शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

शासनाने बंधने लादली, परंतु रोजगार कोण देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:32 IST

युवराज गोमासे करडी (पालोरा): करडी परिसरात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या कामासाठी सकाळची ...

युवराज गोमासे

करडी (पालोरा): करडी परिसरात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या कामासाठी सकाळची वेळ सोडली तर इतर वेळी नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र कामधंदे ठप्प आहेत. अशातच मोलमजुरी करणान्या मजुरांची स्थिती भयावह आहे. त्यातच आता आणखी काही दिवसांसाठी 'ब्रेक द चेन' या लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मजूर वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.

मजुरांच्या पोटाच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन

प्रयत्नरत आहे. तसेच नागरिकांकडून प्रतिसाद मिळत

आहे, परंतु यांच्यात आर्थिक संकट निर्माण होत आहे. यात

लघु व्यावसायिक व हातावर पोट असणाऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होत आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती निर्माण झाली आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे.

अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने ब्रेक द चेनमुळे ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. नागरिकांना

जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी काही वेळ मर्यादित करून

देण्यात आली आहे. अगोदरच कामधंदे बंद झाल्यामुळे मजूर वर्गाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन वाढविल्यामुळे मजुरांच्या संकटामध्ये भर पडली आहे. मजूर वर्गासाठी सरकारने पावले उचलून मदतीच्या हात देण्याची मागणी होत आहे.

एकीकडे शासन गरीब मजुरांना अल्पदरात धान्य वाटप

करण्याच्या तसेच मोफत जेवण देण्याच्या वल्गना करीत आहे. ही केवळ आश्वासनेच असून प्रत्यक्ष मजुरांच्या झोळीत काहीच पडत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. संचारबंदी लागू करण्यापूर्वी सर्वसामान्य व गरीब लोकांचा प्राधान्याने विचार करणार, रोजीरोटी कायम ठेवण्यात येईल असे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र मजुरांना अजूनही रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न कायम आहे.

बॉक्स

वाढत्या उष्णतेने जनावरांचे आरोग्य धोक्यात

पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळलेली तुरळक संख्येत जनावरे औषधोपचारासाठी

आणण्यात येते. वाढत्या तापमानात आता जनावरांचीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरापासून उन्हाच्या झळा तीव्र होण्यास

सुरूवात झाली आहे. एप्रिल अखेरच्या पंधरवड्यात तर तापमान ४२ ते ४५ अंशाच्या घरात वाढते. मध्यंतरी

वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागतो आहे. मनुष्याप्रमाणेच प्राण्यांच्याही प्रकृतीत बिघाड येतो आहे. उष्णतामान वाढून जनावरांनाही ताप येतो. जनावरे तसेच पक्षीदेखील उन्हाच्या तडाख्यात आजारी होतात. या बाबी अपवादात्मक दिसत असल्या तरी पशुपक्ष्यांचीही काळजी घेण्याची गरज आहे. जनावरे, पक्ष्यांना पाणी तसेच खाद्य न मिळाल्यास त्यानाही उष्माघाताच्या आजाराला समोरे जावे लागत आहे.