाले. धान खरेदी केंद्रात सध्या उघड्यावर खरेदी सुरु आहे. हजाराें क्विंटल धान पावसात ओले झाले. गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आद्रता व गारव्यामुळे धान पिकाला खाेडकिडींचा त्रास हाेत आहे.लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. परिसरात अवकाळी पावसाने गुरुवारी दुपारी हजेरी लावली. रबी पिकांचा कडपा आणि जमा केलेल्या ढिगांमध्ये पाणी शिरुन माेठे नुकसान झाले. मुंग वाटाणा, उडीद, लाख, लाखाेरी आदी पीक काढणीचा हंगाम सुरु आहे. शेतात कडपा पसरलेला आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले. यासाेबतच जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. दिवसभर वातावरणात प्रचंड गारवा जाणवत हाेता.

शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट गत खरीप हंगामापासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. सुरुवातीला अतिवृष्टीनंतर महापूर आणि धान काढणीच्यावेळेस किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना रबी हंगामाकडून माेठी आशा आहे. उन्हाळी धानासह गहू, हरभरा, लाखाेरीतूर आदी पिकांची पेणी करण्यात आली. मात्र गत तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसत आहे. कापणी झालेले पीक ओले हाेत असून आधारभूत खरेदी केंद्राबाहेरील धानही ओले हाेत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती