शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:08 IST

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी समाजातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून दहा जणांना ठार मारणाऱ्या आरोपींंना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा भंडारा व नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स, स्टुडंट फेडरेशन तालुका शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रकरण उत्तर प्रदेशातील सोनभद्रचे, आदिवासी संघटनांनी पाठविले राष्ट्रपतींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी समाजातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून दहा जणांना ठार मारणाऱ्या आरोपींंना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा भंडारा व नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स, स्टुडंट फेडरेशन तालुका शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनांनुसार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादावरून आदिवासी बांधवांवर गोळीबार करण्यात आला. यात दहा आदिवासींना जीव गमवावा लागला. तर २८ जण जखमी झालेले असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. घडलेले हत्याकांड लोकशाही प्रदान देशात लाजीरवाणी बाब आहे. कोणत्याह जटील प्रकरणाचा निकाल लावण्याकरिता विविध न्यायालयाचा अवलंब करण्यात येतो. परंतु देशामध्ये नीती मार्गाचा अवलंब न करता अनितीने आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न काही व्यभीचारी लोक करीत आहेत. अशा गुंडांना काही वरिष्ठ मंडळी पाठीशी घालून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी राज्य व केंद्र शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन कुंभरे, सचिव डॉ.प्रमोद वरकडे तर नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स स्टूडंटस् फेडरेशनचे लाखनी तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे, शंकर उईके, कैलाश परतेकी, अमीत धंडारे, अमरसिंग उईके, शिवशंकर धुर्वे, धीरज उईके, प्रशांत सलामे, राजू सलामे, राकेश उईके, रवी धुर्वे, देवानंद धुर्वे, तेजराम कोकोडे, योगराज जुगनायके यांचा समावेश आहे.जलदगती न्यायालयात सुनावणी कराउत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे ज्या आदिवासींच्या जमिनीवर ताबा मिळवायचा आहे त्यांच्यावर आक्रमण करून त्यांची हत्या करण्यासाठी बाहेरगावावरून ३२ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गुंडांना आणण्यात आले. त्यांनी संपूर्ण गावाला वेढा घालून तेथील आदिवासींवर अंधाधुंद गोळीबार केला. आदिवासींवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असतानाही आरोपींना कठोर शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे आदिवासी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. सोनभद्र येथील आरोपींवर जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून अविलंब त्यांना फाशीवर चढविण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Sonbhadra Shootoutसोनभद्र हत्याकांड