शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

शासनाने नियम कडक करावे, पण, पुन्हा लाॅकडाऊन नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीनंतर आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून देशात काही राज्यांत रात्रीला संचारबंदीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात कित्येकांच्या हातचे काम गेले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आजही लॉकडाऊन म्हणताच मध्यमवर्गीयांच्याही तोंडचे पाणी पळते. तर दुसरीकडे राज्यातही कोरोना फोफावत असल्याने   अधिकच जोर वाढल्यास लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची पाळी येणार असे संकेत दिले जात आहेत.

ठळक मुद्देबाजारपेठेत मंदी नको : नागरिकांचे सहकार्य अपेक्षित

    लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सात महिन्यांनंतर अर्थव्यवस्था रूळावर येत असताना पुन्हा लॉकडाऊन नकोच असा सूर व्यापारी, उद्योजक, कामगारांचा आहे. प्रचंड आर्थिक नुकसान सोसल्यामुळे पुन्हा ती स्थिती बघण्याची हिंमत नाही. परिणामी प्रशासनाने नियम कडक करावेत, पण लॉकडाऊन करू नये, अशी सर्वसामान्य बाब समोर येत आहे.दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीनंतर आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून देशात काही राज्यांत रात्रीला संचारबंदीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात कित्येकांच्या हातचे काम गेले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आजही लॉकडाऊन म्हणताच मध्यमवर्गीयांच्याही तोंडचे पाणी पळते. तर दुसरीकडे राज्यातही कोरोना फोफावत असल्याने   अधिकच जोर वाढल्यास लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची पाळी येणार असे संकेत दिले जात आहेत. पहिल्या लॉकडाऊनने आर्थिक बजेट कोलमडले. दिवाळीमुळे बाजारपेठेत उलाढाल वाढली होती. अशा स्थितीत लॉकडाऊन नकोच अशी भूमिका व्यापारी, नागरिकांची सर्वसामान्यपणे दिसून येत आहे. नियम कडक करा, पण, पुन्हा लाॅकडाऊन नकोच, अशीच बाब चर्चेवरून निदर्शनास  दिसून येत आहे. गत सात महिन्यात झालेल्या नुकसानीवरुन नागरिकांसह व्यापाऱ्यांनी बोध घेतल्याचे दिसून येते.

लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतात पण नागरिक घराबाहेर पडतातच. भाजी बाजारात चांगली गर्दी असते. नियमांचे पालन होत नाही. सॅनिटाइज तर सोडा फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन योग्य प्रकारे होत नाही. यावर लक्ष देणे आवश्यक आहे. - नितीन दुरगकर, व्यापारी 

पुन्हा लॉकडाऊन करण्यापेक्षा कामाची वेळ ठरवून द्यावी. रात्रीचा कर्फ्यू करून त्याचे कठोरतेने पालन करावे. गर्दी असणाऱ्या जागांवर लक्ष देऊन नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे व सॅनिटायजेशनबाबत जागृती करावी.- वैभव अवघाते, उद्योजक

राज्य शासनाने कोरोना संकटावर दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर करणे, स्वत:सह परिसर सॅनिटाइज करणे गरजेचे आहे. याशिवाय आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचना पाळणे आवश्यक आहे. -संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा

सर्वात आधी लॉकडाऊनचा परिणाम सर्वांवर झाला आहे. अशात दुसऱ्या लॉकडाऊनची गरज पडल्यास शासनाने संपूर्ण श्रमिकांच्या व्यवस्थेची गॅरंटी कोण देणार. कामगारांना आर्थिक मदत देत मोफत अन्नधान्य देणे गरजेचे झाले आहे. - श्रीकांत पंचबुद्धे, कामगार संघटना

मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक करावे. लॉकडाऊन करणे यावर उपाय नाही. सध्या कोरोना रूग्ण वाढत आहे. लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. नियम कडक करावे पण त्याला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. - संजय निंबार्ते, मेडीकल असोसिएशन

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या