शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने बंधने लादली, परंतु रोजगार कोण देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:32 IST

युवराज गोमासे करडी (पालोरा): करडी परिसरात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या कामासाठी सकाळची ...

युवराज गोमासे

करडी (पालोरा): करडी परिसरात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या कामासाठी सकाळची वेळ सोडली तर इतर वेळी नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र कामधंदे ठप्प आहेत. अशातच मोलमजुरी करणान्या मजुरांची स्थिती भयावह आहे. त्यातच आता आणखी काही दिवसांसाठी 'ब्रेक द चेन' या लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मजूर वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.

मजुरांच्या पोटाच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन

प्रयत्नरत आहे. तसेच नागरिकांकडून प्रतिसाद मिळत

आहे, परंतु यांच्यात आर्थिक संकट निर्माण होत आहे. यात

लघु व्यावसायिक व हातावर पोट असणाऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होत आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती निर्माण झाली आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे.

अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने ब्रेक द चेनमुळे ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. नागरिकांना

जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी काही वेळ मर्यादित करून

देण्यात आली आहे. अगोदरच कामधंदे बंद झाल्यामुळे मजूर वर्गाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन वाढविल्यामुळे मजुरांच्या संकटामध्ये भर पडली आहे. मजूर वर्गासाठी सरकारने पावले उचलून मदतीच्या हात देण्याची मागणी होत आहे.

एकीकडे शासन गरीब मजुरांना अल्पदरात धान्य वाटप

करण्याच्या तसेच मोफत जेवण देण्याच्या वल्गना करीत आहे. ही केवळ आश्वासनेच असून प्रत्यक्ष मजुरांच्या झोळीत काहीच पडत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. संचारबंदी लागू करण्यापूर्वी सर्वसामान्य व गरीब लोकांचा प्राधान्याने विचार करणार, रोजीरोटी कायम ठेवण्यात येईल असे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र मजुरांना अजूनही रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न कायम आहे.

बॉक्स

वाढत्या उष्णतेने जनावरांचे आरोग्य धोक्यात

पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळलेली तुरळक संख्येत जनावरे औषधोपचारासाठी

आणण्यात येते. वाढत्या तापमानात आता जनावरांचीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरापासून उन्हाच्या झळा तीव्र होण्यास

सुरूवात झाली आहे. एप्रिल अखेरच्या पंधरवड्यात तर तापमान ४२ ते ४५ अंशाच्या घरात वाढते. मध्यंतरी

वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागतो आहे. मनुष्याप्रमाणेच प्राण्यांच्याही प्रकृतीत बिघाड येतो आहे. उष्णतामान वाढून जनावरांनाही ताप येतो. जनावरे तसेच पक्षीदेखील उन्हाच्या तडाख्यात आजारी होतात. या बाबी अपवादात्मक दिसत असल्या तरी पशुपक्ष्यांचीही काळजी घेण्याची गरज आहे. जनावरे, पक्ष्यांना पाणी तसेच खाद्य न मिळाल्यास त्यानाही उष्माघाताच्या आजाराला समोरे जावे लागत आहे.