शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

ग्रंथोत्सवातून समाजाला वैचारिक भूमिका मिळावी

By admin | Updated: February 14, 2016 00:43 IST

जगण्याला बळ देणारे, संभ्रमावस्थेत दिशा दाखविणारे आणि अशांत मन शांत करणारे साहित्य माणसा-माणसांना जोडत असते.

प्रकाश एदलाबादकर : ग्रंथोत्सवाचे थाटात उदघाटनभंडारा : जगण्याला बळ देणारे, संभ्रमावस्थेत दिशा दाखविणारे आणि अशांत मन शांत करणारे साहित्य माणसा-माणसांना जोडत असते. आज आपल्या प्रवृत्तीमुळे आपण थोर संत आणि समाजसुधारकांची सुध्दा जाती आणि धर्मामध्ये विभागणी केली आहे. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून समाजाला नवीन दिशा मिळावी. येथील जनतेला वैचारिक भूमिका मिळावी आणि ग्रंथातून जीवनाचे तत्त्वज्ञान समजावे, यासाठी ग्रंथालयाचा धांडोळा घेऊन त्यातील ज्ञान आत्मसात करायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व साहित्यिक प्रकाश एदलाबादकर यांनी केले. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा ग्रंथोत्सव २०१५ चे आयोजन नगर परिषद महात्मा गांधी विद्यालय येथे करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. या निमित्ताने १३, १४ आणि १५ फेब्रुवारी या तीन दिवसीय ग्रंथोत्सवादरम्यान ग्रंथ प्रदर्शन व विक्री यासोबत विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी राहणार आहे. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांच्याहस्ते पुस्तकांच्या स्टॉल व ग्रंथोत्सवाचे उदघाटन झाले. प्रसंगी प्रा.विनोद मेश्राम, नीळकंठ रणदिवे, वामन तुरिले, जयश्री सातोकर, सत्तार खान, मुख्याध्यापक बी. जी. वाघाये, हर्षल मेश्राम, निरंजन शिवणकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते. यावेळी एदलाबादकर म्हणाले, नवीन पिढीमध्ये भाषेच्या ज्ञानासोबत वाचनाची आवडही कमी होत आहे. या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आतिशय आवश्यक आहे. संस्कृतीपासून दुरावणारी माणसे जोडायाची असतील तर ग्रंथासारखा दुसरा मित्र नाही. वाचनाने बुध्दी समृध्द होते. पुस्तकात माणसांच्या विचाराची दिशा बदलविण्याची शक्ती आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज यांच्या कवितांचा आधार घेत एदलाबादकर यांनी आजच्या बदलत्या परिस्थितीवर परखड भाष्य केले. अमित मेश्राम म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांचा आणि वाचनाचा संबंध केवळ शासन निर्णयापुरता राहिला आहे. आजच्या ‘टेक्नोसॅव्ही’ पिढीचा विचार करता ई- बुक्स, ई-साहित्य निर्मितीची गरज आहे. ग्रथांलयांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ई- ग्रंथालय निर्मितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी ग्रंथोत्सवाविषयी माहिती दिली. आभारप्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी केले. सकाळी गांधी विद्यालयातून ग्रंथदिडी निघाली. समाजकल्याण सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे यांनी ग्रंथाचे पूजन करुन ग्रंथ दिंडी मार्गस्थ केली. यावेळी महात्मा गांधी विद्यालय व भागिरथा भास्कर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत लेझिम नृत्य सादर केले. (नगर प्रतिनिधी)