शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने बंधने लादली, परंतु रोजगार कोण देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:32 IST

युवराज गोमासे करडी (पालोरा): करडी परिसरात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या कामासाठी सकाळची ...

युवराज गोमासे

करडी (पालोरा): करडी परिसरात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या कामासाठी सकाळची वेळ सोडली तर इतर वेळी नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र कामधंदे ठप्प आहेत. अशातच मोलमजुरी करणान्या मजुरांची स्थिती भयावह आहे. त्यातच आता आणखी काही दिवसांसाठी 'ब्रेक द चेन' या लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मजूर वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.

मजुरांच्या पोटाच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन

प्रयत्नरत आहे. तसेच नागरिकांकडून प्रतिसाद मिळत

आहे, परंतु यांच्यात आर्थिक संकट निर्माण होत आहे. यात

लघु व्यावसायिक व हातावर पोट असणाऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होत आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती निर्माण झाली आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे.

अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने ब्रेक द चेनमुळे ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. नागरिकांना

जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी काही वेळ मर्यादित करून

देण्यात आली आहे. अगोदरच कामधंदे बंद झाल्यामुळे मजूर वर्गाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन वाढविल्यामुळे मजुरांच्या संकटामध्ये भर पडली आहे. मजूर वर्गासाठी सरकारने पावले उचलून मदतीच्या हात देण्याची मागणी होत आहे.

एकीकडे शासन गरीब मजुरांना अल्पदरात धान्य वाटप

करण्याच्या तसेच मोफत जेवण देण्याच्या वल्गना करीत आहे. ही केवळ आश्वासनेच असून प्रत्यक्ष मजुरांच्या झोळीत काहीच पडत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. संचारबंदी लागू करण्यापूर्वी सर्वसामान्य व गरीब लोकांचा प्राधान्याने विचार करणार, रोजीरोटी कायम ठेवण्यात येईल असे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र मजुरांना अजूनही रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न कायम आहे.

बॉक्स

वाढत्या उष्णतेने जनावरांचे आरोग्य धोक्यात

पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळलेली तुरळक संख्येत जनावरे औषधोपचारासाठी

आणण्यात येते. वाढत्या तापमानात आता जनावरांचीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरापासून उन्हाच्या झळा तीव्र होण्यास

सुरूवात झाली आहे. एप्रिल अखेरच्या पंधरवड्यात तर तापमान ४२ ते ४५ अंशाच्या घरात वाढते. मध्यंतरी

वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागतो आहे. मनुष्याप्रमाणेच प्राण्यांच्याही प्रकृतीत बिघाड येतो आहे. उष्णतामान वाढून जनावरांनाही ताप येतो. जनावरे तसेच पक्षीदेखील उन्हाच्या तडाख्यात आजारी होतात. या बाबी अपवादात्मक दिसत असल्या तरी पशुपक्ष्यांचीही काळजी घेण्याची गरज आहे. जनावरे, पक्ष्यांना पाणी तसेच खाद्य न मिळाल्यास त्यानाही उष्माघाताच्या आजाराला समोरे जावे लागत आहे.