शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

पाण्यावरून गाजली जिल्हा परिषदेची सभा

By admin | Updated: March 24, 2016 01:17 IST

जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागासाठी एक छदामही

भंडारा : जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागासाठी एक छदामही राखून ठेवली नाही. यावर विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला. अखेरीस पाणीपुरवठा विभागासाठी १ कोटी २० लाख रुपयांची सुधारीत तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन सभागृहात देण्यात आले.सोमवारी जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा पाण्याच्या विषयासह विविध मुद्दयांवर गाजली. ही सभा रात्री ९ वाजतापर्यत सुरू होती. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागासाठी विशेष निधीची तरतूद केली जाते. पाणीपुरवठा योजना, कर्मचाऱ्यांचा पगार व भविष्य निर्वाह निधीसाठी ही तरतूद असते. परंतु, या अर्थसंकल्पात एकही तरतूद करण्यात आली नाही. याशिवाय शहापूर, गोबरवाही आदी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेली पाणीपट्टी कर एक हजार २०० रुपयांवरून थेट एक हजार ८०० रुपये करण्यात आल्याने विरोधी सदस्यांनी आक्षेप घेत ही करवाढ मागे घेण्याची मागणी केली. या करवाढीचा भुर्दंड नळधारकांना बसणार असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत हातपंपाची दुरुस्ती, प्रादेशिक नळ योजनेतील वीज पंपाची देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी निधीची तरतूद असताना यावेळी निधीच देण्यात आला नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)अर्थसंकल्पात त्रुट्या४सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक त्रुट्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर्षी सुमारे पाच कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून त्यात ग्रामीण जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाणीपट्टी कर वाढविण्याची काहीच गरज नसताना ती ६०० रुपयांनी वाढविण्यात आली. भाजपचे सदस्य संदीप ताले, अरविंद भालाधरे, सुभाष आजबले यांनी या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला आहे.