शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीची सुपिकता व भरघोष उत्पन्नाचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरणांतर्गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतीशाळेचे नियोजन केले आहे. यात २५ शेतकऱ्यांची पटसंख्या ठेवण्यात आली आहे. यात प्रती शेतकऱ्याला मोफत बी बियाणे, खत, किडनाशक, पक्षीथांबे, पुरविण्यात येत आहेत. जमीन तयार करण्यापासून ते कापणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन थेट शेतावरच सुरु झाले आहे. एकुण सहा वर्ग निश्चित केले आहेत. प्रथम व द्वितीय वर्ग आटोपले आहेत.

ठळक मुद्देहरभऱ्याची शेतीशाळा : पालांदूरच्या मंडळ कृषी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जमिनीची सुपिकता राखून शेतकऱ्यांना भरघोष उत्पन्न देण्याच्या प्रयत्नांसाठी कृषी विभाग सज्ज झाले आहे. एकच एक पीक घेत असल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे वास्तव स्वीकारीत शेतकऱ्यांना कागदी माहिती पुरविण्यापेक्षा थेट शेतातच शाळा भरवल्या गेली. याचे प्रात्यक्षिक लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १३ गावात अनुभवायला मिळत आहे.महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरणांतर्गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतीशाळेचे नियोजन केले आहे. यात २५ शेतकऱ्यांची पटसंख्या ठेवण्यात आली आहे. यात प्रती शेतकऱ्याला मोफत बी बियाणे, खत, किडनाशक, पक्षीथांबे, पुरविण्यात येत आहेत. जमीन तयार करण्यापासून ते कापणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन थेट शेतावरच सुरु झाले आहे. एकुण सहा वर्ग निश्चित केले आहेत. प्रथम व द्वितीय वर्ग आटोपले आहेत. यात पुरुषांचा व महिलांचा असे दोन वर्ग तयार केले आहेत. शेती शाळेत भूगाव, पळसगाव, घोडेझरी, पालांदूर, ढिवरखेडा, कवडसी, कनेरी, जेवनाळा, गोंडेगाव, पाथरी, नरव्हा, सोमनाळा, कन्हाळगाव असे १३ गावात शेतीशाळा सुरु झाली आहे. शेतशाळेत जमीन तयार करणे, बियाणे निवड, बीज प्रक्रिया, रासायनिक खतांची मात्रा, पिक संरक्षण, मित्रकिडी, शत्रूकिडी, पक्षीथांबे, कामगंध साफळे, फेरोमन ट्रप्स आदी विषयाची वर्ग सुरु झाली आहेत. शेतकºयांना एकदल पिकानंतर द्विदल पिके घेणे व पिकांची फेरपालट करणे व जमिनीचा पोत सुधारणे हा खरा हेतू आहे.शेतीशाळेला मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी सहाय्यक वनिता खंदाडे, गिºहेपुंजे, श्रीकांत सपाटे, भगीरथ सपाटे, कृषी पर्यवेक्षिका एम.एन. खराबे, अशोक जिभकाटे, शेतकरी मित्र भाऊराव कोरे सहभागी आहेत.लाखनी तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादूर्भाव असल्यास घाटेअळीवरती क्विनॉलफॉस १० लिटर पाण्यात २० मिली किंवा इमामेक्टीन बेंजोएट १० लिटर पाण्यामध्ये ३ ते ४ ग्रामच्या प्रमाणात किटकनाशकाची फवारणी करावी. ही फवारणी फुलकळी येणे सुरु झाल्यास १ लिटर फवारणी करावी, असे सांगितले.दिवसेंदिवस रबीमध्ये हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र वाढत आहे. कमी पाण्यात उत्तम पीक हातात येत आहे. हरभºयाला ओले व सुका विकताना दर उत्तम मिळत आहे. त्यामुळे शेतीशाळेत शेतकरी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.-गणपती पांडेगावकर,मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर

टॅग्स :agricultureशेती