शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

By admin | Updated: January 20, 2016 00:50 IST

आम्ही सरकारमध्ये असताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पैसेवारी योग्य पध्दतीने काढण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

प्रफुल पटेल यांचा आरोप : भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठकभंडारा : आम्ही सरकारमध्ये असताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पैसेवारी योग्य पध्दतीने काढण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आता खरी परिस्थिती लपवून पैसेवारी जास्त दाखविली जात असताना या सरकारने जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी केला.भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढवा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, सभापती शुभांगी राहांगडाले, कल्याणी भुरे, अ‍ॅड.जयंत वैरागडे, अविनाश ब्राम्हणकर, सच्चिदानंद फुलेकर, हाजी सलाम उपस्थित होते.यावेळी खा.पटेल म्हणाले, यावर्षी किडीमुळे धानाचा उतारा आला नाही, अशा स्थितीत शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी दिलासा मिळणे गरजेचे आहे. आधीच धान खरेदी केंद्र उशिरा सुरु झाले. त्यात आमच्या काळात शेतकऱ्यांना मिळत होते तेवढाही दर एचएमटी, जय श्रीराम या वाणांना आता नाही. जिल्ह्यात ९० टक्के गावांमधील पैसेवारी ५० टक्के पेक्षा जास्त दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना शासकिय लाभांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. दीड वर्षातील सरकारच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकार घोषणा आणि मार्केटिंग करण्यात पटाईत असले तरी प्रत्यक्षात लोकांसाठी काय करीत आहे हे कोणालाच समजेनासे झाले आहे. यावेळी नवनियुक्त डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत वैरागडे व डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.जगदिश शेंडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सोपान आजबले यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रदेश सचिव धनंजय दलाल यांनी केले. संचालन विजय खेडीकर यांनी तर आभारप्रदर्शन वासुदेव बांते यांनी केले. यावेळी डॉ. विकास गभणे, अंगराज समरित, देवचंद ठाकरे, राजु हाजी सलाम, स्वप्नील नशिने, नितीन तुमाने योगेश सिंगनजुडे विनयमोहन पशिने, महेंद्र गडकरी, विजय डेकाटे, राजेश देशमुख, भगवान बावणकर, संजय सतदेवे, जि.प. सदस्य रेखा ठाकरे, ज्योती खवास, उत्तम कळपाते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)भेलच्या महाप्रबंधकांना ५ हजार कोटी खर्च करण्याचा अधिकार तत्कालीन युपीए सरकारच्या काळात आपल्या पुढाकाराने ‘भेल’ या कारखान्याची पायाभरणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतरच्या लोकप्रतिनिधींनी ‘भेल‘ला कॅबिनेटची मंजुरी नव्हती, असा अपप्रचार जिल्ह्यात सुरू केला. भेलच्या महाप्रबंधकांना पाच हजार कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्याचा अधिकार आहे, असे असताना केवळ अपप्रचार करणे सुरू आहे.मागास क्षेत्र विकास योजना बंद भंडारा जिल्ह्यातून मागासक्षेत्र विकास योजना (बीआरजीएफ) बंद करण्यात आली. राष्ट्रीय कृषी विकास योजना गुंडाळण्यात आली. एमआरईजीएसचा निधी कमी केला, एपीएल कार्डधारकांचे धान्य, करोसीन बंद केले. वाढत्या महागाईला तोंड देताना सर्वसामान्य लोकांच्या नाकीनऊ येत आहे.