शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रामवन’ ही वनविभागाची सर्वोत्कृष्ट योजना

By admin | Updated: March 6, 2017 00:17 IST

रामवनातील लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी वनविभागाने ग्रामवन ही योजना अस्तित्वात आणली आहे.

चरण वाघमारे : ८६१ कोटींचा प्रस्ताव सादर, आलेसूर येथील कार्यक्रमभंडारा : ग्रामवनातील लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी वनविभागाने ग्रामवन ही योजना अस्तित्वात आणली आहे. भंडारा जिल्ह्यात वनविभागाने १२४ ग्रामवन समित्या स्थापन करून उत्कृष्ट कार्य केले आहे .यासोबतच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तुमसर तालुक्यात सर्वाधिक कामे मंजूर झालेली आहेत. याचा फायदा ग्रामस्थांना मिळणार आहे. ग्रामवन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला गॅस कनेक्शन मिळणार असल्याने जळावू इंधनाचा प्रश्न मिटणार आहे. ग्रामवन ही योजना वनविभागाची सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.लेंडेझरी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आलेसूर येथे ग्रामवन जनजागृती कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहाय्यक उपवनसंरक्षक पी.जी. कोडापे, चोपकर, मनोहर गोखले, जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी वाघमारे यांनी वनविभागाच्या ग्रामवन विकासाकरिता ८६१ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो मंजूर करण्याकरिता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून तो निधी खेचून आणण्याचे प्रतिपादन त्यांनी केले. उमेश वर्मा यांनी ग्रामवनाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला गॅस कनेक्शनचा पुरवठा व सौर चुल वाटप करण्यात येईल. युवक युवतींना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, ज्या गावांमध्ये ग्रामवन समिती स्थापन झालेली आहे त्या गावांचा वनक्षेत्र ग्रामवन समितीला हस्तांतरीत करण्यात येणार असून जंगलांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामवन समितीची राहणार आहे. या जंगलातून मिळणारे उत्पन्न ग्रामवन समितीला देण्यात येणार असून निसर्ग पर्यटनाचा विकास करण्यासाठी चांदपूर, गायमुख, रावणवाडी, पिटेझरी या गावांचा शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. सोबतच शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळावा यासाठी वनविभाग प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तत्पुर्वी आमदार वाघमारे व उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी वटवृक्षाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली. भंडारा वनविभागाने वनालगतच्या १२४ गावांचे ग्रामवनाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले असून त्याला हिरवी झेंडी मिळाली आहे. या कार्यक्रमांतर्गत वनविभागामार्फत प्रशिक्षण देऊन रोजगार प्राप्त केलेल्या युवक युवतींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मान्यवरांनी वनरक्षक ललीत उचिबगले व औषधी वनस्पती तज्ज्ञ यांनी लावलेल्या औषधी वनस्पती प्रदर्शनीला भेट दिली. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते ग्रामवन समितीच्या अध्यक्षांना ग्रामवन नोंदणी पत्र व एलपीजी गॅस तथा सौर कुंपणाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला वनपरिक्षेत्राधिकारी मडावी, माकडे, सोशल मोबीलायझर ए.पी. येसनसुरे, वनपाल, वनरक्षक, वनमजूर तथा ग्रामस्थांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)