शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘गोसेखुर्द’प्रकल्प झाला ६२,२६३ हेक्टर सिंचनक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:21 IST

राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पातून जून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे२०१९ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार ! : १३,८९३ हेक्टर लाभक्षेत्रातील कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पातून जून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाले आहे. डिसेंबर २०१९ अखेर १ लाख ८८ हजार ५३७ हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीचे नियोजन असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: या प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहेत. या प्रकल्पांतर्गत १.९० लाख हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित असून त्यापैकी १३,८९३ हेक्टर लाभ क्षेत्रात विकासकामे झाली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट या प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटी रूपयांचा निधी दिला आहे. केंद्र सरकारकडून ९० टक्के अर्थसहाय्य मिळत आहे.या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात पिण्यासाठी पाणीपुरवठा, औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्यव्यवसाय, जलविद्युत निर्मिती होणार आहे. यामुळे १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून त्यापासून २ लाख ५० हजार ८०० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाच्या १८,४९४.५७ कोटींच्या प्रस्तावाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.गोसेखुर्द प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पामध्ये ६२० दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. या प्रकल्पातून ६२ हजार २६३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा झाली असून या प्रकल्पाच्या पाणीवितरीकेचे काम पूर्ण झाल्यानंतर २ लाख ५० हजार ८०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. त्यासाठी २०१९-२० पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाअंतर्गत मुख्य धरणासह चार उपसा सिंचन योजना, उजवा कालवा, डावा कालवा, असोलामेंढा प्रकल्प व इतर छोटया पाच उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. या प्रकल्पामधून उजवा कालवा ९९ किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यातील ७१ हजार ८१० हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून त्यापैकी १३ हजार ९२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे.डावा कालवा हा २३ किलोमीटरचा असून यामधून ३१ हजार ५७७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून त्यापैकी १० हजार ६८३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. उजवा कालव्याच्या पुढे आसोलामेंढा प्रकल्प व मुख्य कालव्यापर्यंत राहणार असून त्याची लांबी ४३ किलोमीटरची आहे. यामधून १२ हजार ३५६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.१२,८३५.४८ कोटींचा खर्च वाढलाएकूण प्रकल्प किंमतीतील वाढ १२,८३५.४८ कोटी रूपयांची आहे. त्यात निव्वळ दरवाढीमुळे ३,५४४.९५ कोटी, भूसंपादन दरातील वाढीमुळे १,९७३.७९ कोटी, संकल्प चित्रातील बदल १,६४६.७२ कोटी, द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेनंतर झालेल्या अतिरिक्त भौतिक प्रकल्प घटकांमुळे झालेली वाढ ३,०६७.०२ कोटी, पुनर्वसन पॅकेज, एनपीव्ही आदी कारणांमुळे १,४९०.५८ कोटी आणि आस्थापना व अनुषंगिक खर्चासाठी ८६४.६३ कोटी, मागील काळात दिलेल्या जादा दराच्या निविदा आदी असा एकूण १२,८३५.४८ कोटी खर्च वाढला आहे.