शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

परस्परांबद्दल सद्भाव, बंधूभाव जोपासा

By admin | Updated: July 21, 2016 00:23 IST

कुठलाही धर्म हिंसा तथा द्वेष करायची शिकवण देत नाही. प्रेम, सद्भावना ही बंधूभाव जोपासण्याचा खरा आधार आहे.

संजय जोगदंड यांचे प्रतिपादन : कार्यक्रमातून घडले सर्वधर्मसमभावाचे दर्शनभंडारा : कुठलाही धर्म हिंसा तथा द्वेष करायची शिकवण देत नाही. प्रेम, सद्भावना ही बंधूभाव जोपासण्याचा खरा आधार आहे. आनंदाच्या पर्वावर परस्परांबद्दली शंका दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सर्व धर्मियांतील लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. जो मनुष्य आपल्या धर्माचे पालन इमानेइतबारे करतो तो कधीही अन्य धर्माचा तिरस्कार करू शकत नाही, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी केले. येथील मुस्लिम लायब्ररी सभागृहात सोमवारी (१९ जुलै) आयोजित ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वधर्म समभावाचा संदेश जनमाणसात पोहचावा या दृष्टीकोणातून हिंदू, मुस्लिम तथा धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.यावेळी मंचावर समाजसेवी डॉ.कुतूबुद्दीन अहमद, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे, सौदागर मोहल्ला मस्जिदचे मौलाना फराज अहमद, लॉयन्सचे पदाधिकारी जीवनचंद्र निर्वाण, साई मंदिराचे पुजारी पांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक राम चाचेरे, जमियते उलेमा हिंदचे मौलाना मुफ्ती मोहम्मद साजीद आदी उपस्थित होते.संजय एकापुरे म्हणाले, जगात कुठलाही धर्म वाईट कृत्याला समर्थन करीत नाही. वाईट कृत्यातून धर्माला बदनाम करणाऱ्यांना सर्वांनी एकत्रित येवून धडा शिकवायला हवा. जीवनचंद्र निर्वाण म्हणाले, भंडारा शहरात सर्वधर्मीय बांधव एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या उत्सवात हिरीरीने भाग घेतात, ही खरच भंडारेकरांसाठी भूषणावह बाब आहे. मौलाना फराज अहमद म्हणाले, भारत हा विविध संस्कृती जोपसणारा देश आहे. कुणाबद्दल कधीही वाईट बोलू नये व वर्तनही करू नये. राष्ट्रवाद ही संकल्पना सर्वांनी जोपासलीच पाहिजे. डॉ.कुतुबुद्दीन अहमद यांनी सदर कार्यक्रमाची प्रशंसा केली. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची खरी जबाबदारी नागरिकांची आहे आणि भंडारावासीय ती जबाबदारी योग्यरितीने पार पाडीत आहे. राम चाचेरे यांनी हिंदू धर्मातील वसुधैव कुटुंबकम ही भावना विस्तृतपणे अधोरेखीत केली. संघाने मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या माध्यमातून मुस्लिम समाजासोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. पांडे महाराज म्हणाले, हिंदू धर्म मानवतावादी आहे. गीतेमध्ये दिलेले उपदेश संपूर्ण मानवजातीसाठी कल्याणकारी आहेत. दुसऱ्या धर्माचा सदैव आदर व सन्मान करणे अत्यंत आवश्यक आहे. मौलाना साजिद म्हणाले, इस्लाम धर्माची शिकवण सांगते की, ज्या देशात आपण राहतो त्या देशाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. पवित्र कुराण ग्रंथ हा केवळ मुस्लिमांसाठी नव्हे सर्व मानवजातीसाठी आहे. कार्यक्रमाचे आयोजन फुरकान हुसैन, वसीफ खान, सलीम खान, सरफराज खान यांनी केले. संचालन जमाते इस्लामचे इकबाल कैफ यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसीलदार सुशांत बनसोडे, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक चाबुकस्वार, नगरसेवक मकसूद खान, शमीम शेख, हिवराज उके, विकास मदनकर, श्री शीतला माता देवस्थान समितीचे ईश्वरलाल काबरा, धुर्वे, उबेद खान, आबिद सिद्धीकी, मुकेश थानथराटे, कृष्णा उपरीकर, शैलेंद्र श्रीवास्तव, जकारिया खान, प्रदीप ढबाले, मुशीर अहमद, समीर खान, अनवर खान, जुनैद अख्तर, कोहाड, अकील सिद्धीकी, सुज्जा खान, शहजाद पटेल, कलाम खान, अवेश खान, अब्दुल करिम खान, सकलैन कैफ, शाहरूख खान, शाहरूख शेख, अररास खान उपस्थित होते.(प्रतिनिधी)