शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वनसंपदेवर तस्करांची ‘कुऱ्हाड’

By admin | Updated: March 21, 2016 00:28 IST

महाराष्ट्राच्या एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक वनक्षेत्र पूर्व विदर्भात आहे.

आज जागतिक वन दिन : वृक्षतोडीचा पर्यावरणावर परिणामदेवानंद नंदेश्वर भंडारामहाराष्ट्राच्या एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक वनक्षेत्र पूर्व विदर्भात आहे. या जंगलात अनेक मौल्यवान वृक्ष व प्राणी असल्यामुळे तस्करांची नजर येथील जंगलावर नेहमीच असते. काही वर्षांपासून वनसंपदेवर अमानुष कुऱ्हाड चालविल्यामुळे निसर्गाचे चक्र उलटे फिरत आहे. त्यामुळे ३३ टक्के वनक्षेत्र कायम राखणे वन विभागाला मोठे आव्हान ठरत आहे. वनांचा ऱ्हास होण्यामागे कुचकामी प्रशासकीय यंत्रणा जेवढी कारणीभूत आहे तेवढीच माणसांची स्वार्थी प्रवृत्तीही कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे. भंडारा वनविभागाच्या कार्यक्षेत्रात भंडारा, लाखनी, पवनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी व तुमसर हे सात तालुके आहेत. भंडारा वनविभागाचे १० वनपरिक्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. भंडारा, अड्याळ, पवनी, साकोली, तुमसर, जांब (कांद्री), लेंडेझरी, नाकाडोंगरी आणि लाखांदूर या वनक्षेत्राचा समावेश आहे. या विभागात ३८ परिमंडळ असून नियत क्षेत्रांची संख्या १५६ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण ३,७१६.६५ भौगोलिक क्षेत्रापैकी १२०३.५५६ चौ.कि.मी. वनाचे क्षेत्र आहे. वनविभागाकडे ८८१.८५४ चौ.कि.मी., महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे ९१.४३६ चौ.कि.मी., वन्यजीव विभागाकडे २२५.४८२ चौ.कि.मी. तर मोहघाटा रिसर्च सेंटरकडे ४.७८४ चौ.कि.मी. वन क्षेत्र आहे. ५००४७.११९ कि़मी. मध्ये राखीव, २७७.७६७ कि़मी. मध्ये संरक्षीत वन, ९९.६५४ कि़मी. मध्ये झुडपी जंगल तर ४.५१७ वर्ग कि़मी. मध्ये अवर्गीकृत क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यत तसेच परिसरात घनदाट जंगल व वन्यप्राण्यांच्या अधिवास आहे. या जंगलात वाघासारख्या उमद्या प्राण्यासह बिबट, हरिण, अस्वल आदी वन्यप्राणी आहेत. तसेच साग व अन्य प्रजातींची मौल्यवाण झाडेही मोठ्या प्रमाणात आहेत. हीच संधी हेरून वन तस्करांनी येथील जंगलांना ‘टारगेट’ केले आहे. वन विभागातर्फे वृक्ष कत्तलीच्या आकडेवारीची नोंद केली जाते. त्यानंतरही वृक्षतोड सतत सुरूच आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनांची भूमिका महत्वाची आहे. परंतु, ‘ओपन प्रॉपर्टी’ असलेल्या वनसंपदेवर कुणीही आक्रमण करीत असल्याने ही संपदा आता हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विविध कारणांमुळे वृक्षांवर कुऱ्हाड चालत असल्याने वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. सजीव सृष्टी ‘ग्लोबल वार्मिंग’च्या संकटात अडकली आहे. निसर्गचक्र बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम सजीवांवर होत आहे. ऋतुंमध्ये होणारा बदल, गारपीट, अतिवृष्टी, वातावरणातील बदल हा त्याचाच परिणाम आहे. माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीने जंगलाचे होत्याचे नव्हते केले. त्याच्या या प्रवृत्तीपुढे वन विभागाच्या यंत्रणेचे प्रयत्नही अपयशी ठरले आहे. वन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बळावर जंगलाचे संरक्षण केले जात आहे. असे असले तरी वनांचे संरक्षण करणारा वन विभाग शहरात जास्त व जंगलात कमी वास्तव्य करीत असल्यामुळे वन तस्करांचे मनसुबे सातत्याने वाढत आहे. यासाठी कठोर उपाययोजना करुन वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज आहे.