शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जमिनीची सुपिकता व भरघोष उत्पन्नाचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरणांतर्गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतीशाळेचे नियोजन केले आहे. यात २५ शेतकऱ्यांची पटसंख्या ठेवण्यात आली आहे. यात प्रती शेतकऱ्याला मोफत बी बियाणे, खत, किडनाशक, पक्षीथांबे, पुरविण्यात येत आहेत. जमीन तयार करण्यापासून ते कापणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन थेट शेतावरच सुरु झाले आहे. एकुण सहा वर्ग निश्चित केले आहेत. प्रथम व द्वितीय वर्ग आटोपले आहेत.

ठळक मुद्देहरभऱ्याची शेतीशाळा : पालांदूरच्या मंडळ कृषी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जमिनीची सुपिकता राखून शेतकऱ्यांना भरघोष उत्पन्न देण्याच्या प्रयत्नांसाठी कृषी विभाग सज्ज झाले आहे. एकच एक पीक घेत असल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे वास्तव स्वीकारीत शेतकऱ्यांना कागदी माहिती पुरविण्यापेक्षा थेट शेतातच शाळा भरवल्या गेली. याचे प्रात्यक्षिक लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १३ गावात अनुभवायला मिळत आहे.महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरणांतर्गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतीशाळेचे नियोजन केले आहे. यात २५ शेतकऱ्यांची पटसंख्या ठेवण्यात आली आहे. यात प्रती शेतकऱ्याला मोफत बी बियाणे, खत, किडनाशक, पक्षीथांबे, पुरविण्यात येत आहेत. जमीन तयार करण्यापासून ते कापणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन थेट शेतावरच सुरु झाले आहे. एकुण सहा वर्ग निश्चित केले आहेत. प्रथम व द्वितीय वर्ग आटोपले आहेत. यात पुरुषांचा व महिलांचा असे दोन वर्ग तयार केले आहेत. शेती शाळेत भूगाव, पळसगाव, घोडेझरी, पालांदूर, ढिवरखेडा, कवडसी, कनेरी, जेवनाळा, गोंडेगाव, पाथरी, नरव्हा, सोमनाळा, कन्हाळगाव असे १३ गावात शेतीशाळा सुरु झाली आहे. शेतशाळेत जमीन तयार करणे, बियाणे निवड, बीज प्रक्रिया, रासायनिक खतांची मात्रा, पिक संरक्षण, मित्रकिडी, शत्रूकिडी, पक्षीथांबे, कामगंध साफळे, फेरोमन ट्रप्स आदी विषयाची वर्ग सुरु झाली आहेत. शेतकºयांना एकदल पिकानंतर द्विदल पिके घेणे व पिकांची फेरपालट करणे व जमिनीचा पोत सुधारणे हा खरा हेतू आहे.शेतीशाळेला मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी सहाय्यक वनिता खंदाडे, गिºहेपुंजे, श्रीकांत सपाटे, भगीरथ सपाटे, कृषी पर्यवेक्षिका एम.एन. खराबे, अशोक जिभकाटे, शेतकरी मित्र भाऊराव कोरे सहभागी आहेत.लाखनी तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादूर्भाव असल्यास घाटेअळीवरती क्विनॉलफॉस १० लिटर पाण्यात २० मिली किंवा इमामेक्टीन बेंजोएट १० लिटर पाण्यामध्ये ३ ते ४ ग्रामच्या प्रमाणात किटकनाशकाची फवारणी करावी. ही फवारणी फुलकळी येणे सुरु झाल्यास १ लिटर फवारणी करावी, असे सांगितले.दिवसेंदिवस रबीमध्ये हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र वाढत आहे. कमी पाण्यात उत्तम पीक हातात येत आहे. हरभºयाला ओले व सुका विकताना दर उत्तम मिळत आहे. त्यामुळे शेतीशाळेत शेतकरी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.-गणपती पांडेगावकर,मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर

टॅग्स :agricultureशेती