शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करीला शासनाचेच अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:35 IST

लाखांदूर: दोन वर्षांपूर्वी तालुका प्रशासनाने तालुक्यातील काही रेतीघाट लिलावासाठी शासनाकडे प्रस्तावित केले. मात्र, शासन प्रशासनाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षाने तब्बल दोन ...

लाखांदूर: दोन वर्षांपूर्वी तालुका प्रशासनाने तालुक्यातील काही रेतीघाट लिलावासाठी शासनाकडे प्रस्तावित केले. मात्र, शासन प्रशासनाच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षाने तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही तालुक्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव न झाल्याने, तालुक्यात सर्वच शासकीय बांधकामात चोरीच्या रेतीचा वापर होत असून, या चोरीला शासनाचेच अभय असल्याची जोरदार चर्चा केली जात आहे.

चूलबंद व वैनगंगा नदीपात्र असलेल्या लाखांदूर तालुक्यांतर्गत गत दोन वर्षांपूर्वी काही रेतीघाट लिलावासाठी शासनाकडे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे. सदर रेतीघाटांच्या लिलावातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल क्रमप्राप्त होते. मात्र, तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनही तालुक्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला नसल्याची बोंब आहे.

सदर लिलाव न झाल्याने रेतीविना खासगी व शासकीय बांधकाम रखडण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, तालुक्यात प्रचंड रेती तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे. या तस्करीअंतर्गत तालुक्यात काही खासगी तर मोठ्या प्रमाणात शासकीय बांधकामासाठी रेतीचा पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान तालुक्यात रेती घाट लिलाव न झाल्याने, घरकूल लाभार्थ्यांचीही रेतीसाठी धावपळ सुरू असल्याची ओरड आहे.

बॉक्स

रेतीघाटांचा लिलाव आवश्यक

शासनाने घरकूल बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रॉस रेती उपलब्ध केले जाणार असल्याचा कांगावा केला असला, तरी अद्यापही तालुक्यातील एकाही लाभार्थ्याला रेती उपलब्ध करण्यात आली नसल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, तालुक्यात सिमेंट रस्ते, प्रशासकीय इमारती, पूल बांधकाम, घरकूल बांधकाम यासह अन्य खासगी बांधकामासाठी रेती कशी उपलब्ध होते, हे सर्व काही शासन प्रशासनाला ठाऊक असले, तरी मुद्दामच अजाणतेपणाचे ढोंग केले जात असल्याचा आरोप केला जात आहेत.

एकंदरीत लिलावाविना तालुक्यात अवैधपणे रेती तस्करी होऊन गत दोन वर्षांपूर्वीपासून शासनाचा कोट्यवधीचा महसूल जाणीवपूर्वक बुडविण्यात आल्याची आरोपात्मक चर्चा आहे. तथापि तालुक्यात रेती तस्करीला उधाण येताना काहींना रोजगार, तर काहींना व्यवसाय मिळाल्याच्या नादात तालुक्यात गुंडप्रवृत्ती बळावत असल्याचीही बोंब आहे.

यासंपूर्ण गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी रेतीघाटांचा लिलाव आवश्यक असून, तूर्तास तरी तालुक्यात रेती तस्करीला शासनाचेच अभय असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.