शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

शासकीय गोदामातील धान्याला प्रचंड दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 05:00 IST

ओले झालेल्या धान्याला आता प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. उग्र वासाने तेथे क्षणभरही माणूस थांबू शकत नाही. अशा जीकरीच्या परिस्थितीत हमाल आपला जीव धोक्यात घालून तेथे सफाई करतानाचे दृष्य दिसत होते. या परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालय, पाणी पुरवठा विभाग, राज्य परिवहन महामंडळाचे आगार कार्यालय आणि ग्रामसेवक कॉलनी आहे. दुर्गंधीने या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देमहापुराचा फटका : तीन दिवस गोदामात होते पाच ते सहा फूट पाणी, सहा हजार क्विंटल धान्य नष्ट, शासनाकडे अहवाल पाठविला

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीच्या महापुराचा फटका येथील शासकीय गोदामातील धान्याला बसला असून तब्बल सहा हजार २६३ क्विंटल धान्य या महापुरात नष्ट झाले. आता या धान्याला प्रचंड दुर्गंधी पसरली असून जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने धान्य वाळू घालण्याची कसरत केली जात आहे. मात्र हे धान्य जनावरांच्या खाण्यासही उपयोगी येणार नाही अशी अवस्था महापुराने झाली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात पुरवठा विभागाचे तीन धान्य गोदाम आहेत. वैनगंगेच्या पुराचे पाणी दोन गोदामात शिरले. एक गोदाम उंचावर असल्याने त्यात पाणी शिरले नाही. या दोन गोदामात पाच ते सहा फुट पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात धान्य ओले झाले. गोदामात १७ हजार क्विंटल धान्य साठवून ठेवले होते. त्यात तांदूळ ९ हजार ४७२ क्विंटल, गहू ६ हजार २१५ क्विंटल, तूर डाळ ७०० क्विंटल, चना डाळ ५४५ क्विंटल, चना ६.३२ क्विंटल आणि साखर १४४ क्विंटल साठवून होती. २९ ते ३१ ऑगस्ट या काळात पूर परिस्थिती निर्माण झाली. वैनगंगेच्या पुराचे पाणी गोदामात भरले. पाच ते सहा फुट पर्यंत पाणी या गोदामात होते. त्यामुळे धान्य पोत्यांच्या थप्प्या पाच ते सहा फुटापर्यंत ओल्या झाल्या. त्यात तांदूळ तीन हजार ८२६ क्विंटल, गहू १८३३ क्विंटल, तूर डाळ २६६ क्विंटल, चना डाळ १८८ क्विंटल, चना ६.३२ क्विंटल आणि साखर १४४ क्विंटल असे ६ हजार २६३ क्विंटल धान्य ओले झाले.आता ओले झालेले धान्य वाळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चांगले असलेले धान्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मात्र ओले झालेल्या धान्याला आता प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. उग्र वासाने तेथे क्षणभरही माणूस थांबू शकत नाही. अशा जीकरीच्या परिस्थितीत हमाल आपला जीव धोक्यात घालून तेथे सफाई करतानाचे दृष्य दिसत होते. या परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालय, पाणी पुरवठा विभाग, राज्य परिवहन महामंडळाचे आगार कार्यालय आणि ग्रामसेवक कॉलनी आहे. दुर्गंधीने या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. आता प्रशासनाच्या वतीने या धान्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. परंतु त्यासाठी शासकीय स्तरावर उपाययोजना आवश्यक झाली आहे.जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी तहसीलदारांना या संदर्भात सूचना दिली आहे. पुराच्या पाण्यामुळे ओल्या झालेल्या थप्प्या बाहेर काढून त्यातील ओले धान्य व चांगले धान्य वेगळे करावे. खराब झालेल्या धान्याबाबत शासन निर्णय २८ ऑक्टोबर १९९९ अन्वये विल्हेवाटीचा प्रस्ताव साद करण्याची सूचना केली. महापुरातून बचावलेले धान्य वितरीत करण्यात येत असून ओले झालेले धान्य वाळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद पडोळे यांनी दिली.गोदामातील संपूर्ण साखर पाण्यात विरघळलीजिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात १४४ क्विंटल साखरेचा साठा होता. मात्र महापुराने संपूर्ण साखर पाण्यात विरघळली. एक किलोही साखर यातून बचावली नाही. अशीच अवस्था चन्याचीही झाली आहे. ६.३२ क्विंटल चणा पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे.ओले झालेले धान्य नमुने शासन नियमाप्रमाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल. शासनस्तरावर विल्हेवाट करण्यासंदर्भात ज्या सूचना मिळतील त्याचे पालन केले जाईल.-अनिल बन्सोड,जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.पूरग्रस्त धान्याच्या प्रतीक्षेतएकीकडे पुराने शासकीय गोदामातील धान्य नष्ट झाले, तर दुसरीकडे भंडारा शहरात वैनगंगेच्या तिरावर राहणाऱ्या १०० झोपड्यांतील पूरग्रस्त धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे सर्वस्व महापुरात वाहून गेले. घरातील धान्यही वाहून गेले. मात्र अद्यापपर्यंत या कुटुंबांना शासनाकडून कोणतेही धान्य मिळाले नाही. सामाजिक संस्थांकडूनही कुणी पुढाकार घेतला नाही. झोपडीत राहणारे अनेक चिमुकले आणि वयोवृद्धांची तडफड होत आहे. मात्र कोरोना संकटामुळे माणुसकीचा हात द्यायला कुणी आले नाही. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन वैनगंगा नदीकाठावरील या १०० झोपड्यात राहणाºया नागरिकांना मदत द्यावी अशी आर्त हाक या भागात राहणाºया गोरगरीब कुटुंबांनी केली आहे.

टॅग्स :floodपूर