शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra HSC result 2018 : मुलांपेक्षा मुलीच सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:45 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल बुधवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.७३ टक्के इतका लागला असून यावर्षीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ही परीक्षा एकूण १८,५४४ विद्यार्थ्यांनी दिली असून १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ठळक मुद्देबारावीचा निकाल ८८.३५ टक्के : नानाजी जोशी शाळेचा रितेश हर्षे जिल्ह्यात प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल बुधवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.७३ टक्के इतका लागला असून यावर्षीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ही परीक्षा एकूण १८,५४४ विद्यार्थ्यांनी दिली असून १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.भंडारा जिल्ह्यातून शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयाचा विद्यार्थी रितेश हर्षे हा पहिला आला. त्याला ९५.३८ टक्के गुण मिळाले. भंडारा येथील लाल बहाद्दूर शाळेची विद्यार्थिनी खुशबु उमाकांत साठवणे ९४.६२ टक्के, नानाजी जोशी शाळेचा विद्यार्थी अंकुर वासनिक ९४.४६ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले. बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागात तिसऱ्या स्थानावर असून यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून मुलांची टक्केवारी ८५.७२ इतकरी तर मुलींची टक्केवारी ९१.७६ इतकी आहे.१५४ कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या बारावीच्या परीक्षेत १८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १६ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १६ हजार ४५५ विद्यार्थी ऊतीर्ण झाले. विद्यार्थ्यांमध्ये ७ हजार ९६० मुले तर ८ हजार ४९५ मुलींचा समावेश आहे. यात ६८३ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त ठरले. ५ हजार २५१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ९७१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ५५० विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी१६ हजार ४५५ ऊतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये भंडारा तालुक्यातून ४,६०७ पैकी ४,२६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून १,४९८ पैकी १,३५७ विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून २,४५९ पैकी २,१९१ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून २,३२० पैकी १,९११ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून २,३१४ पैकी २,०६३ विद्यार्थी, साकोली तालुक्यातून २,३२० पैकी २,१२५ विद्यार्थी, तुमसर तालुक्यातून ३,०२६ पैकी २,२४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.शाखानिहाय निकालजिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९६.६२ टक्के, कला शाखेचा निकाल ८२.१८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९३.८६ टक्के तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल ७५.३६ टक्के लागला आहे. शाखानिहाय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेच्या ७,८७४ विद्यार्थ्यांमध्ये ४३२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, २,७६६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४,२७२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १३८ विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या ९,१३१ विद्यार्थ्यांमध्ये १४० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १,९३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ५,०४४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ३८५ विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या ९९३ विद्यार्थ्यांमध्ये १०२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ३९३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४१३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २४ विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी शाखेच्या ५५२ विद्यार्थ्यांमध्ये ९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २४२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ३ विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.२६ शाळेचा निकाल लागला शंभर टक्केजिल्ह्यातील २६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात जे.एम.पटेल कॉलेज भंडारा, नुतन कन्या शाळा, नानाजी जोशी शाळा शहापूर, शंकरराव काळे शाळा कारधा, इंदिरा गांधी शाळा मोहदुरा, विकास ज्युनियर कॉलेज खरबीनाका, पाडंव सायन्स अकादमी ज्युनिअर कॉलेज भिलेवाडा, सन्नीज स्प्रिंग डेल शाळा भंडारा, सिद्धार्थ ज्युनियर कॉलेज लाखांदूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्युनियर कॉलेज लाखांदूर, जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज पिंपळगाव, जिल्हा परिषद पोहरा, राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळा मुरमाडी, माडर्न ज्युनियर कॉलेज सातोना, कला वाणिज्य महाविद्यालय करडी, भीमाताई कॉन्व्हेंट मोहाडी, एमपीएल ज्युनिअर कॉलेज पवनी, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज कोंढा, प्रकाश ज्युनिअर कॉलेज अड्याळ, जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज सानगडी, रामजी कापगते ज्युनिअर कॉलेज जांभळीसडक, निर्धनराव पाटील वाघाये ज्युनिअर कॉलेज वडेगाव खांबा, एस.एन. मोर कॉलेज तुमसर, जनता ज्युनिअर कॉलेज तुमसर, महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज सिहोरा, मातोश्री ज्युनिअर कॉलेज तुमसर या शाळांचा समावेश आहे.निकालात भंडारा तालुका अव्वलभंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.७३ टक्के लागला असून निकालात सातही तालुक्यातून भंडारा तालुका आघाडीवर आहे. मोहाडी तालुक्याचा निकाल पिछाडीवर आहे. यात भंडारा तालुका ९२.६४ टक्के, साकोली तालुका ९१.५९ टक्के, लाखांदूर तालुका ९०.५९ टक्के, पवनी तालुका ८९.१५ टक्के, लाखनी तालुका ८९.१० टक्के, तुमसर तालुका ८३.९४ टक्के, मोहाडी तालुका ८२.३७ टक्के लागला आहे.यावर्षीही मुलींनी मारली बाजीयावर्षी बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. ९,२९२ मुले आणि ९,२६१ मुली असे १८,५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यानंतर ९,२८६ मुले आणि ९,२५८ मुली असे १८,५४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७,९६० मुले आणि ८,४९५ मुली उत्तीर्ण झाले. यात मुलांची टक्केवारी ८५.७२ तर मुलींची टक्केवारी ९१.७६ इतकी आहे. मागील पाच वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८