शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

ग्रामपंचायत तिजोरीत दुष्काळ

By admin | Updated: September 15, 2015 00:39 IST

ग्रामपंचायतीच्या तिजोरीत येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर ब्रेक लावण्यात आल्याने अल्प लोकवस्तीच्या असणाऱ्या ग्राम पंचायतीत दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे.

१३ वा वित्त आयोग गुंडाळला : सामान्य फंड रिकामा, असंतोषाचा पोळा फुटणाररंजित चिचखेडे चुल्हाड(सिहोरा)ग्रामपंचायतीच्या तिजोरीत येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर ब्रेक लावण्यात आल्याने अल्प लोकवस्तीच्या असणाऱ्या ग्राम पंचायतीत दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. सिहोरा परिसरातील गावात विकास कामे प्रभावित झाली आहेत. यातच आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या असल्याची प्रतिक्रिया आहेत.सिहोरा परिसरात ४७ गावे असून ग्रामपंचायती आहेत. बपेरा, चुल्हाड, हरदोली आणि सिहोरा गावे वगळता अन्य गावात दुष्काळाचे चित्र आहे. दोन हजारपेक्षा कमी लोकवस्तीच्या गावात आर्थिक स्त्रोत निर्मितीचे साधने नाहीत. यामुळे या ग्रामपंचायतीचे मासीक सभा चहापान विना सुरु आहेत. शासनाने १३ वा वित्त गुंडाळला आहे. १४ व्या वित्त आयोगाचे पुर्नगठन केले आहे. लोकसंख्येच्या आधारावर या आयोग अंतर्गत निधी उपलब्ध केला जाणार आहे. परंतु या आयोगाचे बचत खाते उघडण्यात आली असतांना निधी प्राप्त झाला नाही. शासनाचे परिपत्रक प्राप्त झाले आहे. खर्चित आराखडा प्राप्त झाला नाही. विकासाच्या प्रवाहात गावांना आणण्यासाठी तिजोरीचा पिटारा उघडण्यात आला होता. परंतु या योजनेला ब्रेक देण्यात आले आहे. या शिवाय घर कर मागणीवर सध्या बंदी असल्याने सामान्य फंडात जमा होणारा हा निधी दूर गेला आहे. गावात नळ योजना आहे. यामुळे पाणी पट्टी कराची राशी गोळा करण्यात येत आहे. परंतु ही राशी वीज बिलाचे देयक, देखभाल दुरुस्ती आदीवर खर्च केली जात आहे.या आधी विकास कामे, बांधकाम मधून पाच टक्के राशी ग्रामपंचायतीना प्राप्त करण्याची तरतूद होती. ही प्रथायादीच बंद करण्यात आली आहे. या परिसरात एका गावाची लोकवस्ती ६०० च्या घरात असून वार्षिक उत्पन्न ७७ हजार रुपये आहे. याशिवाय कर्मचारी, स्टेशनरी, विद्युत बिल, चहा पान, विद्युत खर्च अशा कामाचा वार्षिक खर्च अंदाजे १ लाख २९ हजार रुपये आहे. गावकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सरपंचांनी उसनवारीची ब्लिचिंग पावडरची खरेदी केली आहे. या राशी प्राप्तीकरिता व्यवसायीक तगादा लावत आहेत. ग्रामपंचायत तिजोरीत उलटफेर करण्याचा प्रयत्न सरपंचाचा आहे. परंतु निधीच नसल्याने सरपंच तोंडघशी पडले आहेत. निधी अभावी सार्वजनिक दिवाबत्ती प्रभावित झाली आहे. बल्प घेण्यासाठी व्यवसायीकांना अजीजी करण्याची पाळी आली आहे. कोंडवाडा हे आर्थिक उत्पन्नाचे साधन होते. कोंडवांडे आता कोसळली असून जनावरे ही या कोंडवाड्यापासून कोसो दूर गेली आहे. गावात सिमेंट रस्ते, नाली, शासकीय इमारती, सभामंडप, अंगणवाडी, शाळाचे बांधकाम चकाचक झाली आहे. गावात हे काम करण्यासाठी जागा नाही. लोकप्रतिनिधींचे स्थानिक निधी अंतर्गत गावात तीन लाख खर्चाचे सभामंडपाची खैरात वाटण्यात आली आहे. आधी बांधकाम करण्यात आलेल्या सभामंडपात जनावरांचे बैठकीचे साधन झाली आहे. प्रवाशी निवारांचे पुनर्जीवित करण्यासाठी मायबाप लोकप्रतिनिधी सापडत नाही. हा प्रवासी निवारा निधीअभावी वांझोटा ठरत असताना कुणाचे लक्ष नाही. हातपंपाला गढूळ पाणी येत आहे. या पाण्यावर बंदी आणली जात नाही. या शिवाय नवीन हातपंपाचे नियोजन नाही. (वार्ताहर)