शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची धडधड वाढली

By admin | Updated: June 20, 2016 00:27 IST

मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस येईल, अशा आशेवर शेतकरी होते. हवामान खात्यानेही सुरूवातीपासून दमदार पाऊस होईल, ...

रिमझीम पाऊस : मोठ्या पावसाची प्रतीक्षातुमसर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस येईल, अशा आशेवर शेतकरी होते. हवामान खात्यानेही सुरूवातीपासून दमदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, मृग नक्षत्रानेही शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. हवामानात बदल झाल्याने शुक्रवारला रिमझीम पावसाने जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र अजुनपर्यंत जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. पावसाने जमिनीत टाकलेले महागडे बियाणे जमिनीतच करपण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांनी शेतकरी होरपळला जात आहे. कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट आहे. देशातील ७० टक्के शेती आजही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आजकाल निसर्गही लहरीपणाने वागायला लागला आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालल्याने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतो आहे. कर्जातच जन्म घ्यायला आणि आयुष्याची सायंकाळ कर्जाच्या खाईतच करायची, असा शेतकऱ्यांसोबतच चालत आलेला नियम आजतागायत कायम आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हात जिवाची जराही तमा न बाळगता लगबगीने पेरणीपूर्व मशागत केली. बाकीची सारी कामे बाजूला सारत शेतीचा हंगाम पूर्ण केला. जून महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात बदल झाल्याने यावर्षी मृग नक्षत्र सुरूवातीपासूनच बरसेल, अशी आस भोळ्याबापड्या शेतकऱ्यांना होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पाऊस येण्यापूर्वीच महागडे बियाणे जमिनीत टाकले. त्यानंतर जुन्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात दोन दिवस रिमझिम पावसाला सुरूवात झाली. मात्र त्यानंतर पाऊस कायमचा गायब झाला. पावसापूर्वीच जमिनीत टाकलेले महागडे बियाणे अपूऱ्या पावसामुळे व उन्हामुळे जमिनीची उब होऊन करपून गेले. उसनवारी व कर्ज घेऊन महागडे बियाणे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली. तुरळक पावसाने शेतकऱ्यांचा घात केला आहे. शेतकरी जिवाचे रान करीत आहे.बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर शेती करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार व ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून पीक वाचविण्याची धडपड चालविली आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही या शेतकऱ्यांची करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निसर्गाच्या पाण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरला नाही. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)धूळ पेरण्या पावसाअभावी उलटणारमृग नक्षत्राचे १२ दिवस कोरडे : अंदाज चुकल्याने शेतकरी चिंतेतलाखनी/पालांदूर : हवामान खात्याने यंदा दमदार पावसाचा अंदाज वर्तविला मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रात्री काही भागात मान्सूनपूर्व बरसल्याने काही ठिकाणी धूळपेरण्या आटोपल्या. पण आता बारा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने धूळपेरण्या उलटण्याचा धोका व्यक्त होत आहे. दुष्काळी चटके सहन करणाऱ्या संकटात यानिमित्ताने भर पडणार आहे.पावसाचा अंदाज घेऊन दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी धूळपेरणी करतात. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे फावत असल्याने अनेक वर्षांपासून हे केले जात आहे. यंदा वेधशाळेने तसेच स्लायमेटने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला. शेतकरी उत्साहाने मशागतीच्या कामाला लागला मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी धूळपेरण्या केल्या, पण नंतर पाऊस झालाच नाही. अंदाज चुकल्याने धूळपेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.मृग कोरडे जाणार काय या काळजीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. किमान ७५ मि. मी.पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण हंगाम लांबण्याच्या भीतीपोटी शेतकरी हा धोका पत्करत असल्याचेही सांगण्यात येते. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)