शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची धडधड वाढली

By admin | Updated: June 20, 2016 00:27 IST

मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस येईल, अशा आशेवर शेतकरी होते. हवामान खात्यानेही सुरूवातीपासून दमदार पाऊस होईल, ...

रिमझीम पाऊस : मोठ्या पावसाची प्रतीक्षातुमसर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस येईल, अशा आशेवर शेतकरी होते. हवामान खात्यानेही सुरूवातीपासून दमदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, मृग नक्षत्रानेही शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. हवामानात बदल झाल्याने शुक्रवारला रिमझीम पावसाने जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र अजुनपर्यंत जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. पावसाने जमिनीत टाकलेले महागडे बियाणे जमिनीतच करपण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांनी शेतकरी होरपळला जात आहे. कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट आहे. देशातील ७० टक्के शेती आजही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आजकाल निसर्गही लहरीपणाने वागायला लागला आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालल्याने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतो आहे. कर्जातच जन्म घ्यायला आणि आयुष्याची सायंकाळ कर्जाच्या खाईतच करायची, असा शेतकऱ्यांसोबतच चालत आलेला नियम आजतागायत कायम आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हात जिवाची जराही तमा न बाळगता लगबगीने पेरणीपूर्व मशागत केली. बाकीची सारी कामे बाजूला सारत शेतीचा हंगाम पूर्ण केला. जून महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात बदल झाल्याने यावर्षी मृग नक्षत्र सुरूवातीपासूनच बरसेल, अशी आस भोळ्याबापड्या शेतकऱ्यांना होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पाऊस येण्यापूर्वीच महागडे बियाणे जमिनीत टाकले. त्यानंतर जुन्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात दोन दिवस रिमझिम पावसाला सुरूवात झाली. मात्र त्यानंतर पाऊस कायमचा गायब झाला. पावसापूर्वीच जमिनीत टाकलेले महागडे बियाणे अपूऱ्या पावसामुळे व उन्हामुळे जमिनीची उब होऊन करपून गेले. उसनवारी व कर्ज घेऊन महागडे बियाणे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली. तुरळक पावसाने शेतकऱ्यांचा घात केला आहे. शेतकरी जिवाचे रान करीत आहे.बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर शेती करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार व ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून पीक वाचविण्याची धडपड चालविली आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही या शेतकऱ्यांची करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निसर्गाच्या पाण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरला नाही. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)धूळ पेरण्या पावसाअभावी उलटणारमृग नक्षत्राचे १२ दिवस कोरडे : अंदाज चुकल्याने शेतकरी चिंतेतलाखनी/पालांदूर : हवामान खात्याने यंदा दमदार पावसाचा अंदाज वर्तविला मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रात्री काही भागात मान्सूनपूर्व बरसल्याने काही ठिकाणी धूळपेरण्या आटोपल्या. पण आता बारा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने धूळपेरण्या उलटण्याचा धोका व्यक्त होत आहे. दुष्काळी चटके सहन करणाऱ्या संकटात यानिमित्ताने भर पडणार आहे.पावसाचा अंदाज घेऊन दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी धूळपेरणी करतात. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे फावत असल्याने अनेक वर्षांपासून हे केले जात आहे. यंदा वेधशाळेने तसेच स्लायमेटने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला. शेतकरी उत्साहाने मशागतीच्या कामाला लागला मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी धूळपेरण्या केल्या, पण नंतर पाऊस झालाच नाही. अंदाज चुकल्याने धूळपेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.मृग कोरडे जाणार काय या काळजीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. किमान ७५ मि. मी.पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण हंगाम लांबण्याच्या भीतीपोटी शेतकरी हा धोका पत्करत असल्याचेही सांगण्यात येते. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)