शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भंडारा येथे पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात निवेदनांचा पाऊस, संपूर्ण धान खरेदी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 15:50 IST

यावेळी आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी नागरीकांचे निवेदन स्वीकारुन तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला सोपविले.

भंडारा : नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आयोजित केलेल्या आजच्या जनता दरबारात निवेदनाचा अक्षरशः पाऊस पडला. धान खरेदी, गोसे पुनर्वसन, शिक्षण, अंशकालीन पद भरती, खासगी शाळेतील फी वाढ व पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान या समस्यांचा यात प्रामुख्याने समावेश होता. यावेळी, आलेल्या प्रत्येक निवेदनावर त्या-त्या विभागाने कार्यवाही करून पंधरा दिवसाच्या आत लेखी उत्तर दयावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत..

यावेळी आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी नागरीकांचे निवेदन स्वीकारुन तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला सोपविले.

निवेदन घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन व त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन पालकमंत्र्यांनी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. शेकडो नागरिकांनी लेखी निवेदन सादर करून जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या. 

यावेळी धान खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात निवेदने प्राप्त झाली. धान उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण धान खरेदी करण्यात येईल. कोणाचेही धान शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. धान भरडाई बाबत 3 फेब्रुवारी रोजी मुंबईत महत्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत योग्य तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून पुनर्वसित गावात मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. दूध संघाच्या समस्यांसंदर्भात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्र्यांशी भेटून चर्चा करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे नुकसान झाले आहे. काही पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याचे निवेदनावर तत्काळ अनुदान वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. पूल व रस्ते याबाबतही यावेळी नागरिकांनी निवेदन दिली. तुमसर तालुक्यात असलेल्या दोन राज्याला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचा प्रश्न यावेळी काही नागरिकांनी मांडल्या. यावर तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. होमगार्डना 1 फेब्रुवारीपासून नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नागरिकांनी प्रश्न मांडला. प्रधानमंत्री आवास योजनेत घरकूल मिळण्यासाठी निवेदन, नौकरी, शिक्षण, फुटपाथ दुकानदार, वीज पुरवठा, कृषी पंप जोडणी, पीक विमा लाभ, दिव्यांग योजनांचा लाभ, वन विभागाचे पट्टे, आदी विषयावरील निवेदन यावेळी सादर करण्यात आली. या सगळ्या निवेदनावर संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदम