शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

२४ तास थ्री फेस वीज द्या

By admin | Updated: January 3, 2016 01:08 IST

परिसर चुलबंद खोऱ्यात येत असल्याने भूजलसाठा अपेक्षित मिळत आहे. विहिर, बोअरवेलला पाणी आहे ....

शेतकऱ्यांची मागणी : सहायक अभियंता पंकज आखाडे यांना निवेदनपालांदूर : परिसर चुलबंद खोऱ्यात येत असल्याने भूजलसाठा अपेक्षित मिळत आहे. विहिर, बोअरवेलला पाणी आहे पण नियमित वीज मिळत नसल्याने पीक घेताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने २४ तास थ्री फेज वीज पुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबबात सहायक अभियंता पंकज आखाडे यांना शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने निवेदन दिले. सध्या मागणी नसल्यामुळे २४ तास थ्री फेज वीज अनपेक्षितपणे मिळत आहे. ज्यादिवशी ऊन वाढून पिकाला पाण्याची गरज पडेल तेव्हा महावितरण केवळ ८ ते १० तासच वीज पुरविते. यामुळे पिकाला पाणी मिळायला अडचण निर्माण होते. पाणी आहे, पण वीज नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची होते. त्यामुळे महावितरण ने नियमितता दाखवत आजच्या धर्तीवर पुढेही २४ तास वीज द्यावी अशा मागणीचे निवेदन घोडेझरीचे पोलीस पाटील सुनील लुटे, पाथरीचे उपसरपंच जितेंद्र उटाणे यांनी निवेदनातून आपल्या व्यथा अभियंता आखाडे यांच्या समोर मांडल्या.सध्या मिळत असलेल्या वीजेच्या भरोशावर धानपीक वाढविले आणि पुढे जर वीज कमी केली तर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे उद्याचे नुकसान होऊ नये याकरिता महावितरण कंपनीने विचार करता वीज उत्पादन बऱ्यापैकी असल्याने आणि शहरातील काही उद्योग बंद पडल्याने वीज वापर कमी होत असल्याचे बोलले जाते. बंद उद्योगधंद्याची वीज ग्रामीण भागात पुरवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. पालांदूर महावितरण कंपनी वीज चोरीचे व तुटीचे प्रमाण कमी होऊन शून्य पोलवर वीज देण्याचा सपाटा यामुळे वीज ग्राहकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नियमित २४ तास विजेची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.शेतीपंपाच्या मीटरचे रिडींग न घेता वारेमाप वीज बील दिल्या जाते. महावितरणने पारदर्शकता आणून जळालेला विीेचेच बिल शेतकऱ्यांना देण्याची मागणीसुध्दा करण्यात आली आहे. २०० फुटापर्यंत केबलवर वीज कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे कनेक्शन देण्यास अंतराचे कारण पुढे करीत नाकारले जात आहे. लोकप्रतिनिधींनी संबंधित जिल्हा वीज अधिकाऱ्यांना जाब विचारुन ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)