भंडारा : स्पर्धेच्या युगात वावरत असताना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. संगणकाच्या माध्यमातून जग जवळ येत आहेत म्हणून राज्यातील युवकांना संगणक क्षेत्रात संधी द्यावे, असे प्रतिपादन महाविर ग्रृप आॅफ इन्स्टीट्युशनचे प्रकल्प राज्य समन्वयक सुरजकुमार ठाकुर यांनी केले. महाविर ग्रृप आॅफ इन्स्टीट्युशन नई दिल्लीच्या वतीने आयोजित नवीन वर्षाच्या संकल्प कार्यक्रम येथे घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रा. वामनराव तुरिले होते. प्रमुख मार्गदर्शक सुरज कुमार ठाकुर, समीर नवाज, महेश डोहले, सचिव विलास केजरकर, अविनाश बाभरे, प्रितमलाल कुंभारे, प्रविण कावळे, अरशद पठाण, हेमंत दखणे, गणेश वैशणव उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संगणकाचे विविध महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. समीर नवाज व उपस्थितांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, सर्व जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षण केंद्रातील संचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक समीर नवाज यांनी केले. आभार महेश डोहले यांनी मानले. कार्यक्रमाकरिता हितेश धांडे, राहुल राऊत, सचिन मेश्राम, पराग चौधरी, महेश नंदनवार, हेमंत धांडे, परमेश्वर फुंडे, उमेश ठेंगरी, महेश तांडेकर, अरविंद कावळे, तुलकर, गायकवाड, पालटकर, पटले, प्रणिता पाचखेडे, वसीम खान, आवेश खान, मेघा क्षिरसागर यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
युवकांना संगणकात संधी द्यावी
By admin | Updated: January 12, 2015 22:46 IST