शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

ग्रामसेवक, शिक्षकांचा ग्रामसभेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:02 IST

आॅनलाईन लोकमतभंडारा : शासकीय सुट्टीच्या दिवशी ग्रामसभा घेऊ नये. शासकीय सुट्टी असल्याने यादिवशी कर्मचाऱ्यांना ग्रामसभेचे काम न देता अन्य कार्यालयीन कामाच्या दिवशी या सभा बोलवाव्या, अशी मागणी करून २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभेवर जिल्ह्यातील ग्रामसेवक व शिक्षक बहिष्कार घालीत असल्याचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन व ...

ठळक मुद्देसंघटनेचे निवेदन : सुट्टीच्या दिवशी ग्रामसभा न घेण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : शासकीय सुट्टीच्या दिवशी ग्रामसभा घेऊ नये. शासकीय सुट्टी असल्याने यादिवशी कर्मचाऱ्यांना ग्रामसभेचे काम न देता अन्य कार्यालयीन कामाच्या दिवशी या सभा बोलवाव्या, अशी मागणी करून २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभेवर जिल्ह्यातील ग्रामसेवक व शिक्षक बहिष्कार घालीत असल्याचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने हे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देऊन ग्रामसभेवर बहिष्कार टाकणार असल्याची पुर्वकल्पना दिली आहे.ग्रामसेवक युनियनमहाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष दिगांबर गभने, सरचिटणीस जयेश वेदी, राज्यसंघटक विलास खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, महात्मा गांधी जयंती यादिवशी गावागावांमध्ये ग्रामसभा घेण्याचे शासनाचे निर्देश आहे.मात्र सार्वजनिक सुट्टी असल्याने ग्रामसभेला ग्रामसेवक वगळता अन्य कुठल्याही विभागाचे कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी वातावरण तापून दप्तरांची पळवापळवी व ग्रामसेवकांना दमदाटीचा प्रकार यापुर्वी घडला असल्याने २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभा रद्द कराव्या अन्यथा ग्रामसेवकांकडून यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.प्राथमिक शिक्षक संघप्रजासत्ताक दिनाच्या निमित्त गावात होणाऱ्या ग्रामसभेतून विकासाचे कामे, विकास आराखडा आदींची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र यापूर्वी ग्रामसेवकांवर घडलेल्या घटनेमुळे यावर्षी ग्रामसेवकांनी बहिष्कार घातला आहे. याशिवाय शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदीनुसार व आरटीईनुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, अशा शासनाच्या सुचना आहेत. त्यामुळे २६ जानेवारीला जिल्ह्यात होवू घातलेल्या ग्रामसभावर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने बहिष्कार घालण्यात येत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले आहे.जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, केशव बुरडे यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर दमाहे, नरेश कोल्हे, अशोक ठाकरे, विजय चाचीरे, केशव अतकरी, कैलास चव्हाण, जे.एम. पटोले, नेपाल तुरकर, बी.जी. भुते, किशोर ईश्वरकर, रमेश फटे, अरुण बघेले, यशपाल बघमारे, सुरेश कोरे, रवि उगलमुगले, नरेंद्र रामटेके आदी उपस्थित होते.