शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आधी पाणसारा द्या, मग उन्हाळी पीक घ्या; भंडारा जिल्ह्यात इटियाडोह पाटबंधारे विभागाचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:52 IST

Bhandara news agriculture शेतक-यांकडे सुमारे दोन कोटी रु.चा पाणसारा थकित असल्याने सदर पाणसा-याची रक्कम वसुलीसाठी पाणसारा द्या उन्हाळी घ्या असा फतवा बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत काढण्यात आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देइटियाडोह धरणांतर्गत दोन कोटीचा पानसारा थकित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: इटियाडोह धरण लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांतर्गत शेतक-यांकडे सुमारे दोन कोटी रु.चा पाणसारा थकित असल्याने सदर पाणसा-याची रक्कम वसुलीसाठी पाणसारा द्या उन्हाळी घ्या असा फतवा बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत काढण्यात आल्याची माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार, बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत लाखांदूर तालुक्यातील जवळपास साडेचार हजार हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात येते.सदर लाभक्षेत्रांतर्गत तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी शेतक-यांना शेतिपिकासाठी उपलब्ध करता यावे म्हणून या विभागांतर्गत तालुक्यात जवळपास 14 पाणी वापर संस्था कार्यरत असल्याची माहिती आहे.या संस्थेन्तर्गत लाभक्षेत्रातील शेतक-यांकडून नियमित पाणसारा वसुलीचे अधिकार सबंधित संस्थेला देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाउस झाल्याने धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने यंदा लाखांदूर तालुक्यात या धरणांतर्गत उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेता येण्याची शक्यता आहे.मात्र तालुक्यातील इटियाडोह लाभक्षेत्रात येना-या काही पाणी वापर संस्थांतर्गत पाणसा-याचा भरणा न करण्यात आल्याने या विभागांतर्गत शेतक-यांना पाणसारा भरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.सध्या या आवाहनानुसार तालुक्यात सुमारे दोन कोटी रु.चा पाणसारा थकित असुन थकितदार संस्था व शेतक-यांनी येत्या 15 डिसेंबरपर्यंत पाणसारा भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापि यंदाच्या खरिपात लागवडीखालील पिकांवर मोठ्या प्रमाणात किडरोग व तुडतुड्याचा प्रादूर्भाव होतांनाच परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होउन शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची बोंब आहे. यासबंध परिस्थितीत शेतक-यांना पुरेशा प्रमाणात पाणसा-याचा भरणा करणे अशक्यप्राय ठरणार असल्याचे देखील बोलल्या जात आहे.दरम्यान, यासबंधाने अधिक माहिती घेतली असता तालुक्यातील जवळपास अकरा पाणी वापर संस्थांतर्गत पुरेशा प्रमाणात पाणसा-याचा भरणा केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र येत्या उन्हाळी हंगामात या धरणाच्या लाभक्षेत्रांतर्गत उन्हाळी धान पिकाची लागवड व उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांनी पाणसारा भरावा असे आवाहन केले आहे.

 

 

टॅग्स :agricultureशेती