शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शेतकऱ्यांविषयी सत्ताधारी गप्प

By admin | Updated: March 7, 2016 00:16 IST

भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे दोन वर्ष पूर्ण झाले असले तरी शेतकऱ्यांसाठी योग्य ते धोरण नाही. केवळ घोषणांचा पाऊस सुरु असुन उद्योगपतींना मोठे करणारे सरकार...

प्रफुल पटेलांचा सवाल : लाखनी, साकोली, लाखांदुरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावालाखनी : भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे दोन वर्ष पूर्ण झाले असले तरी शेतकऱ्यांसाठी योग्य ते धोरण नाही. केवळ घोषणांचा पाऊस सुरु असुन उद्योगपतींना मोठे करणारे सरकार आणि सत्तापक्षाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांबाबद गप्प का, असा सवाल खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला. लाखनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राकॉंचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, अविनाश ब्राम्हणकर, सभापती नरेश डहारे, शुभांगी रहांगडाले, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष धनु व्यास, सभापती दीपाली जांभुळकर, माजी सभापती अशोक चोले, दामाजी खंडाईत, जुल्फीकार हुमणे, विकास गभणे, बाळा शिवणकर, नूतन मेंढे, उर्मिला आगाशे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधीवर आरोप करीत अनेक समस्या जिल्ह्यात असताना कुणीही बोलत का नाही. केंद्राने सादर केलेला आर्थिक बजेट २००५ च्या आघाडी शासनाच्या काळातील बजेटशी तुलना केली असता एक रुपयाही त्यात वाढविला नाही. भेल प्रकल्पाबाबतही कुणी बोलत नाही. शासन सर्वांची फसवणूक करीत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत जनजागृती करावी असे आवाहनही खा. पटेल यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विकास गभणे, संचालन सुधन्वा चेटुले व आभार धनू व्यास यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)लाखांदुरात कार्यकर्ता मेळावालाखांदुर : येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी खा. प्रफुल पटेल, मधुकर कुकडे, सुनील फुंडे, सभापती राजेश डोंगरे, डॉ. वानखेडे, डोमेश वैद्य, तोमेश्वर पंचभाई, प्रभाकर सपाटे, नरेश दिवटे, बाळु चुन्ने, अ‍ॅड. मोहन राऊत, प्रियंक बोरकर, उदयभैय्या, न.प. सदस्य देवानंद नागदेवे, कल्पना जाधव, दीपक चिमणकर, वैशाली हटवार आदी उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले, सत्तेत असताना विकास कामासोबत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व शेतीपूरक व्यवसायाला बळ देण्यासाठी पाऊले उचलली होती. मात्र सत्ता परिवर्तन होताच सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शेतीकरिता येणारा उत्पन्न खर्च हा कमी झाला पाहिजे. शासनाने यासाठी ठोस पाऊल उचलावे असेही ते म्हणाले.(तालुका प्रतिनिधी)शेतमालाला भाव निम्म्यावरसाकोली : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढले असे पंतप्रधान मोदी सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारख्या बराच सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. मात्र आजच्या भाजप सरकारने शेतमालाचे भाव निम्म्यावर आणून ठेवले आहे, असे मत खा. पटेल यांनी व्यक्त केले. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी हितगुज करतांना बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, सुनील फुंडे, सदाशिव वलथरे, नाना पंचबुध्दे, धनंजय दलाल, वसंतराव मानके, अविनाश ब्राह्मणकर उपस्थित होते. प्रास्ताविक उमेद घोडसे, तर संचालन टेंभरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)