शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दादासाहेबांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी

By admin | Updated: July 26, 2015 01:08 IST

बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई उपाख्य दादासाहेब यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले.

भंडारा : बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई उपाख्य दादासाहेब यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले. गवई ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची फार मोठी हानी झाल्याची भावना सर्वस्तरावरुन व्यक्त होत आहे. विद्वान नेतृत्व हरपलामहामहिम रा. सू. गवई हे राजकारणातील विद्वान होते. त्यांनी देशासाठी केलेले कार्य अभिमानास्पद आहे. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.-नाना पटोले, खासदारसरसेनापती हरवलादलित समाजाची चळवळ यशस्वीपणे राबविणारा सरसेनापती हरवल्याने दलित समाज पोरका झाला आहे. त्यांची ही उणीव भरुन निघणे अशक्य आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत असलेला शेवटचा तारा निखडला आहे.-हर्षल मेश्राम, भंडारादादासाहेब म्हणजे विचारांचा ठेवादेशातील अन्य राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची जवाबदारी सर्वांपेक्षा मोठी आहे. कारण रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकिय, सामाजिक व धार्मिक अशा तिनही आघाड्यावर लढावे लागते, असा मोलाचा संदेश आम्हा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना देणारे महामहिम दादासाहेब गवई यांच्या नेतृत्वात कार्य करण्याची संधी लाभली. दादासाहेबांच्या निधनाने आंबेडकर चळवळीची व रिपब्लिकन आंदोलनाची फार मोठी हानी झाली आहे.-असित बागडे, जिल्हा महासचिव, रिपाइं(ए),भंडारादलित चळवळ पुढे घेऊन जाण्यात महत्त्वाचे योगदान दादासाहेबांच्या जाण्याने दलित चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. मी या नेत्याला सलाम करतो, दलित चळवळ पुढे घेऊन जाण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. दीक्षाभूमीच्या उभारणीतही त्यांचे योगदान आहे.-यशवंत नंदेश्वर, भंडाराकार्य सदैव स्मरणात राहतीलदलितांच्या प्रश्नांसाठी सतत अस्वस्थ राहणारा नेता आम्ही गमावला. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली. त्यांनी देशासाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहतील. -युवराज रामटेके प्रेमाची उब देणारे दादासाहेबांना सलामबाबासाहेबांची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे महामहीम रा.सु. गवई उपाख्य दादासाहेबांचे भंडारा जिल्ह्यातच नाही तर देशभरात त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना प्रेमाची उब दिली आहे. कार्यकर्त्यांना नेहमी मार्गदर्शन करून देशसेवा करण्याचा मोलाचा संदेश ते नेहमी देत असत. नेहमी ते सुख-दुख:त ते पाठीशी राहत होते.-वसंतराव हुमणे, भंडारातारा निखळलाबाबासाहेबांच्या विचार प्रणालीने चालून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून विकासधारेत आणण्यासाठी दादासाहेबांचे कार्य महान आहे. आंबेडकरी समाज हे कदापी विसरू शकणार नाही. त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.-महेंद्र गडकरी, भंडारा