शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांविषयी सत्ताधारी गप्प

By admin | Updated: March 7, 2016 00:16 IST

भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे दोन वर्ष पूर्ण झाले असले तरी शेतकऱ्यांसाठी योग्य ते धोरण नाही. केवळ घोषणांचा पाऊस सुरु असुन उद्योगपतींना मोठे करणारे सरकार...

प्रफुल पटेलांचा सवाल : लाखनी, साकोली, लाखांदुरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावालाखनी : भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे दोन वर्ष पूर्ण झाले असले तरी शेतकऱ्यांसाठी योग्य ते धोरण नाही. केवळ घोषणांचा पाऊस सुरु असुन उद्योगपतींना मोठे करणारे सरकार आणि सत्तापक्षाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांबाबद गप्प का, असा सवाल खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला. लाखनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राकॉंचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, अविनाश ब्राम्हणकर, सभापती नरेश डहारे, शुभांगी रहांगडाले, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष धनु व्यास, सभापती दीपाली जांभुळकर, माजी सभापती अशोक चोले, दामाजी खंडाईत, जुल्फीकार हुमणे, विकास गभणे, बाळा शिवणकर, नूतन मेंढे, उर्मिला आगाशे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधीवर आरोप करीत अनेक समस्या जिल्ह्यात असताना कुणीही बोलत का नाही. केंद्राने सादर केलेला आर्थिक बजेट २००५ च्या आघाडी शासनाच्या काळातील बजेटशी तुलना केली असता एक रुपयाही त्यात वाढविला नाही. भेल प्रकल्पाबाबतही कुणी बोलत नाही. शासन सर्वांची फसवणूक करीत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत जनजागृती करावी असे आवाहनही खा. पटेल यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विकास गभणे, संचालन सुधन्वा चेटुले व आभार धनू व्यास यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)लाखांदुरात कार्यकर्ता मेळावालाखांदुर : येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी खा. प्रफुल पटेल, मधुकर कुकडे, सुनील फुंडे, सभापती राजेश डोंगरे, डॉ. वानखेडे, डोमेश वैद्य, तोमेश्वर पंचभाई, प्रभाकर सपाटे, नरेश दिवटे, बाळु चुन्ने, अ‍ॅड. मोहन राऊत, प्रियंक बोरकर, उदयभैय्या, न.प. सदस्य देवानंद नागदेवे, कल्पना जाधव, दीपक चिमणकर, वैशाली हटवार आदी उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले, सत्तेत असताना विकास कामासोबत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व शेतीपूरक व्यवसायाला बळ देण्यासाठी पाऊले उचलली होती. मात्र सत्ता परिवर्तन होताच सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शेतीकरिता येणारा उत्पन्न खर्च हा कमी झाला पाहिजे. शासनाने यासाठी ठोस पाऊल उचलावे असेही ते म्हणाले.(तालुका प्रतिनिधी)शेतमालाला भाव निम्म्यावरसाकोली : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढले असे पंतप्रधान मोदी सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारख्या बराच सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. मात्र आजच्या भाजप सरकारने शेतमालाचे भाव निम्म्यावर आणून ठेवले आहे, असे मत खा. पटेल यांनी व्यक्त केले. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी हितगुज करतांना बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, सुनील फुंडे, सदाशिव वलथरे, नाना पंचबुध्दे, धनंजय दलाल, वसंतराव मानके, अविनाश ब्राह्मणकर उपस्थित होते. प्रास्ताविक उमेद घोडसे, तर संचालन टेंभरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)