शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

By admin | Updated: April 16, 2017 00:14 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही.

उन्हातही शेतकरी सहभागी : आझाद शेतकरी संघटनेचा पवनीत बैलबंडी मोर्चापवनी : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी कर्जमाफी हाच पर्याय आहे, असे प्रतिपादन शेतकरी मोर्चाचे आयोजक आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केले.आझाद शेतकरी संघटनेच्या वतीने सिंदपुरी टी-पॉर्इंटवरून शेतकरी मोर्चा काढण्यात आलेला होता. बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकी व जीपगाड्यासह शेतकरी मोर्चात सहभागी झाले. पवनी नगरातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहचला. मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. सभेत पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लोमेश वैद्य, टिंकू तिघरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त करण्यात आले. केंद्रात व राज्यात असलेल्या भाजपा सरकारने उत्तरप्रदेशात कर्जमाफीची घोषणा करून कर्जमाफी दिली. महाराष्ट्रात ती का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला. आझाद शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार एस.के. वासनिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर गीते उपस्थित होते.शासनाने शेतकऱ्यांचे सातबारा वरील कर्ज माफ करावे, गोसे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, खते व बि बियाणे ५० टक्के सवलतीवर उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांचे मुलांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करावी, पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा, डाव्या कालव्याच्या लघु वितरिकांचे काम करून चौरास वाळवंट होण्यापासून थांबवावे, नेरला उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे, खापरी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना पेंशन योजना सुरु करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)