शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘देवा, यंदा तरी पावशील का!’

By admin | Updated: June 25, 2016 00:32 IST

जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांचे अवलोकन केले असता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

वखरणी, नांगरणीची कामे पूर्ण : बळीराजाच्या मनात धास्ती कायमचविशाल रणदिवे अड्याळजिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांचे अवलोकन केले असता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात शासकीय जाचात फसलेल्या शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट बळावले आहे. दरवर्षी येथील शेतकरी मोठ्या आशेने बियाणे पेरतो मात्र निसर्गचक्रासमोर तो हतबल ठरत आहे. देवा, यंदा तरी पावशील का? असा सवाल बळीराजा विचारीत आहे. ज्याअर्थी हवामान खात्याचा अंदाज चुकू शकतो तर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, यंदा शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज पाहुन मोठ्या आनंदात शेतीची मशागत करायला सुरूवात केली. परंतु सद्यसिथतीची पाहणी केल्यावर बळीराजाच्या मनात धास्ती कायम आहे. निसर्गाचा लहरीपणा, हवामान खात्याचा चुकलेला अंदाज पाहुन यंदा शेती करावी की नाही हा गहन प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा आहे. हे सर्व चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे असतानाही मात्र यावर्षी जमीन कसल्यावर कर्जाचा भार कमी होईल, मुलामुलींच्या लग्नासाठी मदत होईल आदी हेतुनेच येथील शेतकरी जोमाने कामाला लागला आहे. आधी नक्षत्राच्या जोरावर शेतकरी शेतीची कामे पुर्ण करण्यावर भर असायचा . आता हवामान खात्याच्या माहितीवर शेतीची कामे अवलंबून आहेत. आधी बि-बियानांचा पाहिजे तेवढा बाजार नव्हता आताच्या घडीला पेरेल ते उगवेलच याची शास्वती नाही. दरवर्षी कुठे ना कुठे पेरले पण उगवले नसल्याची चर्चा रंगते पण त्या शेतकऱ्यांचे आर्थिक स्थितीत कंबरडे मोडते. आधीच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत शेतकरी कसाबसा जीवन जगत आहे. त्यात दरवर्षी नवनवीन बियानांच्या नावावर कंपन्या शेतकऱ्यांची लुबाडणूक करून पैसे कमवित आहेत. याला कृषी विभागही जबाबदार असणार की नाही हाही एक प्रश्नच आहे. अड्याळमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडणारे असले तरी १२ वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती जे बंद झाली तरी अद्याप सुरू झालेली नाही. ही सत्यपरिस्थिती आहे. अड्याळमध्ये नेत्यांची कमी नाही असेही बाहेरचे म्हणतात. यंदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे पूर्ण करून ठेवली आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी आधीच पण ज्यांच्याकडे सिंचन व्यवस्था नाही ते मात्र आजही एका पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळेच तर यंदा तरी निसर्गराजा बळीराजाला तारणार की मारणार, असा सवाल सर्वांनाच भेडसावत आहे.