शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

समस्या सोडविण्यासाठी सरकारला वेळ नाही

By admin | Updated: October 27, 2015 00:38 IST

अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. डाळभात खाणे सरकारने हिरावून घेतले आहे.

प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन : लाखनी येथे नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ सभालाखनी : अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. डाळभात खाणे सरकारने हिरावून घेतले आहे. युतीचे सरकार आपसी भांडणात मशगूल झालेली आहे. सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारला वेळ नाही. त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले.स्थानिक कच्छी मेमन सभागृहात लाखनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमेटीद्वारे आयोजित नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार राजू जैन, जिल्हा परिषदचे सभापती नरेश डहारे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, तालुकाध्यक्ष डॉ.विकास गभणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक चोले, बाळा शिवणकर, जुल्फीकार हुमणे, दिनेश वंजारी, विनोद भुते, निलेश गाढवे, प्रशांत मेश्राम आदी उपस्थित होते. ते म्हणाले, खासदार व केंद्रीय मंत्री म्हणून सरकारमध्ये काम करताना लाखनीच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. लाखनी येथे प्रत्येक समाजाचे परिपूर्ण सभागृह, सीमेंट रस्ते, भेल उपक्रमाचा प्रारंभ असे विविध काम केली आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले. लाखनीचा विकास घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने देशाचा विकास घडवून आणला आहे. भंडारा जिल्ह्याकडे सातत्याने लक्ष दिले. सिंचनापासून अनेक शिबिरांचे आयोजन करून लोककल्याणकारी कार्यक्रम राबविले. भंडारा सारख्या मागासलेल्या व लाखनीच्या विकासात भर घालण्यासाठी वारंवार निधी उपलब्ध करून दिल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. आभार प्रदर्शन धनू व्यास यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)