शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोसेखुर्द धरणामुळे मिळाली नवसंजीवनी

By admin | Updated: September 15, 2015 00:42 IST

विदर्भातील सर्वात मोठे राष्ट्रीय गोसेखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा करण्यात आला आहे

गोसेखुर्द प्रकल्प लाभक्षेत्र : शेतकरी जनआंदोलन समितीचे गठनपवनी : विदर्भातील सर्वात मोठे राष्ट्रीय गोसेखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा करण्यात आला आहे. या धरणाचे पाणी उजवा व डावा कालव्याद्वारे व उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीला देवून सिंचन करण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. पण अजुनही मोठ्या प्रमाणावर शेती वंचित आहे. त्यामुळे पुर्व विदर्भातील सिंचनापासून वंचित असलेल्या शेतीला सिंचन, करण्याकरिता, मासेमारी व्यवसाय काढावा याकरीता धरणाचे पाणी तलावात सोडावे, धरणाची शिल्लक असलेली कामे लवकरात लवकर पुर्ण व्हावे याकरीता जनआंदोलन उभारण्याच्या दृष्टीने गोसेखुर्द प्रकल्प लाभक्षेत्र शेतकरी जनआंदोलन समितीचे गठन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत समितीचे संयोजक मोहन पंचभाई यांनी दिली.पत्रकार परिषदेत माहिती देताना मोहन पंचभाई यांनी सांगीतले की, मागच्या व यावर्षी सुद्धा अवर्षणाची स्थिती असताना, गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या सिंचनामुळे येथील शेतीला फार मोठा फायदा झाला आहे. डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता खंडाते यांच्याकडे अनेकदा केलेली मागणी त्यांनी मान्य करून कालव्यात वेळोवेळी सिंचना करीता पाणी सोडले. त्यामुळे चौरास सह अनेक गावातील शेतीला मोठ्या प्रमाणात सोेय झाली.गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प असताना त्याचे काम फार संथ गतीने सुरु आहे. याकडे शासनाचा बघण्याचा दृष्टीकोन उदासीनतेचा आहे. प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी यांच्या अनेक समस्या आहेत. उपकालवे, पाटचारी यांचे कामे सुद्धा रखडले आहेत. अपुऱ्या निधीत ही कामे केव्हा पुर्ण होणार व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पाणी केव्हा मिळणार यात शंका निर्माण झाली आहे. या करीता प्रसंगानुरुप जनआंदोलन उभारणे काळाची गरज आज निर्माण झाली आहे.गोसेखुर्द धरणाच्या डाव्या तिरावर जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरु असून याद्वारे २४ मेगावॅटची विद्युत निर्मिती होणार आहे. त्यामुळे पवनी तालुक्यातील विजेची समस्या सुटणार आहे. तालुक्यात निर्माण होणारी विद्युत तालुक्यातच उपयोगात आणावी तसेच ढिवर समाजाचे मासेमारी करीता तलावातील पाणी आटल्यामुळे फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. या तलावात गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडावे व नेरला उपसा सिंचन व मोखाबर्डी उपसा सिंचन योजना पुर्णत्वास आल्यामुळे त्याद्वारे पाणी शेतीला द्यावे. आदी मागण्या संघर्ष समिती तर्फे करण्यात आल्या आहेत. (शहर/तालुका प्रतिनिधी)