शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

हमीभाव धान विक्री नोंदणी अडचणीत; ॲप काम करेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 11:31 IST

केंद्रांवर शेतकरी ताटकळत : नोंदणीसाठी मुदत वाढविण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा विधानसभा निवडणुकांमुळे शासनाने हमीभाव धान नोंदणी, उचल व भरडाईची मंजुरी एकाचवेळी दिली. यंदा जिल्ह्यात हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्री नोंदणीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. परंतु, नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धान विक्री नोंदणीची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर असल्याने या मुदतीत वाढ करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात अनेक हमीभाव केंद्रांवर नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याने शेतकऱ्यांना शेती कामे सोडून नोंदणीसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. सध्या धान कापणी व मळणीची कामे जोमात आहेत. असे असताना हमीभाव केंद्रांवर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन आहे. यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात आले आहे. यावर्षी ॲपमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. केंद्र चालकांना बरीच माहिती व कागदपत्रे अपलोड करावी लागत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे लागत आहे. 

नोंदणीसाठी लागतात सरासरी २० मिनिटे धान विक्री नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याने नोंदणी प्रक्रियेला बराच वेळ लागत आहे. एका शेतकऱ्याच्या नोंदणीसाठी सरासरी २० मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. दिवसभरात जास्तीत ३० ते ४० शेतकऱ्यांचीच नोंदणी होत आहे. मात्र, केंद्रावर दरदिवशी शेकडो शेतकरी दाखल होते आहेत. गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज स्वीकारल्यानंतर टोकन क्रमांक दिला जात आहे.

शासनाच्या लाभासाठी नोंदणी गरजेची शेतकऱ्यांचा होणारा त्रास वाचविण्यासाठी नोंदणी केंद्र चालकांकडून टोकन देत दोन ते चार दिवसांनंतर केंद्रावर नोंदणीसाठी येण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन ते चार चकरा माराव्या लागतात. शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाचा अथवा बोनसचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी आवश्यक असते.

गतवर्षीही मिळाली होती मुदतवाढ यंदा हमीभाव धान विक्री नोंदणीसाठी अंतिम दि. १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे मुदतीत नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. मात्र, जोपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे. गतवर्षीही फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली होती.

व्यापाऱ्यांकडून होतेय शेतकऱ्यांची लूटधान विक्रीसाठी नोंदणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर धान खरेदीला प्रारंभ होणार आहे. परंतु, पैशाची गरज भागविण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या चक्रव्यूहात फसताना दिसत आहेत. व्यापाऱ्यांकडून कमी दरात धानाची खरेदी केली जात आहे. व्यापाऱ्यांचे दलाल सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. 

"जिल्ह्यात धान विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अनेक केंद्रांवरील ॲप काम करीत नाही. त्यामुळे प्रक्रियेला विलंब लागत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने नोंदणीची मुदत वाढविणे गरजेचे आहे."- आकाश गायधने, शेतकरी, मोहाडी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा