शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘त्या’ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:08 IST

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी समाजातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून दहा जणांना ठार मारणाऱ्या आरोपींंना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा भंडारा व नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स, स्टुडंट फेडरेशन तालुका शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रकरण उत्तर प्रदेशातील सोनभद्रचे, आदिवासी संघटनांनी पाठविले राष्ट्रपतींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी समाजातील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून दहा जणांना ठार मारणाऱ्या आरोपींंना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा भंडारा व नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स, स्टुडंट फेडरेशन तालुका शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनांनुसार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादावरून आदिवासी बांधवांवर गोळीबार करण्यात आला. यात दहा आदिवासींना जीव गमवावा लागला. तर २८ जण जखमी झालेले असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. घडलेले हत्याकांड लोकशाही प्रदान देशात लाजीरवाणी बाब आहे. कोणत्याह जटील प्रकरणाचा निकाल लावण्याकरिता विविध न्यायालयाचा अवलंब करण्यात येतो. परंतु देशामध्ये नीती मार्गाचा अवलंब न करता अनितीने आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न काही व्यभीचारी लोक करीत आहेत. अशा गुंडांना काही वरिष्ठ मंडळी पाठीशी घालून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी राज्य व केंद्र शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन कुंभरे, सचिव डॉ.प्रमोद वरकडे तर नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन्स स्टूडंटस् फेडरेशनचे लाखनी तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे, शंकर उईके, कैलाश परतेकी, अमीत धंडारे, अमरसिंग उईके, शिवशंकर धुर्वे, धीरज उईके, प्रशांत सलामे, राजू सलामे, राकेश उईके, रवी धुर्वे, देवानंद धुर्वे, तेजराम कोकोडे, योगराज जुगनायके यांचा समावेश आहे.जलदगती न्यायालयात सुनावणी कराउत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे ज्या आदिवासींच्या जमिनीवर ताबा मिळवायचा आहे त्यांच्यावर आक्रमण करून त्यांची हत्या करण्यासाठी बाहेरगावावरून ३२ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गुंडांना आणण्यात आले. त्यांनी संपूर्ण गावाला वेढा घालून तेथील आदिवासींवर अंधाधुंद गोळीबार केला. आदिवासींवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असतानाही आरोपींना कठोर शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे आदिवासी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. सोनभद्र येथील आरोपींवर जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून अविलंब त्यांना फाशीवर चढविण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Sonbhadra Shootoutसोनभद्र हत्याकांड