शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गारपीटग्रस्तांची पुन्हा निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:15 IST

आठवडा भरापूर्वी आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मोका पाहणीचे सरळ-सरळ (स्टँडींग) आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा पाहत असल्याने पंचनाम्याला सुरूवात झालेली नाही. परिणामी पंचनामे उशिरा होणार असतील तर मदत तरी कशी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे गारपीटग्रस्तांची पुन्हा घोर निराशा होणार आहे. आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना पुन्हा एकदा अधिकचा फटका सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : पंचनामे उशिरा होणार तर मदत लवकर कशी मिळणार?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठवडा भरापूर्वी आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मोका पाहणीचे सरळ-सरळ (स्टँडींग) आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा पाहत असल्याने पंचनाम्याला सुरूवात झालेली नाही. परिणामी पंचनामे उशिरा होणार असतील तर मदत तरी कशी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे गारपीटग्रस्तांची पुन्हा घोर निराशा होणार आहे.आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना पुन्हा एकदा अधिकचा फटका सहन करावा लागणार आहे.खरीप हंगामानंतर रबी पिकात फायदा होईल, या आशेने शेतकºयांनी कठाण पिकासह धानाची लागवड केली. मात्र आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात बरसलेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांचे कंबरडे मोडले. दुसरीकडे जिल्ह्यातील गोदामाबाहेर व धान खरेदी केंद्र परिसरात ठेवलेली शेकडो क्विंटल धान ओले झाले. त्याचाही फटका शेतकºयांना मोठ्या प्रमाणात बसला. अवकाळी पावसामुळे रबी पिकांमध्ये गहू, हरभरा, वाटाणा, लाखोरी मुंग आदी कठाण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हरभरा व गहू पीक वादळी वाºयामुळे अक्षरश: जमिनीवर झोपल्या गेले. मात्र त्याचवेळी मोका पंचनामे करण्यात आले नाहीत.सद्यस्थितीत येणाºया दिवसात प्रशासनाने पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला तरी त्याचा फायदा होणार नाही. भंडारा, पवनी, साकोली या तीन तालुक्यात अतिवृष्टीचीही नोंद करण्यात आली होती. मोहाडी तालुक्यात गारपिटीसह पाऊस बरसला होता. चौरास पट्ट्यात रबी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र वेळीच मोका चौकशी करण्यात आलेली नाही.धान झाले 'पाखर'अवकाळी पावसामुळे धान्य खरेदी केंद्रासमोर ठेवलेली धानाची शेकडो पोती ओली झाली. त्यामुळे धान ओले झाल्याने मिलिंग नंतर तांदळाची गुणवत्ता परिणामत: कमी होते. धान मिलिंग केल्यानंतर तांदूळ पाखर (बेचव) होत असतो. अशा धानाला भावही कमी मिळत असल्याने याचा सरळसरळ फटका शेतकºयांना बसतो. दुसरीकडे नुकसान झाल्याची भरपाईसुद्धा न मिळाल्याने शेतकºयांना दुहेरी फटका बसणार आहे.