शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

शासनाने नियम कडक करावे, पण, पुन्हा लाॅकडाऊन नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीनंतर आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून देशात काही राज्यांत रात्रीला संचारबंदीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात कित्येकांच्या हातचे काम गेले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आजही लॉकडाऊन म्हणताच मध्यमवर्गीयांच्याही तोंडचे पाणी पळते. तर दुसरीकडे राज्यातही कोरोना फोफावत असल्याने   अधिकच जोर वाढल्यास लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची पाळी येणार असे संकेत दिले जात आहेत.

ठळक मुद्देबाजारपेठेत मंदी नको : नागरिकांचे सहकार्य अपेक्षित

    लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सात महिन्यांनंतर अर्थव्यवस्था रूळावर येत असताना पुन्हा लॉकडाऊन नकोच असा सूर व्यापारी, उद्योजक, कामगारांचा आहे. प्रचंड आर्थिक नुकसान सोसल्यामुळे पुन्हा ती स्थिती बघण्याची हिंमत नाही. परिणामी प्रशासनाने नियम कडक करावेत, पण लॉकडाऊन करू नये, अशी सर्वसामान्य बाब समोर येत आहे.दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीनंतर आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून देशात काही राज्यांत रात्रीला संचारबंदीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात कित्येकांच्या हातचे काम गेले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आजही लॉकडाऊन म्हणताच मध्यमवर्गीयांच्याही तोंडचे पाणी पळते. तर दुसरीकडे राज्यातही कोरोना फोफावत असल्याने   अधिकच जोर वाढल्यास लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची पाळी येणार असे संकेत दिले जात आहेत. पहिल्या लॉकडाऊनने आर्थिक बजेट कोलमडले. दिवाळीमुळे बाजारपेठेत उलाढाल वाढली होती. अशा स्थितीत लॉकडाऊन नकोच अशी भूमिका व्यापारी, नागरिकांची सर्वसामान्यपणे दिसून येत आहे. नियम कडक करा, पण, पुन्हा लाॅकडाऊन नकोच, अशीच बाब चर्चेवरून निदर्शनास  दिसून येत आहे. गत सात महिन्यात झालेल्या नुकसानीवरुन नागरिकांसह व्यापाऱ्यांनी बोध घेतल्याचे दिसून येते.

लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असतात पण नागरिक घराबाहेर पडतातच. भाजी बाजारात चांगली गर्दी असते. नियमांचे पालन होत नाही. सॅनिटाइज तर सोडा फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन योग्य प्रकारे होत नाही. यावर लक्ष देणे आवश्यक आहे. - नितीन दुरगकर, व्यापारी 

पुन्हा लॉकडाऊन करण्यापेक्षा कामाची वेळ ठरवून द्यावी. रात्रीचा कर्फ्यू करून त्याचे कठोरतेने पालन करावे. गर्दी असणाऱ्या जागांवर लक्ष देऊन नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे व सॅनिटायजेशनबाबत जागृती करावी.- वैभव अवघाते, उद्योजक

राज्य शासनाने कोरोना संकटावर दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर करणे, स्वत:सह परिसर सॅनिटाइज करणे गरजेचे आहे. याशिवाय आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचना पाळणे आवश्यक आहे. -संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा

सर्वात आधी लॉकडाऊनचा परिणाम सर्वांवर झाला आहे. अशात दुसऱ्या लॉकडाऊनची गरज पडल्यास शासनाने संपूर्ण श्रमिकांच्या व्यवस्थेची गॅरंटी कोण देणार. कामगारांना आर्थिक मदत देत मोफत अन्नधान्य देणे गरजेचे झाले आहे. - श्रीकांत पंचबुद्धे, कामगार संघटना

मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक करावे. लॉकडाऊन करणे यावर उपाय नाही. सध्या कोरोना रूग्ण वाढत आहे. लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. नियम कडक करावे पण त्याला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. - संजय निंबार्ते, मेडीकल असोसिएशन

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या