शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सामान्य रूग्णालयातील रूग्णसेवा ढासळली

By admin | Updated: April 29, 2015 00:33 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयाला जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाते.

भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयाला जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाते. मोफत उपचार होत असल्यामुळे सर्वसामान्य गरीब नागरिक येथे उपचारासाठी आशेने दाखल होतात. परंतु येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असुविधेने कळस गाठला असून औषधोपचाराअभावी रूग्णांनी येथून पळ काढावा लागत आहे.सोमवारी सायंकाळी लाखनी तालुक्यात झालेल्या अपघातातील रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल १२ तासानंतरही त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना रूग्णालयातच विव्हळत पडून राहावे लागले आहे. यातील काहींनी असुविधेचा धसका घेऊन खासगी रूग्णालयात जाणे पसंत केले. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका रूग्णावर मागील दोन महिन्यांपासून शस्त्रक्रिया करण्यासाठी टाळाटाळ होत आहे. एका रूग्णाला तर शस्त्रक्रिया कक्षातून वॉर्डात आणि वॉर्डातून शस्त्रक्रिया कक्षात अशा फेऱ्या माराव्या लागत आहे. त्याला डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेसाठी केवळ ’तारीख पे तारीख’ देण्यात येत आहे.सोमवारला सायंकाळी लाखनी तालुक्यातील चिखलाबोडी येथून मोहघाटाकडे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालया दाखल करण्यात आले होते. तब्बल १२ तासानंतरही त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले नाही. या सर्व जखमींवर लाखनी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याच उपचारावर त्यांनी भंडारा येथील रूग्णालयात रात्र काढली. मंगळवारला या जखमींच्या नातेवाईकांमध्ये रुग्णालयाप्रति असंतोष दिसून आला. याबाबत सदर प्रतिनिधीने भेट दिली असता, वास्तवस्थिती दिसून आली.या अपघातातील १५ वर्षीय कमलेश मारोती नामुर्ते रा.देऊळगांव याला वॉर्ड क्रमांक १५ मध्ये दाखल केले आहे. त्याच्या पाठीला गंभीर इजा झालेली आहे. पाठीला जखम असल्याने हा बालक वेदनेने विव्हळत आहे. वॉर्ड क्रमांक १४ मध्ये दाखल असलेल्या संदीप लांजेवार (३०) रा.मोहघाटा याच्यावर लाखनीत जे उपचार करण्यात आले त्यावरच तो जखमी अवस्थेत आहे. त्याच्या हाताला व तोंडाच्या जबड्याला इजा झाली असतानाही औषधोपचारासाठी डॉक्टर किंवा परिचारिका तिथे आली नसल्याचे जखमी संदीपने सांगितले.वॉर्ड क्रमांक १८ मध्ये दाखल असलेल्या पुष्पा शिशुपाल कोवे (३०) रा. बोरगाव, अल्का क्रिष्णा उईके (३२) रा. रेंगेपार, प्रज्ञा सुखराम कुंभरे (१६) रा. मुरपार, सत्यभामा ईसन मडावी (५०) रा. मोहघाटा, वैशाली पतिराम मडावी (४५) रा. गिरोला यांच्यासह अन्य महिलांवरही औषधोपचाराची तीच परिस्थिती आहे. अपघातानंतर त्यांच्यावर लाखनी रूग्णालयात जे औषधोपचार करण्यात आले ते शेवटचे उपचार ठरले. (शहर प्रतिनिधी)शस्त्रक्रियेसाठी तारीख पे तारीखअस्थीरुग्ण विभागाच्या वॉर्ड क्रमांक १५ मध्ये मेहर नामक व्यक्ती मागील दोन महिन्यापासून शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला आहे. मात्र, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली नसल्याने तो जीवाच्या आकांताने विव्हळत आहे. अशास्थितीत डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत नाही किंवा त्याच्या नातेवाईकाला योग्य सल्ला देणेही औचित्याचे समजत नाही. याच वॉर्डात दाखल असलेला धारगाव येथील आशिष भोजराज साखरे (३७) याचा अपघात झाल्याने गुडघ्याला दुखापत झालेली आहे. मागील काही दिवसापासून त्याला भरती करण्यात आलेले आहे. परंतु, त्याला शस्त्रक्रियेसाठी तारीख दिल्यानंतर शस्त्रक्रिया गृहात नेण्यात येते व परत वॉर्डात पाठविल्या जात आहे. त्याला शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात अनेकदा ‘तारीख पे तारीख’ देण्यात आलेली आहे. सोमवारला त्याला शस्त्रक्रियेसाठी सकाळी ९.३० वाजता नेण्यात आले. दुपारी १.३० वाजेपर्यंत शस्त्रक्रियेबिना ठेवण्यात आले. अशावेळी डॉक्टरांनी त्याला ढुंकूनही बघीतले नाही, त्यामुळे वॉर्ड बॉयच्या मदतीने त्याला परत वॉर्डात पाठविण्यात आल्याची प्रतिक्रया संदीपने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.