शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

गोसेचे बॅकवॉटर शेतात, तीन वर्षांपासून मोबदला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2022 20:41 IST

दवडीपार गाव गोसेच्या बुडीत क्षेत्रालगत आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पात गेली, तर अनेक शेतकऱ्यांची बुडीत क्षेत्रालगत शेती आहे. बॅकवॉटर कोठपर्यंत येणार याचे सीमांकन करण्यात आले होते. शेतापासून सीमांकनाचा दगड दूर असल्याने शेतकरी धानाची बिनधास्त रोवणी करतात. मात्र गत तीन वर्षांपासून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात प्रकल्पाची पाणी पातळी वाढली की दवडीपार येथील शेतात पाणी शिरते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बुडीत क्षेत्राबाहेरील शेतात गोसेचे बॅकवॉटर शिरत असून, काढणीला आलेला धान शेतातच सडत आहे. तीन वर्षांपासून हा प्रकार भंडारा तालुक्यातील दवडीपार येथे सुरू आहे. २० शेतकऱ्यांच्या सुमारे ६० एकरात पाणीच पाणी असते. मात्र, या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. यात प्रत्येक शेतकऱ्याचे ४० ते ५० हजारांचे नुकसान होत आहे. पाणी पातळीच्या चुकीच्या सर्वेक्षणाचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे. दवडीपार गाव गोसेच्या बुडीत क्षेत्रालगत आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पात गेली, तर अनेक शेतकऱ्यांची बुडीत क्षेत्रालगत शेती आहे. बॅकवॉटर कोठपर्यंत येणार याचे सीमांकन करण्यात आले होते. शेतापासून सीमांकनाचा दगड दूर असल्याने शेतकरी धानाची बिनधास्त रोवणी करतात. मात्र गत तीन वर्षांपासून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात प्रकल्पाची पाणी पातळी वाढली की दवडीपार येथील शेतात पाणी शिरते. आता धान कापणीला आला आहे. मात्र, शेतात दोन ते तीन फूट पाणी आहे. शेतात जाणेही कठीण आहे. धान जागेवरच सडू देण्याशिवाय पर्याय नाही.  यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

सांगा शेतात कसे जायचे?- शेताच्या चहूबाजूने बॅकवाटर आहे. धानाच्या बांधितही पाणीच पाणी आहे. परिसरात धान कापणी जोमात सुरू आहे. आमच्या शेतात धान सडत आहे. यावर्षी पाणी शिरणार नाही असे समजून आशेने लागवड करतो; पण ऐन हंगामात पाणी शिरते. आता धान कापणीसाठी शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.

डोळ्यांदेखत धान सडतो पाण्यातगोसेच पाणी शिरले की, बांधित सतत पाणी राहते. त्यामुळे धान भरत नाही. सततच्या पाण्याने धान जागेवरच सडते, असे शेतकरी सांगतात. रामकृष्ण वाढ, खुशाल सेलाेकर, गजानन सेलोकर, पांडुरंग कुथे, देवराव कुथे, गंगाधर ठवकर, अशोक वैद्य, जगदीश ठवकर यांच्यासह सुमारे २० शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मोबदला मिळावा म्हणून गोसे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही.

मोठा खर्च करून धानाची राेवणी करतो, मात्र बॅकवॉटर शेतात शिरते आणि मोठे नुकसान होते. तीन वर्षांपासून धान पिकाचे नुकसान होत आहे. मात्र शासनाने एकदाही मदत दिली नाही. चुकीच्या सर्वेक्षणाचा आम्हा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी.रामकृष्ण वाठ, शेतकरी, दवडीपार

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पagricultureशेती