शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने नियम कडक करावे, पण, पुन्हा लाॅकडाऊन नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीनंतर आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून देशात काही राज्यांत रात्रीला संचारबंदीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात कित्येकांच्या हातचे काम गेले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आजही लॉकडाऊन म्हणताच मध्यमवर्गीयांच्याही तोंडचे पाणी पळते. तर दुसरीकडे राज्यातही कोरोना फोफावत असल्याने   अधिकच जोर वाढल्यास लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची पाळी येणार असे संकेत दिले जात आहेत.

ठळक मुद्देबाजारपेठेत मंदी नको : नागरिकांचे सहकार्य अपेक्षित

    लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सात महिन्यांनंतर अर्थव्यवस्था रूळावर येत असताना पुन्हा लॉकडाऊन नकोच असा सूर व्यापारी, उद्योजक, कामगारांचा आहे. प्रचंड आर्थिक नुकसान सोसल्यामुळे पुन्हा ती स्थिती बघण्याची हिंमत नाही. परिणामी प्रशासनाने नियम कडक करावेत, पण लॉकडाऊन करू नये, अशी सर्वसामान्य बाब समोर येत आहे.दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीनंतर आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून देशात काही राज्यांत रात्रीला संचारबंदीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात कित्येकांच्या हातचे काम गेले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आजही लॉकडाऊन म्हणताच मध्यमवर्गीयांच्याही तोंडचे पाणी पळते. तर दुसरीकडे राज्यातही कोरोना फोफावत असल्याने   अधिकच जोर वाढल्यास लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची पाळी येणार असे संकेत दिले जात आहेत. पहिल्या लॉकडाऊनने आर्थिक बजेट कोलमडले. दिवाळीमुळे बाजारपेठेत उलाढाल वाढली होती. अशा स्थितीत लॉकडाऊन नकोच अशी भूमिका व्यापारी, नागरिकांची सर्वसामान्यपणे दिसून येत आहे. नियम कडक करा, पण, पुन्हा लाॅकडाऊन नकोच, अशीच बाब चर्चेवरून निदर्शनास  दिसून येत आहे. गत सात महिन्यात झालेल्या नुकसानीवरुन नागरिकांसह व्यापाऱ्यांनी बोध घेतल्याचे दिसून येते.

लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतात पण नागरिक घराबाहेर पडतातच. भाजी बाजारात चांगली गर्दी असते. नियमांचे पालन होत नाही. सॅनिटाइज तर सोडा फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन योग्य प्रकारे होत नाही. यावर लक्ष देणे आवश्यक आहे. - नितीन दुरगकर, व्यापारी 

पुन्हा लॉकडाऊन करण्यापेक्षा कामाची वेळ ठरवून द्यावी. रात्रीचा कर्फ्यू करून त्याचे कठोरतेने पालन करावे. गर्दी असणाऱ्या जागांवर लक्ष देऊन नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे व सॅनिटायजेशनबाबत जागृती करावी.- वैभव अवघाते, उद्योजक

राज्य शासनाने कोरोना संकटावर दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर करणे, स्वत:सह परिसर सॅनिटाइज करणे गरजेचे आहे. याशिवाय आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचना पाळणे आवश्यक आहे. -संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा

सर्वात आधी लॉकडाऊनचा परिणाम सर्वांवर झाला आहे. अशात दुसऱ्या लॉकडाऊनची गरज पडल्यास शासनाने संपूर्ण श्रमिकांच्या व्यवस्थेची गॅरंटी कोण देणार. कामगारांना आर्थिक मदत देत मोफत अन्नधान्य देणे गरजेचे झाले आहे. - श्रीकांत पंचबुद्धे, कामगार संघटना

मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक करावे. लॉकडाऊन करणे यावर उपाय नाही. सध्या कोरोना रूग्ण वाढत आहे. लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. नियम कडक करावे पण त्याला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. - संजय निंबार्ते, मेडीकल असोसिएशन

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या