शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

गोसेखुर्द धरणामुळे मिळाली नवसंजीवनी

By admin | Updated: September 15, 2015 00:42 IST

विदर्भातील सर्वात मोठे राष्ट्रीय गोसेखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा करण्यात आला आहे

गोसेखुर्द प्रकल्प लाभक्षेत्र : शेतकरी जनआंदोलन समितीचे गठनपवनी : विदर्भातील सर्वात मोठे राष्ट्रीय गोसेखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा करण्यात आला आहे. या धरणाचे पाणी उजवा व डावा कालव्याद्वारे व उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीला देवून सिंचन करण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. पण अजुनही मोठ्या प्रमाणावर शेती वंचित आहे. त्यामुळे पुर्व विदर्भातील सिंचनापासून वंचित असलेल्या शेतीला सिंचन, करण्याकरिता, मासेमारी व्यवसाय काढावा याकरीता धरणाचे पाणी तलावात सोडावे, धरणाची शिल्लक असलेली कामे लवकरात लवकर पुर्ण व्हावे याकरीता जनआंदोलन उभारण्याच्या दृष्टीने गोसेखुर्द प्रकल्प लाभक्षेत्र शेतकरी जनआंदोलन समितीचे गठन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत समितीचे संयोजक मोहन पंचभाई यांनी दिली.पत्रकार परिषदेत माहिती देताना मोहन पंचभाई यांनी सांगीतले की, मागच्या व यावर्षी सुद्धा अवर्षणाची स्थिती असताना, गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या सिंचनामुळे येथील शेतीला फार मोठा फायदा झाला आहे. डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता खंडाते यांच्याकडे अनेकदा केलेली मागणी त्यांनी मान्य करून कालव्यात वेळोवेळी सिंचना करीता पाणी सोडले. त्यामुळे चौरास सह अनेक गावातील शेतीला मोठ्या प्रमाणात सोेय झाली.गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प असताना त्याचे काम फार संथ गतीने सुरु आहे. याकडे शासनाचा बघण्याचा दृष्टीकोन उदासीनतेचा आहे. प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी यांच्या अनेक समस्या आहेत. उपकालवे, पाटचारी यांचे कामे सुद्धा रखडले आहेत. अपुऱ्या निधीत ही कामे केव्हा पुर्ण होणार व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पाणी केव्हा मिळणार यात शंका निर्माण झाली आहे. या करीता प्रसंगानुरुप जनआंदोलन उभारणे काळाची गरज आज निर्माण झाली आहे.गोसेखुर्द धरणाच्या डाव्या तिरावर जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरु असून याद्वारे २४ मेगावॅटची विद्युत निर्मिती होणार आहे. त्यामुळे पवनी तालुक्यातील विजेची समस्या सुटणार आहे. तालुक्यात निर्माण होणारी विद्युत तालुक्यातच उपयोगात आणावी तसेच ढिवर समाजाचे मासेमारी करीता तलावातील पाणी आटल्यामुळे फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. या तलावात गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडावे व नेरला उपसा सिंचन व मोखाबर्डी उपसा सिंचन योजना पुर्णत्वास आल्यामुळे त्याद्वारे पाणी शेतीला द्यावे. आदी मागण्या संघर्ष समिती तर्फे करण्यात आल्या आहेत. (शहर/तालुका प्रतिनिधी)