शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

रेती तस्करीला शासनाचेच अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:35 IST

लाखांदूर: दोन वर्षांपूर्वी तालुका प्रशासनाने तालुक्यातील काही रेतीघाट लिलावासाठी शासनाकडे प्रस्तावित केले. मात्र, शासन प्रशासनाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षाने तब्बल दोन ...

लाखांदूर: दोन वर्षांपूर्वी तालुका प्रशासनाने तालुक्यातील काही रेतीघाट लिलावासाठी शासनाकडे प्रस्तावित केले. मात्र, शासन प्रशासनाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षाने तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही तालुक्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव न झाल्याने, तालुक्यात सर्वच शासकीय बांधकामात चोरीच्या रेतीचा वापर होत असून, या चोरीला शासनाचेच अभय असल्याची जोरदार चर्चा केली जात आहे.

चूलबंद व वैनगंगा नदीपात्र असलेल्या लाखांदूर तालुक्यांतर्गत गत दोन वर्षांपूर्वी काही रेतीघाट लिलावासाठी शासनाकडे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे. सदर रेतीघाटांच्या लिलावातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल क्रमप्राप्त होते. मात्र, तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनही तालुक्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला नसल्याची बोंब आहे.

सदर लिलाव न झाल्याने रेतीविना खासगी व शासकीय बांधकाम रखडण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, तालुक्यात प्रचंड रेती तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे. या तस्करीअंतर्गत तालुक्यात काही खासगी तर मोठ्या प्रमाणात शासकीय बांधकामासाठी रेतीचा पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान तालुक्यात रेती घाट लिलाव न झाल्याने, घरकूल लाभार्थ्यांचीही रेतीसाठी धावपळ सुरू असल्याची ओरड आहे.

बॉक्स

रेतीघाटांचा लिलाव आवश्यक

शासनाने घरकूल बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रॉस रेती उपलब्ध केले जाणार असल्याचा कांगावा केला असला, तरी अद्यापही तालुक्यातील एकाही लाभार्थ्याला रेती उपलब्ध करण्यात आली नसल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, तालुक्यात सिमेंट रस्ते, प्रशासकीय इमारती, पूल बांधकाम, घरकूल बांधकाम यासह अन्य खासगी बांधकामासाठी रेती कशी उपलब्ध होते, हे सर्व काही शासन प्रशासनाला ठाऊक असले, तरी मुद्दामच अजाणतेपणाचे ढोंग केले जात असल्याचा आरोप केला जात आहेत.

एकंदरीत लिलावाविना तालुक्यात अवैधपणे रेती तस्करी होऊन गत दोन वर्षांपूर्वीपासून शासनाचा कोट्यवधीचा महसूल जाणीवपूर्वक बुडविण्यात आल्याची आरोपात्मक चर्चा आहे. तथापि तालुक्यात रेती तस्करीला उधाण येताना काहींना रोजगार, तर काहींना व्यवसाय मिळाल्याच्या नादात तालुक्यात गुंडप्रवृत्ती बळावत असल्याचीही बोंब आहे.

यासंपूर्ण गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी रेतीघाटांचा लिलाव आवश्यक असून, तूर्तास तरी तालुक्यात रेती तस्करीला शासनाचेच अभय असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.