शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ग्रामपंचायत तिजोरीत दुष्काळ

By admin | Updated: September 15, 2015 00:39 IST

ग्रामपंचायतीच्या तिजोरीत येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर ब्रेक लावण्यात आल्याने अल्प लोकवस्तीच्या असणाऱ्या ग्राम पंचायतीत दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे.

१३ वा वित्त आयोग गुंडाळला : सामान्य फंड रिकामा, असंतोषाचा पोळा फुटणाररंजित चिचखेडे चुल्हाड(सिहोरा)ग्रामपंचायतीच्या तिजोरीत येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर ब्रेक लावण्यात आल्याने अल्प लोकवस्तीच्या असणाऱ्या ग्राम पंचायतीत दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. सिहोरा परिसरातील गावात विकास कामे प्रभावित झाली आहेत. यातच आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या असल्याची प्रतिक्रिया आहेत.सिहोरा परिसरात ४७ गावे असून ग्रामपंचायती आहेत. बपेरा, चुल्हाड, हरदोली आणि सिहोरा गावे वगळता अन्य गावात दुष्काळाचे चित्र आहे. दोन हजारपेक्षा कमी लोकवस्तीच्या गावात आर्थिक स्त्रोत निर्मितीचे साधने नाहीत. यामुळे या ग्रामपंचायतीचे मासीक सभा चहापान विना सुरु आहेत. शासनाने १३ वा वित्त गुंडाळला आहे. १४ व्या वित्त आयोगाचे पुर्नगठन केले आहे. लोकसंख्येच्या आधारावर या आयोग अंतर्गत निधी उपलब्ध केला जाणार आहे. परंतु या आयोगाचे बचत खाते उघडण्यात आली असतांना निधी प्राप्त झाला नाही. शासनाचे परिपत्रक प्राप्त झाले आहे. खर्चित आराखडा प्राप्त झाला नाही. विकासाच्या प्रवाहात गावांना आणण्यासाठी तिजोरीचा पिटारा उघडण्यात आला होता. परंतु या योजनेला ब्रेक देण्यात आले आहे. या शिवाय घर कर मागणीवर सध्या बंदी असल्याने सामान्य फंडात जमा होणारा हा निधी दूर गेला आहे. गावात नळ योजना आहे. यामुळे पाणी पट्टी कराची राशी गोळा करण्यात येत आहे. परंतु ही राशी वीज बिलाचे देयक, देखभाल दुरुस्ती आदीवर खर्च केली जात आहे.या आधी विकास कामे, बांधकाम मधून पाच टक्के राशी ग्रामपंचायतीना प्राप्त करण्याची तरतूद होती. ही प्रथायादीच बंद करण्यात आली आहे. या परिसरात एका गावाची लोकवस्ती ६०० च्या घरात असून वार्षिक उत्पन्न ७७ हजार रुपये आहे. याशिवाय कर्मचारी, स्टेशनरी, विद्युत बिल, चहा पान, विद्युत खर्च अशा कामाचा वार्षिक खर्च अंदाजे १ लाख २९ हजार रुपये आहे. गावकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सरपंचांनी उसनवारीची ब्लिचिंग पावडरची खरेदी केली आहे. या राशी प्राप्तीकरिता व्यवसायीक तगादा लावत आहेत. ग्रामपंचायत तिजोरीत उलटफेर करण्याचा प्रयत्न सरपंचाचा आहे. परंतु निधीच नसल्याने सरपंच तोंडघशी पडले आहेत. निधी अभावी सार्वजनिक दिवाबत्ती प्रभावित झाली आहे. बल्प घेण्यासाठी व्यवसायीकांना अजीजी करण्याची पाळी आली आहे. कोंडवाडा हे आर्थिक उत्पन्नाचे साधन होते. कोंडवांडे आता कोसळली असून जनावरे ही या कोंडवाड्यापासून कोसो दूर गेली आहे. गावात सिमेंट रस्ते, नाली, शासकीय इमारती, सभामंडप, अंगणवाडी, शाळाचे बांधकाम चकाचक झाली आहे. गावात हे काम करण्यासाठी जागा नाही. लोकप्रतिनिधींचे स्थानिक निधी अंतर्गत गावात तीन लाख खर्चाचे सभामंडपाची खैरात वाटण्यात आली आहे. आधी बांधकाम करण्यात आलेल्या सभामंडपात जनावरांचे बैठकीचे साधन झाली आहे. प्रवाशी निवारांचे पुनर्जीवित करण्यासाठी मायबाप लोकप्रतिनिधी सापडत नाही. हा प्रवासी निवारा निधीअभावी वांझोटा ठरत असताना कुणाचे लक्ष नाही. हातपंपाला गढूळ पाणी येत आहे. या पाण्यावर बंदी आणली जात नाही. या शिवाय नवीन हातपंपाचे नियोजन नाही. (वार्ताहर)