शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सरकारने केली शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:24 IST

गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : आंदोलनातून युवक काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत. ही सरकार शेतकऱ्यांवर सतत अन्याय करीत आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथे संसद घेरावमध्ये बोलतांना अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसच्यावतीने दिल्ली येथे ‘जवाब दो हिसाब दो किसान खेतमजदूर रॅली व संसद घेराव’ आंदोलन करण्यात आले होते. मोदी सरकार ही पूर्ण पणे शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार त्यांच्या कायार्तून दिसून आले.त्यात प्रामुख्याने दिल्ली येथे तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी तब्बल एक महिना केलेले आंदोलन असो की अन्य आंदोलन शेतकऱ्यांची कोणतीच चिंता मोदी सरकारने केली नाही. उत्तरप्रदेशचे शेतकरी आपल्या मागण्यासाठी पायी चालत दिल्लीला यायच्या आधीच सरकारने त्याच्यावर अमानुष लाठी हल्ला केला होता. अशा या सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो हिसाब दो आंदोलन २३ आॅक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता.शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी त्यांना न्याय मिळण्याकरिता नाना पटोले यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे संसद घेरावमध्ये भंडारा जिल्हा युवक काँग्रेसने सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाल्या पाहिजे स्वामिनाथन आयोग लागू झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या पाहिजे यासाठी आंदोलनात युवक काँग्रेसने घोषणाबाजी केली व शेतकरी विरोधी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले खोटे आस्वासन शेतकऱ्यांपर्यन्त पोहचविणार असे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विशाल भोयर यांनी सांगितले.संसद घेरावमध्ये भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला होता. त्यात प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विशाल भोयर, यशवंत खेडीकर (साकोली), विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन निर्वाण, सुरज पंचबुद्धे, निखिल सिंगनजुडे, नरेश करंजेकर, तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस