शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांची पुन्हा निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:15 IST

आठवडा भरापूर्वी आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मोका पाहणीचे सरळ-सरळ (स्टँडींग) आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा पाहत असल्याने पंचनाम्याला सुरूवात झालेली नाही. परिणामी पंचनामे उशिरा होणार असतील तर मदत तरी कशी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे गारपीटग्रस्तांची पुन्हा घोर निराशा होणार आहे. आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना पुन्हा एकदा अधिकचा फटका सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : पंचनामे उशिरा होणार तर मदत लवकर कशी मिळणार?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठवडा भरापूर्वी आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मोका पाहणीचे सरळ-सरळ (स्टँडींग) आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा पाहत असल्याने पंचनाम्याला सुरूवात झालेली नाही. परिणामी पंचनामे उशिरा होणार असतील तर मदत तरी कशी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे गारपीटग्रस्तांची पुन्हा घोर निराशा होणार आहे.आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना पुन्हा एकदा अधिकचा फटका सहन करावा लागणार आहे.खरीप हंगामानंतर रबी पिकात फायदा होईल, या आशेने शेतकºयांनी कठाण पिकासह धानाची लागवड केली. मात्र आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात बरसलेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांचे कंबरडे मोडले. दुसरीकडे जिल्ह्यातील गोदामाबाहेर व धान खरेदी केंद्र परिसरात ठेवलेली शेकडो क्विंटल धान ओले झाले. त्याचाही फटका शेतकºयांना मोठ्या प्रमाणात बसला. अवकाळी पावसामुळे रबी पिकांमध्ये गहू, हरभरा, वाटाणा, लाखोरी मुंग आदी कठाण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हरभरा व गहू पीक वादळी वाºयामुळे अक्षरश: जमिनीवर झोपल्या गेले. मात्र त्याचवेळी मोका पंचनामे करण्यात आले नाहीत.सद्यस्थितीत येणाºया दिवसात प्रशासनाने पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला तरी त्याचा फायदा होणार नाही. भंडारा, पवनी, साकोली या तीन तालुक्यात अतिवृष्टीचीही नोंद करण्यात आली होती. मोहाडी तालुक्यात गारपिटीसह पाऊस बरसला होता. चौरास पट्ट्यात रबी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र वेळीच मोका चौकशी करण्यात आलेली नाही.धान झाले 'पाखर'अवकाळी पावसामुळे धान्य खरेदी केंद्रासमोर ठेवलेली धानाची शेकडो पोती ओली झाली. त्यामुळे धान ओले झाल्याने मिलिंग नंतर तांदळाची गुणवत्ता परिणामत: कमी होते. धान मिलिंग केल्यानंतर तांदूळ पाखर (बेचव) होत असतो. अशा धानाला भावही कमी मिळत असल्याने याचा सरळसरळ फटका शेतकºयांना बसतो. दुसरीकडे नुकसान झाल्याची भरपाईसुद्धा न मिळाल्याने शेतकºयांना दुहेरी फटका बसणार आहे.