शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सरकारने केली शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:24 IST

गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : आंदोलनातून युवक काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत. ही सरकार शेतकऱ्यांवर सतत अन्याय करीत आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथे संसद घेरावमध्ये बोलतांना अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसच्यावतीने दिल्ली येथे ‘जवाब दो हिसाब दो किसान खेतमजदूर रॅली व संसद घेराव’ आंदोलन करण्यात आले होते. मोदी सरकार ही पूर्ण पणे शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार त्यांच्या कायार्तून दिसून आले.त्यात प्रामुख्याने दिल्ली येथे तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी तब्बल एक महिना केलेले आंदोलन असो की अन्य आंदोलन शेतकऱ्यांची कोणतीच चिंता मोदी सरकारने केली नाही. उत्तरप्रदेशचे शेतकरी आपल्या मागण्यासाठी पायी चालत दिल्लीला यायच्या आधीच सरकारने त्याच्यावर अमानुष लाठी हल्ला केला होता. अशा या सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो हिसाब दो आंदोलन २३ आॅक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता.शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी त्यांना न्याय मिळण्याकरिता नाना पटोले यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे संसद घेरावमध्ये भंडारा जिल्हा युवक काँग्रेसने सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाल्या पाहिजे स्वामिनाथन आयोग लागू झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या पाहिजे यासाठी आंदोलनात युवक काँग्रेसने घोषणाबाजी केली व शेतकरी विरोधी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले खोटे आस्वासन शेतकऱ्यांपर्यन्त पोहचविणार असे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विशाल भोयर यांनी सांगितले.संसद घेरावमध्ये भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला होता. त्यात प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विशाल भोयर, यशवंत खेडीकर (साकोली), विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन निर्वाण, सुरज पंचबुद्धे, निखिल सिंगनजुडे, नरेश करंजेकर, तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस