शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जनरल तिकिटांची विक्री बंदच; रेल्वेत सर्वसामान्यांना ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST

रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतच आहे. परिणामी आरक्षित डब्यातील गर्दी वाढली असून आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना फुकट्या प्रवाशांचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असताना रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असतानासुध्दा रेल्वे अद्यापही जनरलचे डबे जोडले नसून जनरल तिकीट विक्रीसुद्धा सुरू केली नाही.

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा जोर कमी होताच रेल्वे विभागाने पंधरा दिवसांपूर्वी नियमित रेल्वे गाड्यांना दिलेला विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी एक्स्प्रेस गाड्यामध्ये तिकीट आरक्षित केल्याशिवाय प्रवास करता येत नाही. तर जनरल तिकिटांची विक्री बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतच आहे. परिणामी आरक्षित डब्यातील गर्दी वाढली असून आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना फुकट्या प्रवाशांचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असताना रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असतानासुध्दा रेल्वे अद्यापही जनरलचे डबे जोडले नसून जनरल तिकीट विक्रीसुद्धा सुरू केली नाही. त्यामुळे जनरलचे डबे केव्हा जोडणार असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. 

सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस - गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस- गोंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस- अजमेर -पुरी एक्स्प्रेस- हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस- समता एक्स्प्रेस- हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस - गोंदिया-झारसुकडा एक्सप्रेस

आरक्षित तिकीट असेल तरच प्रवास - रेल्वे विभागाने पंधरा दिवसांपूर्वी नियमित गाड्यांना दिलेला विशेष गाड्यांचा दर्जा काढला. मात्र या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडले नाहीत. त्यामुळे ज्या प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले आहे त्याच प्रवाशांना प्रवास करता येत आहे. सर्वसामान्य प्रवाशांचे हाल अद्यापही कायम असून त्यांना अतिरिक्त तिकिटाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

आरक्षित डब्यात वाढले फुकटे प्रवासी- नियमित गाड्यांना अद्यापही जनरल डबे जोडलेले नाही. त्यामुळे अनेक फुकटे प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करीत आहे. त्यामुळे याचा त्रास तिकीट आरक्षित करून जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.- रेल्वे विभागाने सुद्धा या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसूृल केला आहे. यातून रेल्वेचे उत्पन्न वाढले असले तरी प्रवाशांचा त्रास मात्र वाढला आहे.  ही समस्या दूर करावी.

 प्रवासी म्हणतात..

कोरोनाच्या नावावर मागील दीड वर्ष नियमित गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देऊन एकप्रकारे प्रवाशांची लूट केली. आता विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी जनरल डबे न जोडल्याने अतिरिक्त तिकिटाचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. -हर्षल लाडे, प्रवासी

रेल्वेने अद्यापही एमएसटीची सुविधा सुरू केली नाही तर नियमित गाड्यांचे तिकीट दर अद्यापही कमी केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वेने नियमित गाड्यांना जनरलचे डबे त्वरित जोडावे.- श्रवण राऊत, प्रवासी

 

टॅग्स :railwayरेल्वे