शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शेतकऱ्यांची धडधड वाढली

By admin | Updated: June 20, 2016 00:27 IST

मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस येईल, अशा आशेवर शेतकरी होते. हवामान खात्यानेही सुरूवातीपासून दमदार पाऊस होईल, ...

रिमझीम पाऊस : मोठ्या पावसाची प्रतीक्षातुमसर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस येईल, अशा आशेवर शेतकरी होते. हवामान खात्यानेही सुरूवातीपासून दमदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, मृग नक्षत्रानेही शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. हवामानात बदल झाल्याने शुक्रवारला रिमझीम पावसाने जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र अजुनपर्यंत जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. पावसाने जमिनीत टाकलेले महागडे बियाणे जमिनीतच करपण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांनी शेतकरी होरपळला जात आहे. कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट आहे. देशातील ७० टक्के शेती आजही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आजकाल निसर्गही लहरीपणाने वागायला लागला आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालल्याने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतो आहे. कर्जातच जन्म घ्यायला आणि आयुष्याची सायंकाळ कर्जाच्या खाईतच करायची, असा शेतकऱ्यांसोबतच चालत आलेला नियम आजतागायत कायम आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हात जिवाची जराही तमा न बाळगता लगबगीने पेरणीपूर्व मशागत केली. बाकीची सारी कामे बाजूला सारत शेतीचा हंगाम पूर्ण केला. जून महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात बदल झाल्याने यावर्षी मृग नक्षत्र सुरूवातीपासूनच बरसेल, अशी आस भोळ्याबापड्या शेतकऱ्यांना होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पाऊस येण्यापूर्वीच महागडे बियाणे जमिनीत टाकले. त्यानंतर जुन्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात दोन दिवस रिमझिम पावसाला सुरूवात झाली. मात्र त्यानंतर पाऊस कायमचा गायब झाला. पावसापूर्वीच जमिनीत टाकलेले महागडे बियाणे अपूऱ्या पावसामुळे व उन्हामुळे जमिनीची उब होऊन करपून गेले. उसनवारी व कर्ज घेऊन महागडे बियाणे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली. तुरळक पावसाने शेतकऱ्यांचा घात केला आहे. शेतकरी जिवाचे रान करीत आहे.बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर शेती करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार व ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून पीक वाचविण्याची धडपड चालविली आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही या शेतकऱ्यांची करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निसर्गाच्या पाण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरला नाही. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)धूळ पेरण्या पावसाअभावी उलटणारमृग नक्षत्राचे १२ दिवस कोरडे : अंदाज चुकल्याने शेतकरी चिंतेतलाखनी/पालांदूर : हवामान खात्याने यंदा दमदार पावसाचा अंदाज वर्तविला मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रात्री काही भागात मान्सूनपूर्व बरसल्याने काही ठिकाणी धूळपेरण्या आटोपल्या. पण आता बारा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने धूळपेरण्या उलटण्याचा धोका व्यक्त होत आहे. दुष्काळी चटके सहन करणाऱ्या संकटात यानिमित्ताने भर पडणार आहे.पावसाचा अंदाज घेऊन दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी धूळपेरणी करतात. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे फावत असल्याने अनेक वर्षांपासून हे केले जात आहे. यंदा वेधशाळेने तसेच स्लायमेटने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला. शेतकरी उत्साहाने मशागतीच्या कामाला लागला मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी धूळपेरण्या केल्या, पण नंतर पाऊस झालाच नाही. अंदाज चुकल्याने धूळपेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.मृग कोरडे जाणार काय या काळजीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. किमान ७५ मि. मी.पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण हंगाम लांबण्याच्या भीतीपोटी शेतकरी हा धोका पत्करत असल्याचेही सांगण्यात येते. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)