शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

आधी कायमस्वरूपी शिक्षक द्या, नंतर शाळा सुरू करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

करडी ही परिसरातील सर्वाधिक लोकसंख्येची व्यापारी पेठ आहे. करडीत जिल्हा परिषदेची १ ते ४ व ५ ते १२ पर्यंतची ...

करडी ही परिसरातील सर्वाधिक लोकसंख्येची व्यापारी पेठ आहे. करडीत जिल्हा परिषदेची १ ते ४ व ५ ते १२ पर्यंतची शाळा असून कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान विषयाचे विद्यादान दिले जाते. परंतु चार वर्षांपासून इथे शिक्षकाचा तुटवडा आहे. ५ ते १२ पर्यंत एकूण १२ पदसंख्या मंजूर असताना केवळ ४ शिक्षक कार्यरत आहेत. कनिष्ठ महाविद्यालय तासिका शिक्षकांचे भरवशावर चालविणे असल्याने नाईलाजाने का होईना विद्यार्थी व पालकांचा कल खाजगी शाळांकडे वळू लागला आहे. शाळेचे सत्र सुरू झाले की, दरवर्षी शिक्षक द्या, अशी मागणी केली जाते. पण, हो पाहू, असे बोलून शिक्षण विभाग डोळेझाक करून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरत आहे.

गेल्या सत्रापासून कोरोना महामारीने शिक्षणाची वाट लावली. अशातच आता राज्य शासनाने गाव पातळीवर पालक व शाळेच्या समन्वयाने शाळा सुरू करता येईल, असा आदेश दिल्याने परिसरातील अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. नुकतीच १५ जुलै रोजी करडी येथे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शाळा व्यवस्थापन समितीची पालकांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. त्यावेळी शिक्षकांचा तुटवडा हा प्रश्न पुढे आला. तेव्हा सर्वानुमते आधी शिक्षक द्या, नंतरच शाळा सुरू करा, असा ठराव पारित करण्यात आला.

बॉक्स

करडी परिसरात शिक्षणाचा बट्ट्याबोळ

करडी परिसरातील सर्वच शाळांत शिक्षकांची कमतरता असल्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. मागील ५-६ वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. वर्षाला अनेक शिक्षक सेवानिवृत होतात. विद्यार्थी पटसंख्या वाढत आहे. गेल्या चार वर्षापासून करडी येथील शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. महाविद्यालयीन वर्ग तासिका शिक्षकांकडून सुरू आहेत. तेव्हा मागणी रास्त असली तरी शिक्षक मिळणार काय, हा यक्षप्रश्न आहे.

कायमस्वरूपी शिक्षक द्या -शाळा समिती

करडी शिक्षणाचे माहेरघर आहे. परिसरातील प्रत्येक गावातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. परंतु करडी जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रभारी आहे. १० शिक्षकांचा तुटवडा आहे. तेव्हा प्रशासनाने विद्यार्थी व पालकांचे हित लक्षात घेता कायम स्वरूपी शिक्षकांची पूर्तता करावी, अशी मागणी शाळा कमिटीचे अध्यक्ष मंगेश साठवणे, मोहन किरणापुर, सूर्यभान बुरडे, राजू शहारे, नथू फाय, बासुदेव डोहळे, मोरेश्वर जगनीत आदींनी केली आहे.