शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

आरक्षण बदलले तर सरकार बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:58 IST

मुंबई येथील इंदू मिल परिसरात बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी प्रधानमंत्री आले असता त्यांनी आरक्षणाला धक्का लागणार नाही,....

ठळक मुद्देरामदास आठवले : भंडाºयात आंबेडकरी विचार संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुंबई येथील इंदू मिल परिसरात बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी प्रधानमंत्री आले असता त्यांनी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे विनाकारण अधूनमधून उठणाºया वावटळ्यांवर विश्वास ठेऊ नका, ज्यादिवशी आरक्षण बदलेल त्यादिवशी सरकार बदलेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. त्यावेळी मी तुमच्यासोबत राहीन, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेला दिली.आंबेडकरी विचार जागृती समितीच्यावतीने भंडारा येथे रविवारला आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलनात ते उद्घाटप्रसंगी बोलत होते. ना.आठवले हे संपूर्ण भाषणात बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून सांगितला, मात्र आरक्षणाविषयी काही बोलले नाही, त्यामुळे उपस्थितांमधून ‘आरक्षणावर बोला’, ‘आरक्षणावर बोला’ असे म्हणताच त्यांनी माईक पुन्हा हातात घेतला आणि वरील उद्गार काढले.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज्य अनुसूचित जातीजमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल. थुल होते. यावेळी मंचावर माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, समता सैनिक दलाचे अध्यक्ष डी.एफ. कोचे, निमंत्रक अमृत बन्सोड, अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, कार्याध्यक्ष महादेव मेश्राम, संघटन सचिव रूपचंद रामटेके, कोषाध्यक्ष प्रभाकर भोयर उपस्थित होते.यावेळी ना.आठवले म्हणाले, बाबासाहेब आयुष्यभर सामान्य माणसांसाठी संघर्ष करीत राहिले. समाजात समता रूजली पाहिजे, विषमता संपली पाहिजे, असे सांगत राहिले. त्यांनी समाज जोडण्याचाच विचार दिला. पाणी अडवलं तर सिंचन वाढेल, शेतमालाला भाव मिळेल, उद्योग वाढले तर रोजगार मिळेल, पर्यायाने समाजात आर्थिक सुबत्ता यावी, असा विचार बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेब हे विचारांचे धनी होते. त्यांचा कार्यकर्ता होणे हे मी माझे भाग्य समजतो, असे सांगण्यासाठी विसरले नाही.यावेळी माजी न्यायमूर्ती थूल म्हणाले, समाजात ऐक्य आवश्यक आहे. संघटीत झाल्याशिवाय संघर्ष नाही. त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. कोणतेही सरकार आले तरीही आरक्षण हटू शकत नाही, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, विधी शाखेशी संबंधित असल्यामुळे हे मी आवर्जून सांगत असल्याचे सांगितले.तत्पूर्वी प्रा.अश्ववीर गजभिये लिखीत पुस्तकाचे लोकार्पण ना.आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात ‘आरक्षणाचा प्रश्न, बौद्ध व मागासवर्गीयांच्या सवलती’ विषयावर माजी न्यायाधीश अनिल वैद्य ‘बौद्ध विवाह व वारस हक्क कायद्याची अपरिहार्यता’ या विषयावर माजी मंत्री डॉ.नितीन राऊत तर ‘बौद्ध संस्कृती संवर्धनाचा प्रश्न’ या विषयावर पर्यटन विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांचे व्याख्यान झाले.संमेलनाचा समारोप सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. अतिथी म्हणून माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, साहित्यिक डॉ.अनिल नितनवरे उपस्थित होते.आठवलेंनी एैकविल्या कविता‘आज आले आमचे भरून मन’, ‘भंडाºयात होत आहे आंबेडकरी संमेलन’ असे म्हणत भाषणाला सुरूवात करीत ना.आठवले म्हणाले, या संमेलनात पक्षभेद विसरून सर्वजन एकत्र आल्याचा आनंद होत आहे. मी आंबेडकरी कार्यकर्ता असून एका कार्यकर्त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आयोजकांचा आभारी असल्याचे सांगून ‘समतावादी आहे आंबेडकरी विचार’ गावागावांत जावून करा त्याचा प्रचार’ असेही कवितेद्वारे त्यांनी सांगितले.