शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

‘गोसेखुर्द’प्रकल्प झाला ६२,२६३ हेक्टर सिंचनक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:21 IST

राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पातून जून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे२०१९ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार ! : १३,८९३ हेक्टर लाभक्षेत्रातील कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पातून जून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाले आहे. डिसेंबर २०१९ अखेर १ लाख ८८ हजार ५३७ हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीचे नियोजन असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: या प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहेत. या प्रकल्पांतर्गत १.९० लाख हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित असून त्यापैकी १३,८९३ हेक्टर लाभ क्षेत्रात विकासकामे झाली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट या प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटी रूपयांचा निधी दिला आहे. केंद्र सरकारकडून ९० टक्के अर्थसहाय्य मिळत आहे.या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात पिण्यासाठी पाणीपुरवठा, औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्यव्यवसाय, जलविद्युत निर्मिती होणार आहे. यामुळे १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून त्यापासून २ लाख ५० हजार ८०० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाच्या १८,४९४.५७ कोटींच्या प्रस्तावाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.गोसेखुर्द प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पामध्ये ६२० दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. या प्रकल्पातून ६२ हजार २६३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा झाली असून या प्रकल्पाच्या पाणीवितरीकेचे काम पूर्ण झाल्यानंतर २ लाख ५० हजार ८०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. त्यासाठी २०१९-२० पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाअंतर्गत मुख्य धरणासह चार उपसा सिंचन योजना, उजवा कालवा, डावा कालवा, असोलामेंढा प्रकल्प व इतर छोटया पाच उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. या प्रकल्पामधून उजवा कालवा ९९ किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यातील ७१ हजार ८१० हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून त्यापैकी १३ हजार ९२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे.डावा कालवा हा २३ किलोमीटरचा असून यामधून ३१ हजार ५७७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून त्यापैकी १० हजार ६८३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. उजवा कालव्याच्या पुढे आसोलामेंढा प्रकल्प व मुख्य कालव्यापर्यंत राहणार असून त्याची लांबी ४३ किलोमीटरची आहे. यामधून १२ हजार ३५६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.१२,८३५.४८ कोटींचा खर्च वाढलाएकूण प्रकल्प किंमतीतील वाढ १२,८३५.४८ कोटी रूपयांची आहे. त्यात निव्वळ दरवाढीमुळे ३,५४४.९५ कोटी, भूसंपादन दरातील वाढीमुळे १,९७३.७९ कोटी, संकल्प चित्रातील बदल १,६४६.७२ कोटी, द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेनंतर झालेल्या अतिरिक्त भौतिक प्रकल्प घटकांमुळे झालेली वाढ ३,०६७.०२ कोटी, पुनर्वसन पॅकेज, एनपीव्ही आदी कारणांमुळे १,४९०.५८ कोटी आणि आस्थापना व अनुषंगिक खर्चासाठी ८६४.६३ कोटी, मागील काळात दिलेल्या जादा दराच्या निविदा आदी असा एकूण १२,८३५.४८ कोटी खर्च वाढला आहे.