शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

२४ तास थ्री फेस वीज द्या

By admin | Updated: January 3, 2016 01:08 IST

परिसर चुलबंद खोऱ्यात येत असल्याने भूजलसाठा अपेक्षित मिळत आहे. विहिर, बोअरवेलला पाणी आहे ....

शेतकऱ्यांची मागणी : सहायक अभियंता पंकज आखाडे यांना निवेदनपालांदूर : परिसर चुलबंद खोऱ्यात येत असल्याने भूजलसाठा अपेक्षित मिळत आहे. विहिर, बोअरवेलला पाणी आहे पण नियमित वीज मिळत नसल्याने पीक घेताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने २४ तास थ्री फेज वीज पुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबबात सहायक अभियंता पंकज आखाडे यांना शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने निवेदन दिले. सध्या मागणी नसल्यामुळे २४ तास थ्री फेज वीज अनपेक्षितपणे मिळत आहे. ज्यादिवशी ऊन वाढून पिकाला पाण्याची गरज पडेल तेव्हा महावितरण केवळ ८ ते १० तासच वीज पुरविते. यामुळे पिकाला पाणी मिळायला अडचण निर्माण होते. पाणी आहे, पण वीज नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची होते. त्यामुळे महावितरण ने नियमितता दाखवत आजच्या धर्तीवर पुढेही २४ तास वीज द्यावी अशा मागणीचे निवेदन घोडेझरीचे पोलीस पाटील सुनील लुटे, पाथरीचे उपसरपंच जितेंद्र उटाणे यांनी निवेदनातून आपल्या व्यथा अभियंता आखाडे यांच्या समोर मांडल्या.सध्या मिळत असलेल्या वीजेच्या भरोशावर धानपीक वाढविले आणि पुढे जर वीज कमी केली तर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे उद्याचे नुकसान होऊ नये याकरिता महावितरण कंपनीने विचार करता वीज उत्पादन बऱ्यापैकी असल्याने आणि शहरातील काही उद्योग बंद पडल्याने वीज वापर कमी होत असल्याचे बोलले जाते. बंद उद्योगधंद्याची वीज ग्रामीण भागात पुरवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. पालांदूर महावितरण कंपनी वीज चोरीचे व तुटीचे प्रमाण कमी होऊन शून्य पोलवर वीज देण्याचा सपाटा यामुळे वीज ग्राहकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नियमित २४ तास विजेची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.शेतीपंपाच्या मीटरचे रिडींग न घेता वारेमाप वीज बील दिल्या जाते. महावितरणने पारदर्शकता आणून जळालेला विीेचेच बिल शेतकऱ्यांना देण्याची मागणीसुध्दा करण्यात आली आहे. २०० फुटापर्यंत केबलवर वीज कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे कनेक्शन देण्यास अंतराचे कारण पुढे करीत नाकारले जात आहे. लोकप्रतिनिधींनी संबंधित जिल्हा वीज अधिकाऱ्यांना जाब विचारुन ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)