शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

सरकारने केली शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:24 IST

गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : आंदोलनातून युवक काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत. ही सरकार शेतकऱ्यांवर सतत अन्याय करीत आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथे संसद घेरावमध्ये बोलतांना अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसच्यावतीने दिल्ली येथे ‘जवाब दो हिसाब दो किसान खेतमजदूर रॅली व संसद घेराव’ आंदोलन करण्यात आले होते. मोदी सरकार ही पूर्ण पणे शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार त्यांच्या कायार्तून दिसून आले.त्यात प्रामुख्याने दिल्ली येथे तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी तब्बल एक महिना केलेले आंदोलन असो की अन्य आंदोलन शेतकऱ्यांची कोणतीच चिंता मोदी सरकारने केली नाही. उत्तरप्रदेशचे शेतकरी आपल्या मागण्यासाठी पायी चालत दिल्लीला यायच्या आधीच सरकारने त्याच्यावर अमानुष लाठी हल्ला केला होता. अशा या सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो हिसाब दो आंदोलन २३ आॅक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता.शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी त्यांना न्याय मिळण्याकरिता नाना पटोले यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे संसद घेरावमध्ये भंडारा जिल्हा युवक काँग्रेसने सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाल्या पाहिजे स्वामिनाथन आयोग लागू झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या पाहिजे यासाठी आंदोलनात युवक काँग्रेसने घोषणाबाजी केली व शेतकरी विरोधी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले खोटे आस्वासन शेतकऱ्यांपर्यन्त पोहचविणार असे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विशाल भोयर यांनी सांगितले.संसद घेरावमध्ये भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला होता. त्यात प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विशाल भोयर, यशवंत खेडीकर (साकोली), विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन निर्वाण, सुरज पंचबुद्धे, निखिल सिंगनजुडे, नरेश करंजेकर, तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस