शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
2
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
3
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
4
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
6
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
7
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
8
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
9
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
10
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
11
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
12
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
13
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
14
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
15
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
16
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
17
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
18
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
19
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
20
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  

‘गोसेखुर्द’प्रकल्प झाला ६२,२६३ हेक्टर सिंचनक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:21 IST

राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पातून जून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे२०१९ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार ! : १३,८९३ हेक्टर लाभक्षेत्रातील कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पातून जून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाले आहे. डिसेंबर २०१९ अखेर १ लाख ८८ हजार ५३७ हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीचे नियोजन असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: या प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहेत. या प्रकल्पांतर्गत १.९० लाख हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित असून त्यापैकी १३,८९३ हेक्टर लाभ क्षेत्रात विकासकामे झाली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट या प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटी रूपयांचा निधी दिला आहे. केंद्र सरकारकडून ९० टक्के अर्थसहाय्य मिळत आहे.या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात पिण्यासाठी पाणीपुरवठा, औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्यव्यवसाय, जलविद्युत निर्मिती होणार आहे. यामुळे १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून त्यापासून २ लाख ५० हजार ८०० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाच्या १८,४९४.५७ कोटींच्या प्रस्तावाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.गोसेखुर्द प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पामध्ये ६२० दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. या प्रकल्पातून ६२ हजार २६३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा झाली असून या प्रकल्पाच्या पाणीवितरीकेचे काम पूर्ण झाल्यानंतर २ लाख ५० हजार ८०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. त्यासाठी २०१९-२० पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाअंतर्गत मुख्य धरणासह चार उपसा सिंचन योजना, उजवा कालवा, डावा कालवा, असोलामेंढा प्रकल्प व इतर छोटया पाच उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. या प्रकल्पामधून उजवा कालवा ९९ किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यातील ७१ हजार ८१० हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून त्यापैकी १३ हजार ९२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे.डावा कालवा हा २३ किलोमीटरचा असून यामधून ३१ हजार ५७७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून त्यापैकी १० हजार ६८३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. उजवा कालव्याच्या पुढे आसोलामेंढा प्रकल्प व मुख्य कालव्यापर्यंत राहणार असून त्याची लांबी ४३ किलोमीटरची आहे. यामधून १२ हजार ३५६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.१२,८३५.४८ कोटींचा खर्च वाढलाएकूण प्रकल्प किंमतीतील वाढ १२,८३५.४८ कोटी रूपयांची आहे. त्यात निव्वळ दरवाढीमुळे ३,५४४.९५ कोटी, भूसंपादन दरातील वाढीमुळे १,९७३.७९ कोटी, संकल्प चित्रातील बदल १,६४६.७२ कोटी, द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेनंतर झालेल्या अतिरिक्त भौतिक प्रकल्प घटकांमुळे झालेली वाढ ३,०६७.०२ कोटी, पुनर्वसन पॅकेज, एनपीव्ही आदी कारणांमुळे १,४९०.५८ कोटी आणि आस्थापना व अनुषंगिक खर्चासाठी ८६४.६३ कोटी, मागील काळात दिलेल्या जादा दराच्या निविदा आदी असा एकूण १२,८३५.४८ कोटी खर्च वाढला आहे.