शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

हमीभाव धान विक्री नोंदणी अडचणीत; ॲप काम करेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 11:31 IST

केंद्रांवर शेतकरी ताटकळत : नोंदणीसाठी मुदत वाढविण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा विधानसभा निवडणुकांमुळे शासनाने हमीभाव धान नोंदणी, उचल व भरडाईची मंजुरी एकाचवेळी दिली. यंदा जिल्ह्यात हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्री नोंदणीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. परंतु, नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धान विक्री नोंदणीची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर असल्याने या मुदतीत वाढ करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात अनेक हमीभाव केंद्रांवर नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याने शेतकऱ्यांना शेती कामे सोडून नोंदणीसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. सध्या धान कापणी व मळणीची कामे जोमात आहेत. असे असताना हमीभाव केंद्रांवर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन आहे. यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात आले आहे. यावर्षी ॲपमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. केंद्र चालकांना बरीच माहिती व कागदपत्रे अपलोड करावी लागत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे लागत आहे. 

नोंदणीसाठी लागतात सरासरी २० मिनिटे धान विक्री नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याने नोंदणी प्रक्रियेला बराच वेळ लागत आहे. एका शेतकऱ्याच्या नोंदणीसाठी सरासरी २० मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. दिवसभरात जास्तीत ३० ते ४० शेतकऱ्यांचीच नोंदणी होत आहे. मात्र, केंद्रावर दरदिवशी शेकडो शेतकरी दाखल होते आहेत. गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज स्वीकारल्यानंतर टोकन क्रमांक दिला जात आहे.

शासनाच्या लाभासाठी नोंदणी गरजेची शेतकऱ्यांचा होणारा त्रास वाचविण्यासाठी नोंदणी केंद्र चालकांकडून टोकन देत दोन ते चार दिवसांनंतर केंद्रावर नोंदणीसाठी येण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन ते चार चकरा माराव्या लागतात. शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाचा अथवा बोनसचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी आवश्यक असते.

गतवर्षीही मिळाली होती मुदतवाढ यंदा हमीभाव धान विक्री नोंदणीसाठी अंतिम दि. १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे मुदतीत नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. मात्र, जोपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे. गतवर्षीही फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली होती.

व्यापाऱ्यांकडून होतेय शेतकऱ्यांची लूटधान विक्रीसाठी नोंदणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर धान खरेदीला प्रारंभ होणार आहे. परंतु, पैशाची गरज भागविण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या चक्रव्यूहात फसताना दिसत आहेत. व्यापाऱ्यांकडून कमी दरात धानाची खरेदी केली जात आहे. व्यापाऱ्यांचे दलाल सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. 

"जिल्ह्यात धान विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अनेक केंद्रांवरील ॲप काम करीत नाही. त्यामुळे प्रक्रियेला विलंब लागत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने नोंदणीची मुदत वाढविणे गरजेचे आहे."- आकाश गायधने, शेतकरी, मोहाडी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा