शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘देवा, यंदा तरी पावशील का!’

By admin | Updated: June 25, 2016 00:32 IST

जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांचे अवलोकन केले असता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

वखरणी, नांगरणीची कामे पूर्ण : बळीराजाच्या मनात धास्ती कायमचविशाल रणदिवे अड्याळजिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांचे अवलोकन केले असता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात शासकीय जाचात फसलेल्या शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट बळावले आहे. दरवर्षी येथील शेतकरी मोठ्या आशेने बियाणे पेरतो मात्र निसर्गचक्रासमोर तो हतबल ठरत आहे. देवा, यंदा तरी पावशील का? असा सवाल बळीराजा विचारीत आहे. ज्याअर्थी हवामान खात्याचा अंदाज चुकू शकतो तर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, यंदा शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज पाहुन मोठ्या आनंदात शेतीची मशागत करायला सुरूवात केली. परंतु सद्यसिथतीची पाहणी केल्यावर बळीराजाच्या मनात धास्ती कायम आहे. निसर्गाचा लहरीपणा, हवामान खात्याचा चुकलेला अंदाज पाहुन यंदा शेती करावी की नाही हा गहन प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा आहे. हे सर्व चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे असतानाही मात्र यावर्षी जमीन कसल्यावर कर्जाचा भार कमी होईल, मुलामुलींच्या लग्नासाठी मदत होईल आदी हेतुनेच येथील शेतकरी जोमाने कामाला लागला आहे. आधी नक्षत्राच्या जोरावर शेतकरी शेतीची कामे पुर्ण करण्यावर भर असायचा . आता हवामान खात्याच्या माहितीवर शेतीची कामे अवलंबून आहेत. आधी बि-बियानांचा पाहिजे तेवढा बाजार नव्हता आताच्या घडीला पेरेल ते उगवेलच याची शास्वती नाही. दरवर्षी कुठे ना कुठे पेरले पण उगवले नसल्याची चर्चा रंगते पण त्या शेतकऱ्यांचे आर्थिक स्थितीत कंबरडे मोडते. आधीच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत शेतकरी कसाबसा जीवन जगत आहे. त्यात दरवर्षी नवनवीन बियानांच्या नावावर कंपन्या शेतकऱ्यांची लुबाडणूक करून पैसे कमवित आहेत. याला कृषी विभागही जबाबदार असणार की नाही हाही एक प्रश्नच आहे. अड्याळमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडणारे असले तरी १२ वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती जे बंद झाली तरी अद्याप सुरू झालेली नाही. ही सत्यपरिस्थिती आहे. अड्याळमध्ये नेत्यांची कमी नाही असेही बाहेरचे म्हणतात. यंदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे पूर्ण करून ठेवली आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी आधीच पण ज्यांच्याकडे सिंचन व्यवस्था नाही ते मात्र आजही एका पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळेच तर यंदा तरी निसर्गराजा बळीराजाला तारणार की मारणार, असा सवाल सर्वांनाच भेडसावत आहे.