शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

शिक्षक संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश द्या

By admin | Updated: May 26, 2016 01:40 IST

शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये भंडारा जिल्हयात कोणत्याही विद्यालयाच्या अनुदानित तुकडीवरील (संख्येनुसार) शिक्षक अतिरिक्त होणार नाही

निर्देशाची गरज : दाखल्यासाठी तारीख पे तारीखसानगडी : शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये भंडारा जिल्हयात कोणत्याही विद्यालयाच्या अनुदानित तुकडीवरील (संख्येनुसार) शिक्षक अतिरिक्त होणार नाही या दृष्टीने मंजुर शिक्षकाच्या अधिन राहून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना देण्याची गरज निर्माण झाली आहे.सत्र २०१६-१७ मध्ये प्रवेश देतांना मंजूर शिक्षक क्षमतेच्या अधिन राहून प्रचलित आरक्षणाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. परवानगी न घेता ज्यादा प्रवेश दिल्यास दुसऱ्या शाळेतील मंजुर अनुदानित शिक्षकांवर परिणाम होणार नाही अशी खात्री करावी. शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना करावी. पालकांना माध्यमिक तथा उच्च माध्यमिक मान्यता वर्ग व प्रवेश क्षमता कळावी, त्याकरिता दर्शनी भागावर वेळापत्रक लावण्यात यावे. जिल्हा परिषद व खाजगी शाळांचा सुळसुळाट झाल्याने शाळेचे अस्तीत्व टिकवून ठेवण्यासाठी उन्हातही शिक्षक विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे शासनाच्या नविन धोरणानुसार पहिली ते पाचवी प्राथमिक शाळा, सहावी ते आठवी उच्च प्राथमिक शाळा, नववी ने दहावी माध्यमिक व अकरावी ते बारावी उच्च माध्यमिक असा शैक्षणिकस्तर आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळांना पाचवीचे व आठवीचे वर्ग जोडण्याचे फर्मान शासनाने काढले. त्यानुसार काही शाळेत वर्ग जोडण्याची कार्यवाही सुरु आहे. शासनाने ज्या शाळेत पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग सुरु आहेत अशा शाळेतील शिक्षकांचा काय होईल याचा विचार केला नाही. जिल्ह्यात शेकडो शिक्षक अतिरिक्त होण्याच्या मार्गावर आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे इतर शाळेत समायोजन करणे आवश्यक आहे. शाळा टिकविण्यासाठी शिक्षक हवेतच विरणारी आश्वासने देत आहेत. लोकप्रतिनिधी, समाजसेवकांना हाताशी धरुन दुसऱ्या शाळेपेद्या माझी शाळा कशी चांगली आहे असे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही शाळेतील मुख्याध्यापक नोकरी लावून देण्याचे आमिष देत आहेत. शाळेशाळेत वैर निर्माण झाले आहे.शाळा सोडण्याचा दाखल्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक हितसंबंध असलेल्या शिक्षकांना निश्चित तारीख देतात व हितसंबंध नसलेल्या शाळेतील शिक्षकांना तारीख पे तारीख देतात. एवढा आटापिटा कशासाठी? फक्त विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी गुणात्मक विकास वाढविण्यासाठी नाही. उन्हाच्या तडारण्याने जिवाची लाही लाही होत आहे. जीवनशैलीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हापरिषद तसेच खासगी शाळेतील मुख्याध्यापकांनी चिंतन करुन मंजूर शिक्षक क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना मान घुडीस मिळणार यात तिळमात्र शंका नाही. शिक्षणाधिकारी यांनी सुध्दा विद्यार्थी प्रवेशाबाबत कठोर पावले उचलावी, अशी शिक्षक वतुर्ळात चर्चा आहे. (वार्ताहर)