शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ग्रामपंचायत तिजोरीत दुष्काळ

By admin | Updated: September 15, 2015 00:39 IST

ग्रामपंचायतीच्या तिजोरीत येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर ब्रेक लावण्यात आल्याने अल्प लोकवस्तीच्या असणाऱ्या ग्राम पंचायतीत दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे.

१३ वा वित्त आयोग गुंडाळला : सामान्य फंड रिकामा, असंतोषाचा पोळा फुटणाररंजित चिचखेडे चुल्हाड(सिहोरा)ग्रामपंचायतीच्या तिजोरीत येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर ब्रेक लावण्यात आल्याने अल्प लोकवस्तीच्या असणाऱ्या ग्राम पंचायतीत दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. सिहोरा परिसरातील गावात विकास कामे प्रभावित झाली आहेत. यातच आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या असल्याची प्रतिक्रिया आहेत.सिहोरा परिसरात ४७ गावे असून ग्रामपंचायती आहेत. बपेरा, चुल्हाड, हरदोली आणि सिहोरा गावे वगळता अन्य गावात दुष्काळाचे चित्र आहे. दोन हजारपेक्षा कमी लोकवस्तीच्या गावात आर्थिक स्त्रोत निर्मितीचे साधने नाहीत. यामुळे या ग्रामपंचायतीचे मासीक सभा चहापान विना सुरु आहेत. शासनाने १३ वा वित्त गुंडाळला आहे. १४ व्या वित्त आयोगाचे पुर्नगठन केले आहे. लोकसंख्येच्या आधारावर या आयोग अंतर्गत निधी उपलब्ध केला जाणार आहे. परंतु या आयोगाचे बचत खाते उघडण्यात आली असतांना निधी प्राप्त झाला नाही. शासनाचे परिपत्रक प्राप्त झाले आहे. खर्चित आराखडा प्राप्त झाला नाही. विकासाच्या प्रवाहात गावांना आणण्यासाठी तिजोरीचा पिटारा उघडण्यात आला होता. परंतु या योजनेला ब्रेक देण्यात आले आहे. या शिवाय घर कर मागणीवर सध्या बंदी असल्याने सामान्य फंडात जमा होणारा हा निधी दूर गेला आहे. गावात नळ योजना आहे. यामुळे पाणी पट्टी कराची राशी गोळा करण्यात येत आहे. परंतु ही राशी वीज बिलाचे देयक, देखभाल दुरुस्ती आदीवर खर्च केली जात आहे.या आधी विकास कामे, बांधकाम मधून पाच टक्के राशी ग्रामपंचायतीना प्राप्त करण्याची तरतूद होती. ही प्रथायादीच बंद करण्यात आली आहे. या परिसरात एका गावाची लोकवस्ती ६०० च्या घरात असून वार्षिक उत्पन्न ७७ हजार रुपये आहे. याशिवाय कर्मचारी, स्टेशनरी, विद्युत बिल, चहा पान, विद्युत खर्च अशा कामाचा वार्षिक खर्च अंदाजे १ लाख २९ हजार रुपये आहे. गावकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सरपंचांनी उसनवारीची ब्लिचिंग पावडरची खरेदी केली आहे. या राशी प्राप्तीकरिता व्यवसायीक तगादा लावत आहेत. ग्रामपंचायत तिजोरीत उलटफेर करण्याचा प्रयत्न सरपंचाचा आहे. परंतु निधीच नसल्याने सरपंच तोंडघशी पडले आहेत. निधी अभावी सार्वजनिक दिवाबत्ती प्रभावित झाली आहे. बल्प घेण्यासाठी व्यवसायीकांना अजीजी करण्याची पाळी आली आहे. कोंडवाडा हे आर्थिक उत्पन्नाचे साधन होते. कोंडवांडे आता कोसळली असून जनावरे ही या कोंडवाड्यापासून कोसो दूर गेली आहे. गावात सिमेंट रस्ते, नाली, शासकीय इमारती, सभामंडप, अंगणवाडी, शाळाचे बांधकाम चकाचक झाली आहे. गावात हे काम करण्यासाठी जागा नाही. लोकप्रतिनिधींचे स्थानिक निधी अंतर्गत गावात तीन लाख खर्चाचे सभामंडपाची खैरात वाटण्यात आली आहे. आधी बांधकाम करण्यात आलेल्या सभामंडपात जनावरांचे बैठकीचे साधन झाली आहे. प्रवाशी निवारांचे पुनर्जीवित करण्यासाठी मायबाप लोकप्रतिनिधी सापडत नाही. हा प्रवासी निवारा निधीअभावी वांझोटा ठरत असताना कुणाचे लक्ष नाही. हातपंपाला गढूळ पाणी येत आहे. या पाण्यावर बंदी आणली जात नाही. या शिवाय नवीन हातपंपाचे नियोजन नाही. (वार्ताहर)