शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

देवा ! पाऊस पडू दे, रोगराई टळू दे...

By admin | Updated: August 1, 2015 00:12 IST

देवा गावचं भलं कर, पाऊस पाड, गावातली रोगराई दूर कर तसेच गावात एकोपा शांती नांदू दे,

आषाढी पौर्णिमा : गावाच्या शांतीसाठी होते मोहगावदेवीत गावपूजन, पुरातन परंपरा आजही कायमराजू बांते  मोहाडीदेवा गावचं भलं कर, पाऊस पाड, गावातली रोगराई दूर कर तसेच गावात एकोपा शांती नांदू दे, अशी आराधना करण्यासाठी गावातील विविध देवांपूढे मोहगाव (देवी) येथील गावकरी एकत्र येवून गावपूजा केली. अशा गावपूजेची संस्कृती जपण्याचे कार्य परंपरेने पूरातन काळापासून सुरु आहे.शक्तीमातेचे मंदिर असलेले मोहगाव (देवी) हे गाव प्रसिध्द आहे. चार हजार एवढ्या लोकसंख्येचं हे गाव आहे. या गावात मागील काही पिढ्यांपासून गावातील व गाव शेजारील असलेल्या मारुती मंदिर, मातामाय, दैतराजा, बलकीदे, नागठाणा, मशासूर, सुरनदी आदींची गावकरी एकत्र येवून गावपूजा दरवर्षी आषाढी पौर्णिमेला करतात. गावात एकोपा नांदावा, शांती राहावी, गावातली रोगराई नष्ट व्हावी, पाऊस पडावा यासाठी विविध मंदिरात जावून पूजा आरती करतात. गाव पूजेचा सन्मान गावातील सरपंचांना असतो. तसेच गावातील ग्रामपंचायतीची सदस्य मंडळी, वृध्दमंडळी गावपूजेसाठी एकत्र येतो. पूरातन काळापासून ते सात-आठ वर्ष सोडली तर दैतराजा, बल्कीदेव, मशासूर व नदीच्या वाहत्या पात्रात बकरे किंवा अन्य पशूंची बळी देण्याची प्रथा मोहगाव देवी गावात सुरु होती. गावपूजेसाठी वर्गणी गोळा केली जात होती. त्या वर्गणीतून पूजा साहित्य व बकऱ्या कोंबड्यांची खरेदी केली जायची. गावपूजा झाल्यावर कधी सामूहिक तर कधी तर भाजी नेवून गाव जेवण करण्याची परंपरा होती. रुढी, परंपरेचं बर-वाईट गावातील प्रतिष्ठित समजू लागले.सात आठ वर्षापुर्वी सरपंच राहिलेले स्वर्गीय कुंडलिक लेंडे यांनी देवाच्या नावावर समुहाने होणारी पशुहत्या बंद केली. ती बंदी आजही कायम आहे. तथापी, आजही काही गावकरी निष्ठेने वैयक्तिकपणे बकरे कोंबडे दैतराजा या देवाला बळी देतात. विशेषत: मोहगाव (देवी) येथून नवख्या मुली लग्न होवून सासरी जातात. त्या मुलींचे पती (गावजवाई) मोहगाव (देवी) येथे आषाढी पौर्णिमेला येवून दैतराजा देवावर नारळ फोडतात. काही जावई कोबंड्याचा बळी देतात.मोहगाव (देवी) या गावाला टोली आहे. त्या टोलीवर मोहगाव देवी वासींयाच श्रध्दास्थान गणेशपूरी आहे. या गणेशपूरीवर पूर्वी यात्रा भराची. दिंडी, भजन, पूजन होत असे. मोहगाव (टोली) वरील प्रभूजी शहारे सांगतात, चाळीस-पंचेचाळीस वर्षापूर्वी गावात रोगराईने थैमान घातले होते. रोगाने सारेच गावकरी त्रस्त झाले होते. काय कराव गावकऱ्यांना समजेना. गावातील प्रमुखांनी नागपूर स्थित असलेले महाराज गणेशाम नंदपूरी यांचेकडे जायचे. त्यांच्याकडून गावात शांतीयज्ञ करायच असं ठरल. ठरल्याप्रमाणे गणेशपूरी वर यज्ञ करण्यात आले. गाव पूर्ववत शांत झाला. गावातील रोगराई पळाली. तेव्हापासून गावात रोगराई आली नाही. गावात एकोपा व शांती आहे. त्यामुळे मोहगाव (टोली)वर असलेल्या गणेशपूरीवर आषाढी पौर्णिमेच्या दिवशी श्रध्देने गावकरी पूजा करतात.आजही पंरपरागत असलेली गावपूजा मोहगाव देवी येथे आषाएी पौर्णिमेला सकाळपासून गावातील व गावच्या सीमेवरील सर्व देवांची सामूहिक पूजा केली जाते. मारुती मंदिरात सरपंच राजेश लेंडे यांनी गावाच्यावतीने पूजा अर्चा केली. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते. पशुहत्या ही प्रथा बंद झाल्याने गावातील जनतेला प्रसाद देण्यासाठी शिरा केला गेला. पावसान दडी मारली आहे. यासाठी मोहगावदेवी वासियांनी वरुणराजाला आर्त हाक दिली. देवा पाऊस पाड, पीक भरघोष येवू दे.