शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बीडीएस बंद असल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांचे जीपीएफ निघणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या दरमहिन्याच्या वेतनातून जीपीएफची ठरावीक रक्कम आपल्या जीपीएफ खात्यात जमा करीत असतात. अत्यंत आवश्यक किंवा ...

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या दरमहिन्याच्या वेतनातून जीपीएफची ठरावीक रक्कम आपल्या जीपीएफ खात्यात जमा करीत असतात. अत्यंत आवश्यक किंवा सेवानिवृत्त होतेवेळी ही रक्कम कर्मचाऱ्यांना काढता येते. कोरोनाकाळात महाराष्ट्र व इतर राज्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. हे कारण समोर करून शासनाने संगणक प्रणालीतून अर्थसंकल्प अधिकारपत्र (बी.डी.एस.) निघाल्याशिवाय कर्मचारी यांना रक्कम अदा करू नयेत, असे पत्रक शासनाने काढले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी अडचणीत आले आहे. आधी ही पद्धत नव्हती. जीपीएफ प्रकरण कर्मचारी यांना मंजूर करावयाचे असल्यास अधीक्षक, जीपीएफ व वेतन पथक, यांच्याकडून प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तो शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे जात असे. तेथून मंजूर झाल्यावर कोषागार कार्यालयात पाठविले जात होते. तेथून सरळ कर्मचारी यांच्या खात्यात जमा होत असे. पण, सध्या बी.डी.एस. निघणे बंद असल्याने जीपीएफ प्रकरण वेतन पथक कार्यालयात अधीक्षक व शिक्षणाधिकारी यांची मंजुरी घेऊन पडून आहेत. त्यामुळे शिक्षक व कर्मचारी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. अनेक कर्मचारी तीन ते चार महिने सेवानिवृत्त होऊन गेले, पण त्यांची हक्काची नापरतावा रक्कम मिळाली नाही. कोरोनाकाळात अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ते व त्यांचे कुटुंब आजारी पडले. त्यांना लाखो रुपये लागले. अनेकांनी घर, प्लाॅटखरेदी करून त्यांच्या शाळेतर्फे प्रस्ताव पाठविले. पण, गत तीन महिन्यांपासून मंजूर झाले नाही. म्हणून कर्मचारी अडचणीत आले आहे. शासनाने बीडीएस प्रणाली सुरू करून कर्मचारी यांची हक्काची रक्कम त्यांना देण्याची मागणी खासगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केली आहे.