शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:15 IST

मागील तीन वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वी राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहादेव जानकर : पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण

आॅनलाईन लोकमतभंडारा : मागील तीन वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वी राबविण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी समतोल शाश्वत विकास, दरडोई उत्पन्नात वाढ करणे, क्षमतावर्धन, जल, जंगल आणि जमीन संवर्धन, भाजीपाला क्लस्टर, पुरवठा साखळी, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम विकास, पुनर्भरण प्रकल्प यावर आधारित जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.पोलीस कवायत मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते. यावेळी ना.महादेव जानकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकूमार सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेख्रर धकाते, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील जिल्हा बँकेने ४२ हजार ५०५ शेतकरी सभासदांना ९२ कोटी ४४ लाख रूपयांचा लाभ दिला. राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक व खाजगी बँकेने सहा हजार ७५८ शेतकरी सभासदांना ५० कोटी ९ लाख रकमेचा लाभ दिला आहे. पात्र शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षात २०१ गावांची निवड करण्यात आली. सर्व यंत्रणांनी केलेल्या कामामुळे २७ हजार २०० हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानात भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून १० गावामध्ये पुनर्भरणाच्या ५० योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. यावर्षी १७ गावांमध्ये ९५ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून याद्वारे भूजल पातळी वाढविली जाणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनमार्फत ५६ हजार ९१८ वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. पायाभूत सर्वेक्षणानुसार मागील तीन वर्षात राबविलेल्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानामुळे जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात जे ११ जिल्हे हागणदारीमुक्त झाले त्यात भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे.गोसेखुर्द प्रकल्पातील १२८ गावातील एकूण ११ हजार ७९१ लाभार्थ्यांना ३५३ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पबाधीत ६४१ पात्र कुटूंबापैकी ५७० खातेदारांना १८ कोटी ५९ लाखाचे विशेष पॅकेज अंतर्गत वाटप करण्यात आले.भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जलसाठयाचा उपयोग मत्स्य व्यवसायासाठी करण्यात येत आहे. मत्स्यजीरे उत्पादनात जिल्हा राज्यात अग्रेसर असून यावर्षी मच्छीमार सहकारी संस्था आणि शिवणीबांध येथील मत्स्यबीज उत्पादन केंद्राद्वारे डिसेंबरअखेर १३.९३ कोटी मत्स्यजीरे निर्मिती केली आहे. मत्स्य व्यवसायात रोजगाराच्या खूप संधी आहेत. यासाठी प्रशासन नियोजन करीत आहे.यावेळी पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी प्राविण्यप्राप्त अधिकारी, कर्मचारी, खेळाडू व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध विभागाने तयार केलेल्या चित्ररथांचा पथसंचलनात सहभाग होता.शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, नागरिक अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाचे संचलन स्मिता गालफाडे, मुकूंद ठवकर यांनी केले.