शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणामुळे मिळाली नवसंजीवनी

By admin | Updated: September 15, 2015 00:42 IST

विदर्भातील सर्वात मोठे राष्ट्रीय गोसेखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा करण्यात आला आहे

गोसेखुर्द प्रकल्प लाभक्षेत्र : शेतकरी जनआंदोलन समितीचे गठनपवनी : विदर्भातील सर्वात मोठे राष्ट्रीय गोसेखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा करण्यात आला आहे. या धरणाचे पाणी उजवा व डावा कालव्याद्वारे व उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीला देवून सिंचन करण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. पण अजुनही मोठ्या प्रमाणावर शेती वंचित आहे. त्यामुळे पुर्व विदर्भातील सिंचनापासून वंचित असलेल्या शेतीला सिंचन, करण्याकरिता, मासेमारी व्यवसाय काढावा याकरीता धरणाचे पाणी तलावात सोडावे, धरणाची शिल्लक असलेली कामे लवकरात लवकर पुर्ण व्हावे याकरीता जनआंदोलन उभारण्याच्या दृष्टीने गोसेखुर्द प्रकल्प लाभक्षेत्र शेतकरी जनआंदोलन समितीचे गठन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत समितीचे संयोजक मोहन पंचभाई यांनी दिली.पत्रकार परिषदेत माहिती देताना मोहन पंचभाई यांनी सांगीतले की, मागच्या व यावर्षी सुद्धा अवर्षणाची स्थिती असताना, गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या सिंचनामुळे येथील शेतीला फार मोठा फायदा झाला आहे. डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता खंडाते यांच्याकडे अनेकदा केलेली मागणी त्यांनी मान्य करून कालव्यात वेळोवेळी सिंचना करीता पाणी सोडले. त्यामुळे चौरास सह अनेक गावातील शेतीला मोठ्या प्रमाणात सोेय झाली.गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प असताना त्याचे काम फार संथ गतीने सुरु आहे. याकडे शासनाचा बघण्याचा दृष्टीकोन उदासीनतेचा आहे. प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी यांच्या अनेक समस्या आहेत. उपकालवे, पाटचारी यांचे कामे सुद्धा रखडले आहेत. अपुऱ्या निधीत ही कामे केव्हा पुर्ण होणार व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पाणी केव्हा मिळणार यात शंका निर्माण झाली आहे. या करीता प्रसंगानुरुप जनआंदोलन उभारणे काळाची गरज आज निर्माण झाली आहे.गोसेखुर्द धरणाच्या डाव्या तिरावर जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरु असून याद्वारे २४ मेगावॅटची विद्युत निर्मिती होणार आहे. त्यामुळे पवनी तालुक्यातील विजेची समस्या सुटणार आहे. तालुक्यात निर्माण होणारी विद्युत तालुक्यातच उपयोगात आणावी तसेच ढिवर समाजाचे मासेमारी करीता तलावातील पाणी आटल्यामुळे फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. या तलावात गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडावे व नेरला उपसा सिंचन व मोखाबर्डी उपसा सिंचन योजना पुर्णत्वास आल्यामुळे त्याद्वारे पाणी शेतीला द्यावे. आदी मागण्या संघर्ष समिती तर्फे करण्यात आल्या आहेत. (शहर/तालुका प्रतिनिधी)