शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

शासकीय अनुदानाअभावी ग्रामपंचायती आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST

राज्य शासनातर्फे ग्रामपंचायतींना मिळणारे अनुदान व १५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना अद्याप मिळाला नाही. गत दीड ते दोन ...

राज्य शासनातर्फे ग्रामपंचायतींना मिळणारे अनुदान व १५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना अद्याप मिळाला नाही. गत दीड ते दोन वर्षांपासून कोरोना संक्रमण काळात ग्रामपंचायतींना ग्रामस्थांपासून संपत्ती कर, पाणी कर व इतर अन्य करांची वसुली झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना असून, पंपावरचे बिल, स्ट्रीट लाइट मीटर बिल आदी बिले ग्रामपंचायतीने गत काही महिन्यांपासून भरली नाहीत. त्यामुळे वीज वितरण कंपनीने विजेचे बिल भरण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. ग्रामपंचायतीकडे पैसा नसल्याने ही बिले कशी भरावीत, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात पाणीपुरवठा योजना व स्ट्रीट लाइटचे कनेक्शन वीज वितरण कंपनी खंडित करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना संक्रमणकाळात आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे आठवडी बाजाराची लिलाव प्रक्रिया रखडली आहे. शासनाने संकटकाळात ग्रामपंचायतीला आर्थिक अनुदान द्यावे, अशी मागणी सरपंचांनी केली आहे. गावाचा वीजपुरवठा खंडित झाला, तर विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते; परंतु सरपंचांचा नाइलाज आहे, पैसा कोठून आणावा, असा प्रश्न अनेक गावच्या सरपंचांना सध्या भेडसावीत आहे. गाव लहान असल्याने गावकऱ्यांपासून कर घेताना ग्रामपंचायतींना तारेवरची कसरत करावी लागते. पंचायती स्वतः निधी उभारू शकत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनी या ज्वलंत समस्येकडे लक्ष पुरवण्याची गरज आहे. ५० टक्के गावांत महिला सरपंच आहेत. त्यामुळे महिला सरपंचांना गावातील ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते. वीज खंडित प्रकरणामुळे गावखेड्यांतील राजकारण तापण्याची अधिक शक्यता आहे.